शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आटापिटा

By admin | Updated: January 3, 2017 19:37 IST

राज्य शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांच्या सोयीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजने उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाला आटापिटा करावा लागत आहे.

 ऑनलाइन लोकमत

वाशिम : राज्य शासनाच्या निर्देशानुसार शेतकºयांच्या सोयीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजने उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कृषी विभागाला आटापिटा करावा लागत आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेंतर्गत जिल्ह्यात १९०० शेतकळ्यांचे उद्दिष्ट असताना अद्याप दीडशे शेततळीही पूर्ण होऊ शकली नाहीत.
 दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकºयांना पावसाअभावी नुकसान सहन करावे लागू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अस्तित्वात आणली; परंतु या योजनेतील जाचक व किचकट अटींमुळे जिल्ह्यातील शेतकºयांनी योजनेकडे बहुतांशी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात या योजनेची एप्रिल २०१६ या महिण्यापासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. याअंतर्गत कृषी विभागाला १९०० शेततळ्यांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र, जानेवारी २०१७ च्या पहिल्या आठवड्यापर्र्यंत जिल्ह्यात केवळ १२४ शेत तळी पूर्ण होऊ शकली आहेत. योजनेतील तोकड्या अनुदानामुळे, तसेच शेततळे घेतल्यानंतरही त्याचा फायदा होण्याची शाश्वती नसल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास तयार नाहीत. कृषी विभागाकडे या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज आले असले तरी, प्रत्यक्षात कृषी विभागाच्या सर्वेक्षणादरम्यान बहुतांश शेतकरी या योजनेबाबत उत्सूक नसल्याचे दिसून आले. शेततळ्यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता असते, त्यातच शासनाकडून केवळ ५० हजार रुपये अनुदान मिळते. हे अनुदान शेततळ्याचे खोदकाम केल्यानंतर देण्यात येते. तत्पूर्वी शेतकºयाला स्वत: खर्च करून शेततळे खोदावे लागते. ज्या जागेवर शेततळे खोदण्यास सुरुवात झाली, त्या जागेवर लवकर खडक लागल्यास शेततळ्यासाठी लागणारा खर्च वाढतो आणि तो खर्च शेतक ºयांना स्वत: भरावा लागतो. त्यामुळे अनेक शेतकरी शेततळे घेण्याच्या विचारातच नाहीत.  डिसेंबर महिन्यात प्रशासनाने या योजनेला गती देवून ८६ शेततळ्यांची कामे पूर्ण करून घेतली आहेत. तथापि, उर्वरित तीन महिन्यांत १,७७६ शेततळ्यांची कामे पूर्ण करण्याचे कडवे आव्हान जिल्हा प्रशासनाला पेलावे लागणार असल्याने या योजनेची उद्दिष्ट पूर्ती होणे अशक्यच वाटत आहे.