शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पाऊस, गारपीटीचे थैमान सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:39 IST

तहसीलदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त (पुनर्वसन विभाग) यांच्याकडे २० मार्च रोजी ६६९७ शेतकºयांच्या ४८८० हेक्टरवरील पिकांचे ...

तहसीलदारांकडून प्राप्त माहितीच्या आधारे जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त (पुनर्वसन विभाग) यांच्याकडे २० मार्च रोजी ६६९७ शेतकºयांच्या ४८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल सादर केला होता. त्यानंतरही अवकाळी पाऊस व गारपीट सुरूच असून नुकसानग्रस्त गावे व शेतकऱ्यांचा आकडा वाढला आहे. त्यानुषंगाने १९ ते २१ मार्च या कालावधीत झालेल्या नुकसानाचा सुधारित अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यानुसार, वाशिम तालुक्यातील ६ महसूली मंडळातील ३९ गावांमध्ये १६९३ हेक्टरवरील कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे २१२३ शेतकरी बाधीत झाले आहेत. मालेगाव तालुक्यातील ६ महसूली मंडळातील ४० गावांमध्ये ११७० हेक्टरवरील उन्हाळी सोयाबीन, मूग, गहू, पपई, आंबा, उडीद, तीळ, कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. यामुळे १८६१ शेतकरी बाधीत झाले आहेत. रिसोड तालुक्यातील ३ महसूली मंडळातील २० गावांमध्ये १६८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून २१८७ शेतकरी बाधित झाले आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील ३ महसूली मंडळातील २२ गावांमध्ये ५०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ५५८ शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच मानोरा व कारंजा तालुक्यातील ४ महसुली मंडळातील २१ गावांमध्ये ५३६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. यात ८७२ शेतकरी बाधित झाले आहेत, असा प्राथमिक नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.

..........................

रिसोड तालुक्यात बिजवाई कांदा, टरबुजाचे प्रचंड नुकसान

रिसोड तालुक्यात २१ मार्च रोजी वादळी वारा व गारपिटीमुळे बिजवाई कांदा, टरबुजाचे प्रचंड नुकसान झाले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पळसखेड येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पंचायत समिती सभापती सुभाष खरात यांच्यासह महसूल विभागाला याबाबत अवगत केले. त्यावरून २२ मार्च रोजी मंडळ अधिकारी, तलाठी व कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी पळसखेड येथे जाऊन नुकसानाचे पंचनामे केले.

...................................

बॉक्स :

गारपिटीने तालुकानिहाय झालेले नुकसान

वाशिम - बाधित गावे - ३९ - बाधित क्षेत्र १६९३ हे.

मालेगाव - बाधित गावे - ४० - बाधित क्षेत्र ११७० हे.

रिसोड - बाधित गावे - २० - बाधित क्षेत्र १६८४ हे.

मंगरूळपीर - बाधित गावे - २२ - बाधित क्षेत्र ५०९ हे.

मानोरा - बाधित गावे - १७ - बाधित क्षेत्र ८६५ हे.

कारंजा - बाधित गावे - ०४ - बाधित क्षेत्र ०५ हे.