शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

  गुरुमंदिर संस्थानची अन्नदानाची परंपरा कायम - प्रकाश घुडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 17:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा :  सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येकाने  सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाच्यावतिने गर्दी होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येकाने  सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाच्यावतिने गर्दी होऊ नये यासाठी दिवसरात्र मेहनत घेतल्या जात आहे. परंतु कारोनाच्या पार्श्वभूमिवर गुरुमंदिर संस्थानच्यावतिने दररोज करण्यात येत असलेल्या शेकडो भाविकांना अन्नदान ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली असून भाविकांऐवजी गरजु ३०० लोकांना अन्नदान केल्या जात असल्याचे श्री नृसिंह सरस्वती महाराज (गुरुमंदिर) मंदिराचे विश्वस्त प्रकाश घुडे यांनी मंगळवारी घेतलेल्या मुलाखतीदरमयान सांगितले.

कोराना विषाणुच्या पृष्ठभूमिवर संस्थानचे योगदान?कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर ३०० लोकांना दररोज अन्नदान केल्या जात आहे. संस्थानच्यावतिने शेकडो भाविकांसाठी अन्न शिजविल्या जात होते. परंतु संचारबंदी काळात मंदिरात गर्दी होऊनये याकरिता दर्शन बंद केल्याने भाविकांची गर्दी कमी झाली. दररोज बनविण्यात येत असलेले अन्न अविरत तयार करण्यात येत असून ते गरजुंना पाकीट तयार करुन जागेवर वाटप केल्या जात आहे.

शासनाच्या मदतीच्या आवाहनाबाबत काय सांगाल?कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर संपूर्ण देश संकटात आला आहे यात दुमत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुमंदिर संस्थानच्यावतिने २१ लाख रुपयांची देणगी शासनाला देण्यात आली आहे.

भाविक दर्शनाकरिता मंदिरात येतात का?जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हयातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. परिसरातील काही भाविक दर्शन मंदिरात प्रवेश न करतात बाहेरुन घेतांना दिसून येतात. परंतु प्रशासनाच्या आवाहनानुसार मंदिर केवळ  गुरुंच्या पुजेपुरतेच सद्यस्थितीत आहे. कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

 कोरानाच्या पृष्ठभूमिवर संस्थानच्यावतिने काय सांगाल?देशात आलेले संकट पूर्णपणे नष्ट व्हावे याकरिता दररोज गुरु महाराजांकडे प्रार्थना करण्यात येत आहे. तसेच हि परिस्थिती अशीच कायम राहिल्यास संस्थान शासनाच्या सोबत राहून सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहे.

भाविकांना काय मार्गदर्शन करणार?देशात आलेले कोरोनाच्या संकटात कोणीही घराच्याबाहेर जाऊ नका, देवाची घरात पूजाअर्चा करा. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित आहोत. हे संकट टळल्यानंतर सर्व सुरुळीत होईल यात दुमत नसल्याने संकट टळेपर्यंत घरातच रहा. 

टॅग्स :Karanjaकारंजा