शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

  गुरुमंदिर संस्थानची अन्नदानाची परंपरा कायम - प्रकाश घुडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 17:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा :  सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येकाने  सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाच्यावतिने गर्दी होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा :  सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येकाने  सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. पोलीस प्रशासनाच्यावतिने गर्दी होऊ नये यासाठी दिवसरात्र मेहनत घेतल्या जात आहे. परंतु कारोनाच्या पार्श्वभूमिवर गुरुमंदिर संस्थानच्यावतिने दररोज करण्यात येत असलेल्या शेकडो भाविकांना अन्नदान ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली असून भाविकांऐवजी गरजु ३०० लोकांना अन्नदान केल्या जात असल्याचे श्री नृसिंह सरस्वती महाराज (गुरुमंदिर) मंदिराचे विश्वस्त प्रकाश घुडे यांनी मंगळवारी घेतलेल्या मुलाखतीदरमयान सांगितले.

कोराना विषाणुच्या पृष्ठभूमिवर संस्थानचे योगदान?कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर ३०० लोकांना दररोज अन्नदान केल्या जात आहे. संस्थानच्यावतिने शेकडो भाविकांसाठी अन्न शिजविल्या जात होते. परंतु संचारबंदी काळात मंदिरात गर्दी होऊनये याकरिता दर्शन बंद केल्याने भाविकांची गर्दी कमी झाली. दररोज बनविण्यात येत असलेले अन्न अविरत तयार करण्यात येत असून ते गरजुंना पाकीट तयार करुन जागेवर वाटप केल्या जात आहे.

शासनाच्या मदतीच्या आवाहनाबाबत काय सांगाल?कोरोना विषाणुच्या पृष्ठभूमिवर संपूर्ण देश संकटात आला आहे यात दुमत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुमंदिर संस्थानच्यावतिने २१ लाख रुपयांची देणगी शासनाला देण्यात आली आहे.

भाविक दर्शनाकरिता मंदिरात येतात का?जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हयातील सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. परिसरातील काही भाविक दर्शन मंदिरात प्रवेश न करतात बाहेरुन घेतांना दिसून येतात. परंतु प्रशासनाच्या आवाहनानुसार मंदिर केवळ  गुरुंच्या पुजेपुरतेच सद्यस्थितीत आहे. कोणालाही प्रवेश दिला जात नाही.

 कोरानाच्या पृष्ठभूमिवर संस्थानच्यावतिने काय सांगाल?देशात आलेले संकट पूर्णपणे नष्ट व्हावे याकरिता दररोज गुरु महाराजांकडे प्रार्थना करण्यात येत आहे. तसेच हि परिस्थिती अशीच कायम राहिल्यास संस्थान शासनाच्या सोबत राहून सर्वोतोपरी मदत करण्यास तयार आहे.

भाविकांना काय मार्गदर्शन करणार?देशात आलेले कोरोनाच्या संकटात कोणीही घराच्याबाहेर जाऊ नका, देवाची घरात पूजाअर्चा करा. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित आहोत. हे संकट टळल्यानंतर सर्व सुरुळीत होईल यात दुमत नसल्याने संकट टळेपर्यंत घरातच रहा. 

टॅग्स :Karanjaकारंजा