शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अडीच कोटी रुपये कर थकीत; शहराचा विकास खुंटला

By admin | Updated: August 15, 2015 00:32 IST

६00 थकबाकीदारांना नोटीस; कर भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत.

मालेगाव (जि. वाशिम): यापूर्वी ग्रामपंचायत असणार्‍या मालेगाव शहराचा नगर पंचायत झाल्यावर विकास होईल, अशी मालेगावकरांची बर्‍याच दिवसांपासून धारणा होती. ग्रा.पं.चे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले; मात्र शहराच्या विकासाला निधीअभावी ब्रेक लागत आहे. त्यातही थकित असलेला दोन कोटीच्या वर करामुळे शहर विकासाला खीळ लागण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत यापूर्वी मालेगावला ग्रामपंचायतीचा दर्जा होता. गाव विकासाचे राजकारण व अंतर्गत हितसंबंध यामुळे टॅक्स वसुली पाहिजे त्या जोमाने केल्या जात नव्हती. पर्यायाने जेमतेम टॅक्स वसुली व काही थोड्याफार निधीच्या भरवशावर शहराचा कारभार चालत होता. त्यामध्ये शहराच्या मूलभूत सुविधा, कर्मचार्‍यांचे पगार केल्या जात होते. त्यामुळे कमी-जास्त प्रमाणात सुविधा नागरिकांना मिळत होत्या. नागरिकांना आवश्यक सुविधा म्हणजे स्वच्छ व चांगले रस्ते, वीज, पाणी व साफसफाई यांच्यामध्ये नगर पंचायत झाल्यावर बदल होईल व लोकांना सुखसुविधा मिळतील, अशी लोकांना अपेक्षा होती; मात्र नगर विकास मंत्रालयाच्या आदेशान्वये येथे नगर पंचायत झाली; मात्र निधीअभावी विकासाला खीळ बसलेली आहे. शासनाने नगरपंचायतची घोषणा केली; मात्र येथे निधी पुरविला नसल्याने शहरात काही बदल झाला नाही. पूर्वीच्या ग्रामपंचायतीचाही निधी शिल्लक नाही व शहरातील लोकांचे कर वसुलीही नसल्याने विकास कसा करणार, हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आला आहे. मालेगाव शहरातील सुमारे अडीच कोटीच्यावर कर थकित आहे. शासकीय कार्यालयासह अनेक धनाढय़ लोकांकडे टॅक्स थकित आहे. शासकीय कार्यालयामध्ये भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल), वीज वितरण कंपनी, सोसायटी, लघुपाटबंधारे बांधकाम विभाग, बालाजी फॅक्ट्री, मोबाइल टॉवर, तहसील कार्यालय, युनिटी टेलिकॉम, उदरु शाळा यांसह माहेश्‍वरी भवन आदी कडे मोठय़ा संख्येने कर थकित आहे. यासह लाख रुपयाच्यावर कर थकित असणारे २0 ते २५ नागरिक आहेत. तर १0 हजाराच्या आत थकित व २0 हजाराच्या आत थकित असणारे ५0 ते १00 नागरिक आहेत. या सर्वांकडील कर वसुलीची मोहीम प्रशासनाकडून घेण्यात आली असून, त्यापैकी प्राथमिक टप्प्यात मोठे थकबाकीसह ६00 जणांना नोटिसा दिल्या आहेत. बाकिच्यांना नोटीसा देणे सुरु आहे. त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या सर्वांच्या जवळचा अडीच कोटी रुपये टॅक्स जमा केल्यास शहराच्या विकासाला हातभार लागू शकतो.