शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

शेकडो वर्षांपासून आजही सुरु आहे शिव-पार्वती विवाह सोहळयाची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 14:15 IST

ईचा नागी येथील मंदिरात शिव पार्वती यांची मुर्ती असून दरवर्षी येथे मोठया उत्सवात शिव पार्वती विवाह सोहळा पार पाडल्या जातो. ही पंरपरा शेकडो वर्षांपासून सुरु असून आजही अविरत आहे.

- साहेबराव राठोड   शेलुबाजार : कुठेही शिव मदिरामध्ये शिवाची किंवा पार्वतीची मुर्ती आढळून येत नाही. बहुतांश मंदिरात लिंग दिसून येते. परंतु वाशिम जिल्हयातील मंगरुळपीर तालुकयात असलेल्या ईचा नागी येथील मंदिरात शिव पार्वती यांची मुर्ती असून दरवर्षी येथे मोठया उत्सवात शिव पार्वती विवाह सोहळा पार पाडल्या जातो. ही पंरपरा शेकडो वर्षांपासून सुरु असून आजही अविरत आहे.समाजामध्ये ज्या प्रमाणे लग्न लावल्या जातात त्याच प्रमाणे हा संपूर्ण सोहळा असतो. लग्नपत्रिकाऐवजी येथे कार्यक्रम पत्रिका प्रकाशित करुन त्यामध्ये लग्नसोहळयाची वेळ नमूद केल्या जाते. दरवर्षी बारसनिमित्त हा सोहळा पार पडतो. रामनवमीच्या अगोदरच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. याहीवर्षी १२ एप्रिल रोजी संध्याकाळी ७.३० वाजता शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला. यावेळी येथे येणाऱ्या भाविकांच्या स्वागतापासून तर त्यांना अक्षदा देण्याचे कार्य गावकरी करतात. लग्न सोहळा आटोपल्यानंतर पंगता बसविण्यात येतात. यामध्ये हजारो भाविक सहभागी असतात. या कार्यक्रमाचा विडा गावातील अनिल बळीराम राऊत, मनोहर ज्ञानदेव वानखडे, ओकांर शंकरराव राऊत, मोहन विठ्ठल्राव राऊत यांनी उचलला होता. विशेष म्हणजे या लग्नसोहळयाची तयारी एक महिन्यापूर्वीपासून सुरु होते. या तयारीसाठी श्री क्षेत्र महादेव संस्थान ईचा नागीचे सर्व विश्वस्त व भाविक प्रयत्नशिल असतात.या कार्यक्रमानिमित्त भव्य यात्रा व महाप्रसाद कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येते. यावर्षी ९ एप्रिल ते १३एप्रिलपर्यंत श्रीमद भागवत कथा घेण्यात आली. विविध नामांकित मान्यवरांची किर्तने यावेळी पार पडली. १४ ते १६ विविध किर्तनकारांची किर्तने व १६ एप्रिल रोजी शिवपार्वती पूजा , महाआरती व नंतर महाप्रसाद कार्यक्रम आयोजित आहे.या कार्यक्रमात भाविकांनी उपस्थित राहून याचा लाभ घेण्याचे आवाहन ईचा नागी येथील शिव पार्वती मंदिर संस्थानच्यावतिने करण्यात आले आहे.

शेकडो वर्षापासून लागतेय लग्नमंगरुळपीर तालुक्यातील ईचा नागी येथे शिव पार्वती विवाह सोहळयाची परंपरा शेकडो वर्षापूर्वीची असल्याचे भाविक सांगतात. यात्रेत असलेले ९० वर्षिय भाविकांने सांगितले की, मी लहान असतांना सुध्दा या सोहळयासाठी येत होतो. नेमके ही परंपरा कधी सुरु झाली हे सांगता येत नसले तरी शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालु असल्याचे ९० वर्षिय भाविकांच्या सांगण्यावरुन स्पष्ट होत आहे.

 

टॅग्स :washimवाशिमIndian Traditionsभारतीय परंपरा