शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेकडो वर्षांपासून आजही सुरु आहे शिव-पार्वती विवाह सोहळयाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 14:15 IST

ईचा नागी येथील मंदिरात शिव पार्वती यांची मुर्ती असून दरवर्षी येथे मोठया उत्सवात शिव पार्वती विवाह सोहळा पार पाडल्या जातो. ही पंरपरा शेकडो वर्षांपासून सुरु असून आजही अविरत आहे.

- साहेबराव राठोड   शेलुबाजार : कुठेही शिव मदिरामध्ये शिवाची किंवा पार्वतीची मुर्ती आढळून येत नाही. बहुतांश मंदिरात लिंग दिसून येते. परंतु वाशिम जिल्हयातील मंगरुळपीर तालुकयात असलेल्या ईचा नागी येथील मंदिरात शिव पार्वती यांची मुर्ती असून दरवर्षी येथे मोठया उत्सवात शिव पार्वती विवाह सोहळा पार पाडल्या जातो. ही पंरपरा शेकडो वर्षांपासून सुरु असून आजही अविरत आहे.समाजामध्ये ज्या प्रमाणे लग्न लावल्या जातात त्याच प्रमाणे हा संपूर्ण सोहळा असतो. लग्नपत्रिकाऐवजी येथे कार्यक्रम पत्रिका प्रकाशित करुन त्यामध्ये लग्नसोहळयाची वेळ नमूद केल्या जाते. दरवर्षी बारसनिमित्त हा सोहळा पार पडतो. रामनवमीच्या अगोदरच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. याहीवर्षी १२ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला. यावेळी येथे येणाऱ्या भाविकांच्या स्वागतापासून तर त्यांना अक्षदा देण्याचे कार्य गावकरी करतात. लग्न सोहळा आटोपल्यानंतर पंगता बसविण्यात येतात. यामध्ये हजारो भाविक सहभागी असतात. या कार्यक्रमाचा विडा गावातील अनिल बळीराम राऊत, मनोहर ज्ञानदेव वानखडे, ओकांर शंकरराव राऊत, मोहन विठ्ठल्राव राऊत यांनी उचलला होता. विशेष म्हणजे या लग्नसोहळयाची तयारी एक महिन्यापूर्वीपासून सुरु होते. या तयारीसाठी श्री क्षेत्र महादेव संस्थान ईचा नागीचे सर्व विश्वस्त व भाविक प्रयत्नशिल असतात.या कार्यक्रमानिमित्त भव्य यात्रा व महाप्रसाद कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. यावर्षी ९ एप्रिल ते १३एप्रिलपर्यंत श्रीमद भागवत कथा घेण्यात आली. विविध नामांकित मान्यवरांची किर्तने यावेळी पार पडली. १४ ते १६ विविध किर्तनकारांची किर्तने व १६ एप्रिल रोजी शिवपार्वती पूजा , महाआरती व नंतर महाप्रसाद कार्यक्रम आयोजित आहे.या कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित राहून याचा लाभ घेण्याचे आवाहन ईचा नागी येथील शिव पार्वती मंदिर संस्थानच्यावतिने करण्यात आले आहे.

शेकडो वर्षापासून लागतेय लग्नमंगरुळपीर तालुक्यातील ईचा नागी येथे शिव पार्वती विवाह सोहळयाची परंपरा शेकडो वर्षापूर्वीची असल्याचे भाविक सांगतात. यात्रेत असलेले ९० वर्षिय भाविकांने सांगितले की, मी लहान असतांना सुध्दा या सोहळयासाठी येत होतो. नेमके ही परंपरा कधी सुरु झाली हे सांगता येत नसले तरी शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालु असल्याचे ९० वर्षिय भाविकांच्या सांगण्यावरुन स्पष्ट होत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमIndian Traditionsभारतीय परंपरा