शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारात प्रथिनांचा वापर गरजेचा -डॉ. सुनिता लाहोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 11:18 IST

Interview with Doctor जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता प्रेमदास लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद....

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असून, यापासून बचाव म्हणून सर्वत्र आवश्यक  प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक आहे. यासाठी कोणता आहार फायदेशीर आहे आणि कोणता आहार टाळावा यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातील आहार तज्ज्ञ डॉ.सुनिता प्रेमदास लाहोरे यांच्याशी साधलेला हा संवाद....

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी कोणता आहार घ्यावा ?कोरोना विषाणू संसर्गापासून बचाव म्हणून रोगप्रतिकार शक्ती वाढविणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दैनंदिन आहारात प्रामुख्याने प्रथिनांचा (वनस्पती प्रथीने) उपयोग आवश्यक आहे. शरिरास उर्जा प्रदान करणे, शरीर बांधणीचे कार्य करणे, शरीराची झीज भरुन काढणे, विविध आजारास प्रतिबंध करणे आदीचे कार्य प्रथिनांमधून होते. आहारामध्ये भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, वरणाच्या स्वरुपात मोड आलेल्या उसळी, नास्त्यामध्ये इडली, सांबार, ढोकळा, डोसा, धिरडे, थालीपिठ, सुकामेवा, पाण्यात भिजवून बदाम अशा प्रकारे आहारात समावेश करता येईल. भोजनात सलादचा वापर करावा. सलादमध्ये कैरी, टमाटर, काकडी, बीट, मेथी याचा वापर करावा. तत्पूर्वी ते कोमट पाण्यात लिंबू पिळून धुऊन घ्यावे.

कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात काय सांगाल?सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. यापासून सावधगिरी म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहेच; परंतु त्यासोबतच प्रत्येकाने स्वत:ची आंतरीकशक्ती व रोगप्रतिकार शक्ती वाढविणे व ती सातत्याने टिकवुन ठेवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी सकस आहार नियमित घेणे आवश्यक आहे.

कोणती फळे सेवन करावी आणि कोणत्या पदार्थांचे सेवन टाळावे ?क जीवनसत्व असणाºया फळांचे सेवन करावे. संत्रा, मोसंबी आदी फळांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. बाहेरचे खाद्यपदार्थ सेवन करणे टाळावे, फास्ट फूड, उघड्यावर शिजवलेले पदार्थ सेवन करू नये.

शरीराचे हायड्रेशन कसे संतुलित ठेवावे ?सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शरीराचे हायड्रेशन संतुलित ठेवणे गरजेचे आहे. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे, साधारणत: ३ ते ४ लिटर तसेच दुपारच्या वेळी घरगुती शरबते, जसे निंबु, शरबत, मठठा आदींचा उपयोग करता येईल. सोबतच रसाळ फळे जसे, टरबुज,  खरबुज, संत्रा, मोसंबी, द्राक्षे, आदी उपयोगात आणता येईल. या सर्व गोष्टीमुळे शरीराची पाण्याची गरज तर भागतेच सोबतच  आपल्या शरीरास जीवनसत्व व खनिज पदार्थही मिळतात.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत