शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम तालुक्यातील दोन सरपंच, उपसरपंच अपात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:51 IST

वाशिम: तालुक्यातील उकळी पेन आणि गोंडेगावच्या सरपंच, उपसरपंचांसह तीन सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश अमरावती आयुक्तांनी दिला आहे.

ठळक मुद्देअमरावती आयुक्तांनी दिला आदेशउकळीपेन, गोेंडेगाव ग्रामपंचायतीमधील प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील उकळी पेन आणि गोंडेगावच्या सरपंच, उपसरपंचांसह तीन सदस्यांना अपात्र ठरविण्याचा आदेश अमरावती आयुक्तांनी दिला आहे.उकळपेन येथील ग्रामपंचायतमध्ये विकास कामांत गैरप्रकार झाल्याची, तर गोंडेगाव ग्रामपंचायत अतिक्रमण हटविण्यात अपयशी ठरल्याबाबतची तक्रार करण्यात आली होती. या बाबत आयुक्तांकडे अपिल दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी उपरोक्त आदेश दिले आहेत. ही माहिती गुरुवारी प्राप्त झालीउकळीपेन येथे १३ व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या सिमेंट रस्ता कामात सरपंच, उपसरपंचआणि ग्रामसचिवांंनी अनियमितता व गैरप्रकार करून या कामात २८ हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च केल्याची तक्रार कैलास भोयनवाड, मोतीराम कुटे, माधव लांडे, जीवन महाले, मोहनराव गांजरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली होती. त्याशिवाय सरपंच आणि ग्रामसचिवांनी इंदिरा आवास योजनेतही गैरप्रकार केल्याचे त्यांनी म्हटले होते. या प्रकरणी वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी केलेल्या चौकशी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसचिवांनी सदर रस्ता कामात अतिरिक्त खर्च करताना कोणतीही तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता न घेतल्यामुळे सरपंच आणि उपसरपंच महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा १९५८ मधील कलम ३९(१) नुसार दोषी असल्याचा अहवाल दिला होता, तसेच सदर ग्रामपंचायतीला काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये, असा सवाल पत्राद्वारे गटविकास अधिकाºयांना केला होता; परंतु ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला काळ्या यादीत टाकण्याऐवजी दोषींवर कारवाईची मागणी केली होती. या सर्व प्रकरणाची चौकशी करून अमरावती आयुक्तांनी उकळी पेनचे सरपंच आणि उपसरपंचांना पदासाठी अपात्र ठरविले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निर्देशानुसार ग्रामसचिवांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही दिले. दरम्यान, गोंडेगाव येथील भाऊराव कोल्हे आणि गिरीराज चौधरी यांनी गावातील रस्ते, खुली जागा आणि नाल्यांवर केलेल अतिक्रमण हटविण्याची मागणी ग्रामपंचायतकडे केली होती; परंतु सरपंच, उपसरपंच आणि चार सदस्यांनी या कामास टाळाटाळ केल्यामुळे त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे तक्रार करून सदर प्रकरणी सरपंच, उपसरपंचांसह चार सदस्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. अतिरिक्त जिल्हाधिकाºयांनी ती मागणी फे टाळत आयुक्तांकडे प्रकरण वर्ग केले होते. आयुक्तांनी या प्रकरणी सर्व पुराव्यांची तपासणी करून निर्णय देताना सरपंच, उपसरपंच आणि दोन सदस्यांनाही पदासाठी अपात्र ठरविण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत