शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

वीज पडून मायलेकीसह तीन ठार, चार जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2015 02:40 IST

परतीच्या पावसाची अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, तर वाशिम जिल्ह्यात दमदार हजेरी.

अकोला : परतीच्या पावसाने अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, तर वाशिम जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात वीज कोसळून मायलेकीसह तीन जण ठार, तर चार जण जखमी झाले. वाशिम जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. रिसोड तालुक्यातील किनखेडा येथील राजेश पांडूरंग देशमुख यांच्या शेतात सोयाबिन काढणीचे काम सुरू झाल्याने, अचानक पावसाला सुरूवात झाल्याने, शेत मालक व पाच मजूर शेतातीलच झाडाखाली छत्री घेवून उभे होते. त्याचवेळी झाडावर वीज कोसळली. या झाडाखाली किनखेडा येथील संगीता राजेश देशमुख (वय ४५), रितेश राजेश देशमुख (वय १३), दुर्गा किसन अवचार (वय ५५) आणि पेडगाव येथील रूपाली मोहन अंभोरे (वय १२) व उज्वला मोहन अंभोरे (वय ४५), रचना राजू तुरूकमाने (वय ३0) हे सहा जण उभे होते. त्यापैकी उज्वला मोहन अंभोरे आणि त्यांची मुलगी रचना राजू तुरूकमाने यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले. सर्वांना रिसोड येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी दोघींना मृत घोषित केले. चार जखमींवर वाशिम येथे उपचार सुरू आहेत. रचना राजू तुरूकमाने ही मेहकर तालुक्यातील परतापूर येथील रहिवासी असून, ती पेडगाव येथे माहेरी आली होती. ती आईसोबत शेतात मजुरीला गेली असता, दोघींचाही वीज पडल्याने मृत्यू झाला. वीज कोसळून एका शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथे दुपारी घडली. अडोळी येथील शेतकरी रामदास तुकाराम इढोळे (वय ४५) हे शेतात सोयाबिन काढणीचे काम करीत असताना, दुपारी ४ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतातील मजूर कुटाराच्या ढिगाजवळ जावून उभे राहीले, तर रामदास इढोळे यांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. त्याचवेळी वीज पडल्याने इढोळे यांचा मृत्यू झाला.