शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

तूर विक्रीसाठी नोंदणी दोन हजार शेतकऱ्यांची ; खरेदी शून्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:42 IST

खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने तूर पिकाला मोठा फटका बसला. त्याचबरोबर उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये ...

खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने तूर पिकाला मोठा फटका बसला. त्याचबरोबर उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये तुरीची आवकही घटली. आवक कमी झाली आणि मागणी वाढली की दरात वाढ होते, या अर्थशास्त्रीय नियमाप्रमाणे बाजार समित्यांत तुरीच्या दरात वाढ झाली. शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून आधारभूत खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर वाशिम तालुक्यातील २ हजार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली. परंतु, खुल्या बाजारपेठेत अधिक दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा तुरीची एक रुपयाचीही खरेदी होऊ शकली नाही.

.......................

हंगाम संपल्यानंतरही आवक सुरूच!

हंगाम संपल्यानंतरही वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक अद्याप सुरूच आहे. तुरीला भावही प्रतिक्विंटल ६ हजारांपेक्षा अधिक मिळत आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरी क्विंटलमागे सरासरी ५०० रुपये अधिक पडत आहेत.

...................

शेतकऱ्यांनी फिरविली पाठ

दरवर्षी खरेदी केंद्रावर सोयाबीन, तूर, हरभरा विक्रीसाठी रांगा लागत असतात. परंतु, यंदा बाजारपेठेत अधिक दर मिळू लागल्याने एकाही शेतकऱ्याने नाफेडकडे तूर विक्री केली नाही. तूर विक्रीसाठी दोन हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती व सर्व शेतकऱ्यांना मॅसेज पाठविण्यात आले, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.