शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या राजकारणात पैसा आणि धमकीतंत्राचा वापर

By admin | Updated: October 10, 2014 23:50 IST

संग्रामपूर येथील जाहीर सभेत केंद्रीय मंत्री उमा भारती यांचा राकाँ आणि शिवसेनेवर आरोप.

संग्रामपूर (बुलडाणा) : महाराष्ट्राच्या राजकारणात पैसा आणि धमक्यांचा वापर सर्रास केला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ पैशाच्या भरवश्यावर निवडणूक लढविते, तर शिवसेना धमक्यांचा वापर करून आतापर्यत राजकारण करीत आली आहे, असा थेट आरोप केंद्रीय जलसंधारण मंत्री उमा भारती यांनी शुक्रवारी जाहीर सभेत केला. जळगाव जामोद मतदारसंघाचे भाजप उमेदवार डॉ.संजय कुटे यांच्या प्रचारार्थ वरवट बकाल येथे आयोजित केलेल्या सभेत त्या बोलत होत्या. युती आणि आघाड्यांचे राजकारण संपवून, भाजपला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सत्ता स्थापनेसाठी एखाद्या पक्षाचे सर्मथन घेतले, तर त्या पक्षाला जावयाप्रमाणे सांभाळावे लागते. त्याचे नखरे सांभाळावे लागतात. त्याचा परिणाम विकास कामांवर होतो. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी स्थिती यापुढे आणू नका, असे आवाहन त्यांनी उपस् िथतांना केले. एकेकाळी फायर ब्रँड म्हणून माझी ओळख होती; आता मात्र वॉटर ब्रँड म्हणून ओळ ख निर्माण करणार असल्याचे सांगत, त्यांनी देशातील सर्व पाणीपुरवठा योजना मोदी सरकारच्या काळात पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली. यावेळी व्यासपिठावर भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते. * उध्दव ठाकरेंना इतिहास माहित नाही : खडसेशिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी दिल्लीवरून अफजलखानाची फौज आली अशी टीका भाजपसंदर्भात केली होती. या वक्तव्याचा समाचार एकनाथ खडसे यांनी घेतला. उध्दव ठाकरेंना इ ितहास माहित नाही. अफजलखान दिल्लीवरून नाही, तर विजापूरवरून आला होता. त्यांना मुळातच अभ्यास करण्याची सवय नाही. त्यामुळे अशी अर्धवट विधानं करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सेनेकडून केला जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.