शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारात प्रथिनांचा वापर गरजेचा -डॉ. सुनिता लाहोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 11:18 IST

Interview with Doctor जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता प्रेमदास लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद....

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून, यापासून बचाव म्हणून सर्वत्र आवश्यक  प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक आहे. यासाठी कोणता आहार फायदेशीर आहे आणि कोणता आहार टाळावा यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता प्रेमदास लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद....

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणता आहार घ्यावा ?कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव म्हणून रोगप्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन आहारात प्रामुख्याने प्रथिनांचा (वनस्पती प्रथीने) उपयोग आवश्यक आहे. शरिरास उर्जा प्रदान करणे, शरीर बांधणीचे कार्य करणे, शरीराची झीज भरुन काढणे, विविध आजारास प्रतिबंध करणे आदीचे कार्य प्रथिनांमधून होते. आहारामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, वरणाच्या स्वरुपात मोड आलेल्या उसळी, नास्त्यामध्ये इडली, सांबार, ढोकळा, डोसा, धिरडे, थालीपिठ, सुकामेवा, पाण्यात भिजवून बदाम अशा प्रकारे आहारात समावेश करता येईल. भोजनात सलादचा वापर करावा. सलादमध्ये कैरी, टमाटर, काकडी, बीट, मेथी याचा वापर करावा. तत्पूर्वी ते कोमट पाण्यात लिंबू पिळून धुऊन घ्यावे.

कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात काय सांगाल?सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. यापासून सावधगिरी म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहेच; परंतु त्यासोबतच प्रत्येकाने स्वत:ची आंतरीकशक्ती व रोगप्रतिकार शक्ती वाढविणे व ती सातत्याने टिकवुन ठेवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सकस आहार नियमित घेणे आवश्यक आहे.

कोणती फळे सेवन करावी आणि कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे ?क जीवनसत्व असणाºया फळांचे सेवन करावे. संत्रा, मोसंबी आदी फळांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. बाहेरचे खाद्यपदार्थ सेवन करणे टाळावे, फास्ट फूड, उघड्यावर शिजवलेले पदार्थ सेवन करू नये.

शरीराचे हायड्रेशन कसे संतुलित ठेवावे ?सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीराचे हायड्रेशन संतुलित ठेवणे गरजेचे आहे. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे, साधारणत: ३ ते ४ लिटर तसेच दुपारच्या वेळी घरगुती शरबते, जसे निंबु, शरबत, मठठा आदींचा उपयोग करता येईल. सोबतच रसाळ फळे जसे, टरबुज,  खरबुज, संत्रा, मोसंबी, द्राक्षे, आदी उपयोगात आणता येईल. या सर्व गोष्टीमुळे शरीराची पाण्याची गरज तर भागतेच सोबतच  आपल्या शरीरास जीवनसत्व व खनिज पदार्थही मिळतात.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत