शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

वीज पडून मायलेकीसह तीन ठार, चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2015 02:40 IST

परतीच्या पावसाची अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, तर वाशिम जिल्ह्यात दमदार हजेरी.

अकोला : परतीच्या पावसाने अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, तर वाशिम जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात वीज कोसळून मायलेकीसह तीन जण ठार, तर चार जण जखमी झाले. वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. रिसोड तालुक्यातील किनखेडा येथील राजेश पांडूरंग देशमुख यांच्या शेतात सोयाबिन काढणीचे काम सुरू झाल्याने, अचानक पावसाला सुरूवात झाल्याने, शेत मालक व पाच मजूर शेतातीलच झाडाखाली छत्री घेवून उभे होते. त्याचवेळी झाडावर वीज कोसळली. या झाडाखाली किनखेडा येथील संगीता राजेश देशमुख (वय ४५), रितेश राजेश देशमुख (वय १३), दुर्गा किसन अवचार (वय ५५) आणि पेडगाव येथील रूपाली मोहन अंभोरे (वय १२) व उज्वला मोहन अंभोरे (वय ४५), रचना राजू तुरूकमाने (वय ३0) हे सहा जण उभे होते. त्यापैकी उज्वला मोहन अंभोरे आणि त्यांची मुलगी रचना राजू तुरूकमाने यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले. सर्वांना रिसोड येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी दोघींना मृत घोषित केले. चार जखमींवर वाशिम येथे उपचार सुरू आहेत. रचना राजू तुरूकमाने ही मेहकर तालुक्यातील परतापूर येथील रहिवासी असून, ती पेडगाव येथे माहेरी आली होती. ती आईसोबत शेतात मजुरीला गेली असता, दोघींचाही वीज पडल्याने मृत्यू झाला. वीज कोसळून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथे दुपारी घडली. अडोळी येथील शेतकरी रामदास तुकाराम इढोळे (वय ४५) हे शेतात सोयाबिन काढणीचे काम करीत असताना, दुपारी ४ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतातील मजूर कुटाराच्या ढिगाजवळ जावून उभे राहीले, तर रामदास इढोळे यांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. त्याचवेळी वीज पडल्याने इढोळे यांचा मृत्यू झाला.