शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

३३ कोटी वृक्षलागवडीचे ८८ टक्के उद्दीष्ट पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:38 IST

३ सप्टेंबरपर्यंत एकूण उद्दीष्टाच्या ८८ टक्के वृक्षलागवड पूर्ण झाली आहे. उ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनस्तरावरून मोठा गाजावाजा करून १ जुलैपासून सुरु करण्यात आलेल्या ३३ कोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत ३ सप्टेंबरपर्यंत एकूण उद्दीष्टाच्या ८८ टक्के वृक्षलागवड पूर्ण झाली आहे. उर्वरित सव्वा पाच लाख वृक्षांची ३० सप्टेंबरपर्यंत लागवड करावी लागणार असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी दिली.शासनाच्या वनविभागाने ३ वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट निश्चित केले असून याअंतर्गत १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. २०१७ च्या पावसाळ्यात १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवड योजना सर्वत्र पार पडली; तर १ जुलै २०१९ पासून वृक्षलागवडीच्या तिसऱ्या टप्प्यात ३३ कोटी वृक्षलागवडीस सुरूवात करण्यात आली. याअंतर्गत वाशिम जिल्ह्याला ४३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ते पूर्ण करावे लागणार असून ३ सप्टेंबरपर्यंत त्यापैकी ३७ लाख ७५ हजार वृक्ष प्रत्यक्षात लावण्यात आली आहेत. यात वनविभाग, सामाजिक वनीकरण यासह जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायती, चार नगर पालिका, दोन नगर परिषदा, शाळा-महाविद्यालये व प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या संगोपनाकडे देखील विशेष लक्ष पुरविले जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक सुमंत सोळंके यांनी दिली.(प्रतिनिधी)

 

टॅग्स :washimवाशिमforest departmentवनविभाग