शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

अडीच कोटी रुपये कर थकीत; शहराचा विकास खुंटला

By admin | Updated: August 15, 2015 00:32 IST

६00 थकबाकीदारांना नोटीस; कर भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत.

मालेगाव (जि. वाशिम): यापूर्वी ग्रामपंचायत असणार्‍या मालेगाव शहराचा नगर पंचायत झाल्यावर विकास होईल, अशी मालेगावकरांची बर्‍याच दिवसांपासून धारणा होती. ग्रा.पं.चे नगरपंचायतमध्ये रुपांतर झाले; मात्र शहराच्या विकासाला निधीअभावी ब्रेक लागत आहे. त्यातही थकित असलेला दोन कोटीच्या वर करामुळे शहर विकासाला खीळ लागण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत यापूर्वी मालेगावला ग्रामपंचायतीचा दर्जा होता. गाव विकासाचे राजकारण व अंतर्गत हितसंबंध यामुळे टॅक्स वसुली पाहिजे त्या जोमाने केल्या जात नव्हती. पर्यायाने जेमतेम टॅक्स वसुली व काही थोड्याफार निधीच्या भरवशावर शहराचा कारभार चालत होता. त्यामध्ये शहराच्या मूलभूत सुविधा, कर्मचार्‍यांचे पगार केल्या जात होते. त्यामुळे कमी-जास्त प्रमाणात सुविधा नागरिकांना मिळत होत्या. नागरिकांना आवश्यक सुविधा म्हणजे स्वच्छ व चांगले रस्ते, वीज, पाणी व साफसफाई यांच्यामध्ये नगर पंचायत झाल्यावर बदल होईल व लोकांना सुखसुविधा मिळतील, अशी लोकांना अपेक्षा होती; मात्र नगर विकास मंत्रालयाच्या आदेशान्वये येथे नगर पंचायत झाली; मात्र निधीअभावी विकासाला खीळ बसलेली आहे. शासनाने नगरपंचायतची घोषणा केली; मात्र येथे निधी पुरविला नसल्याने शहरात काही बदल झाला नाही. पूर्वीच्या ग्रामपंचायतीचाही निधी शिल्लक नाही व शहरातील लोकांचे कर वसुलीही नसल्याने विकास कसा करणार, हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आला आहे. मालेगाव शहरातील सुमारे अडीच कोटीच्यावर कर थकित आहे. शासकीय कार्यालयासह अनेक धनाढय़ लोकांकडे टॅक्स थकित आहे. शासकीय कार्यालयामध्ये भारतीय दूरसंचार निगम (बीएसएनएल), वीज वितरण कंपनी, सोसायटी, लघुपाटबंधारे बांधकाम विभाग, बालाजी फॅक्ट्री, मोबाइल टॉवर, तहसील कार्यालय, युनिटी टेलिकॉम, उदरु शाळा यांसह माहेश्‍वरी भवन आदी कडे मोठय़ा संख्येने कर थकित आहे. यासह लाख रुपयाच्यावर कर थकित असणारे २0 ते २५ नागरिक आहेत. तर १0 हजाराच्या आत थकित व २0 हजाराच्या आत थकित असणारे ५0 ते १00 नागरिक आहेत. या सर्वांकडील कर वसुलीची मोहीम प्रशासनाकडून घेण्यात आली असून, त्यापैकी प्राथमिक टप्प्यात मोठे थकबाकीसह ६00 जणांना नोटिसा दिल्या आहेत. बाकिच्यांना नोटीसा देणे सुरु आहे. त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या सर्वांच्या जवळचा अडीच कोटी रुपये टॅक्स जमा केल्यास शहराच्या विकासाला हातभार लागू शकतो.