शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक प्रभावित; बेताल वाहतुकीमुळे वाशिम शहरवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:47 IST

वाशिम: शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतुक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतुक शाखेचे प्रयत्नही निष्फळ ठरत असल्याचे शहरात चित्र आहे.

ठळक मुद्देवाशिम शहरातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडलेली दिसून येत आहे. त्याशिवाय भर रस्त्यावर फेरीवाले उभे राहत असल्याने रस्ता अरूंद झाला आहे.एखादे मोठे वाहन रस्त्यावरून जात असताना बराच वेळ वाहतूक खोळंबतांना दिसून येत आहे.

वाशिम: शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक प्रभावित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहतुक सुरळीत करण्यासाठी शहर वाहतुक शाखेचे प्रयत्नही निष्फळ ठरत असल्याचे शहरात चित्र आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरीता रस्त्यांवर उभे राहणाºया फेरीवाल्यांना पर्यायी जागा देणे आवश्यक झाले आहे. याकडे नव्यानेच रुजू झालेल्या जिल्हाधिकारी यांनी लक्ष दिल्यास हा प्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो. यापूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी कुळकर्णी यांनी याबाबत पुढाकार घेवून शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली होती.

वाशिम शहरातील वाहतूक व्यवस्था पार कोलमडलेली दिसून येत आहे. वाहनधारक आपली वाहने रस्त्यावर उभे करून तास न तास येत नसल्याने रस्त्यावर उभे असलेल्या या वाहनांमुळे वाहतुक प्रभावित होवून नागरिकांना त्रास सहन तर करावाच लागत आहे. त्याशिवाय भर रस्त्यावर फेरीवाले उभे राहत असल्याने रस्ता अरूंद झाला आहे. एखादे मोठे वाहन रस्त्यावरून जात असताना बराच वेळ वाहतूक खोळंबतांना दिसून येत आहे. शहर वाहतूक शाखेच्यावतिने प्रत्येकवेळी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केल्या जात असला तरी थोडयाच वेळाने परिस्थीती जैसे थे होत असल्याने शहरातील वाहतूक सुरळीत करण्याकरीता ठोस उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे.

या आधी जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरीता एका खासगी कंत्राटदाराला पार्कींगचे काम देण्यात आले होते. यामुळे बराचसा प्रभाव होवून वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र मधातच काही महिन्यानंतर हे बंद करण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बरेच नागरिक या अस्ताव्यस्त वाहतुकीला कंटाळून कुलकर्णी यांनी सुरू केलेली योजना चांगली असल्याचे आज बोलताना दिसून येत आहेत त्याकरिता जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण शुक्ला यांनी सुध्दा याबाबत याप्रकारची योजना राबवून नागरिकांना होणाारा त्रास दूर करण्याची मागणी नागरिकांतून केल्या जात आहे.

 जो वाहन पार्कीगचे नियम तोडेल त्याला जागेवरच दंड आकरल्या जात होता. रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनाला ‘जॅमर ’ लावल्याने वाहनधारकाला आपले वाहन घेवून जाता येत नव्हते. यामुळे अनेकांना पार्कीगचे नियम व अटींची जाण झाली होती. मात्र हे बंद झाल्याने शहरातील पार्कीगची व्यवस्था कोलमडलेली आहे. वाशिम शहरातील रस्त्यांवर काही व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोर लोखंडी जाळया टाकून ठेवल्याने त्यांच्या दुकानासमोर वाहने लावता येत नाही. यामुळे नागरिक आपली वाहने भर रस्त्यावर लावत असल्याने वाहतूक प्रभावित होत आहे. याकरीताही काही तरी उपाय योजना करणे गरजेचे आहे.अनेकदा एकाच ठिकाणी शहरवाहतूक शाखेचे अनेक कर्मचारी उपस्थित असताना सुध्दा विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत होत नाही यावरून शहरातील बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेची कल्पना करता येईल. तसेच अनेक पोलीस कर्मचारी वाहनांना अडवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुन अव्वाच्या सव्वा रुपये दंड आकारण्याचे काम जसे प्रामाणिकपणे करीत आहेत तसेच कार्य वाहतूक सुरळीततेबाबतही करावे अशी अपेक्षा नागरिकांतून केल्या जात आहे.तरी शहरातील वाहतूक व्यवस्थेची बिघडलेली घडी सुरळीत करण्याकरीता प्रयत्न करावे अशी मागणी नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहे.  (प्रतिनिधी) 

टॅग्स :washimवाशिमTrafficवाहतूक कोंडी