शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

  गुरुमंदिर संस्थानची अन्नदानाची परंपरा कायम - प्रकाश घुडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 17:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा :  सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येकाने  सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाच्यावतिने गर्दी होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येकाने  सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाच्यावतिने गर्दी होऊ नये यासाठी दिवसरात्र मेहनत घेतल्या जात आहे. परंतु कारोनाच्या पार्श्वभूमिवर गुरुमंदिर संस्थानच्यावतिने दररोज करण्यात येत असलेल्या शेकडो भाविकांना अन्नदान ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली असून भाविकांऐवजी गरजु ३०० लोकांना अन्नदान केल्या जात असल्याचे श्री नृसिंह सरस्वती महाराज (गुरुमंदिर) मंदिराचे विश्वस्त प्रकाश घुडे यांनी मंगळवारी घेतलेल्या मुलाखतीदरमयान सांगितले.

कोराना विषाणुच्या पृष्ठभूमिवर संस्थानचे योगदान?कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर ३०० लोकांना दररोज अन्नदान केल्या जात आहे. संस्थानच्यावतिने शेकडो भाविकांसाठी अन्न शिजविल्या जात होते. परंतु संचारबंदी काळात मंदिरात गर्दी होऊनये याकरिता दर्शन बंद केल्याने भाविकांची गर्दी कमी झाली. दररोज बनविण्यात येत असलेले अन्न अविरत तयार करण्यात येत असून ते गरजुंना पाकीट तयार करुन जागेवर वाटप केल्या जात आहे.

शासनाच्या मदतीच्या आवाहनाबाबत काय सांगाल?कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर संपूर्ण देश संकटात आला आहे यात दुमत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुमंदिर संस्थानच्यावतिने २१ लाख रुपयांची देणगी शासनाला देण्यात आली आहे.

भाविक दर्शनाकरिता मंदिरात येतात का?जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हयातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. परिसरातील काही भाविक दर्शन मंदिरात प्रवेश न करतात बाहेरुन घेतांना दिसून येतात. परंतु प्रशासनाच्या आवाहनानुसार मंदिर केवळ  गुरुंच्या पुजेपुरतेच सद्यस्थितीत आहे. कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

 कोरानाच्या पृष्ठभूमिवर संस्थानच्यावतिने काय सांगाल?देशात आलेले संकट पूर्णपणे नष्ट व्हावे याकरिता दररोज गुरु महाराजांकडे प्रार्थना करण्यात येत आहे. तसेच हि परिस्थिती अशीच कायम राहिल्यास संस्थान शासनाच्या सोबत राहून सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहे.

भाविकांना काय मार्गदर्शन करणार?देशात आलेले कोरोनाच्या संकटात कोणीही घराच्याबाहेर जाऊ नका, देवाची घरात पूजाअर्चा करा. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित आहोत. हे संकट टळल्यानंतर सर्व सुरुळीत होईल यात दुमत नसल्याने संकट टळेपर्यंत घरातच रहा. 

टॅग्स :Karanjaकारंजा