शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

कृषीचे तिन्ही विभाग ‘प्रभारी’

By admin | Updated: September 24, 2015 01:21 IST

कृषी विकास अधिकारी रूजूच झाले नाही; 'आत्मा'ला प्रतीक्षा.

वाशिम : शेतकर्‍यांशी निगडीत असलेल्या कृषी यंत्रणेच्या तीनही विभागाची जबाबदारी वाशिम जिल्ह्यात प्रभारींच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. कृषी विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि आत्मा कार्यालयाचे प्रकल्प संचालक या तीनही विभाग प्रमुखांच्या बदल्या झाल्याने आणि नवीन विभागप्रमुख आले नसल्याने तीनही विभाग ह्यप्रभारीह्ण झाले आहेत. कृषीविषयक योजना पात्र शेतकर्‍यांपर्यंंंत पोहचविणे, हेक्टरनिहाय पीक नियोजन, आपतकालिन परिस्थितीत शेतकर्‍यांना मार्गदर्शन यासह विविध कामांची जबाबदारी कृषी विभागावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची जबाबदारी कृषी विकास अधिकारी, राज्याच्या कृषी विभागाची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि शासनाच्या आत्मा या संस्थेची जबाबदारी प्रकल्प संचालक दर्जाच्या अधिकार्‍यांवर सोपविण्यात आली आहे. कृषी विकास अधिकारी म्हणून चंद्रकांत सुर्यवंशी यांनी डिसेंबर २0११ पासून पदभार स्वीकारला होता. जिल्हा परिषदेचे ते १८ वे कृषी विकास अधिकारी होते. सव्वा तीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी विशेष घटक योजना, कृषीपंप जोडणी, सिंचन विहिर, सौरऊर्जा यासह कृषी विभागाच्या योजनांचा निधी वाढवून आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. जून महिन्यात त्यांची बदली कोल्हापूर जिल्हा परिषदेत समकक्ष पदावर झाली. सुर्यवंशी यांच्या जागेवर परभणी येथून पी.जी.कुळकर्णी यांची बदली जून महिन्यातच झाली होती. मात्र, कुळकर्णी अद्यापही रूजू झाले नसल्याने तुर्तास या पदाचा प्रभार जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) अभिजित देवगिरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. देवगिरकर यांनी शेतकर्‍यांना मोबाईलवर संदेश देणारी व्यवस्था कार्यान्वित केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांची एक महिन्यापूर्वी बदली झाली. तेव्हापासून सदर पद रिक्त आहे. चव्हाण यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र, या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा तक्रारी जिल्हाधिकार्‍यांकडे अनेकांनी केल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या तक्रारीमुळे चव्हाण यांचा कार्यकाळ विशेष गाजला आहे. आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा प्रभार उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक विजय चव्हाळे यांची जून महिन्यात बदली झाली. तेव्हापासून सदर पद रिक्त आहे. चव्हाळे यांनी शेतकरी बचत गटांची मोट बांधून शासनाच्या अनेक योजना जिल्ह्यात खेचून आणल्या आहेत. चव्हाळे यांच्या बदलीनंतर येथे अद्याप कुणीही रूजू झाले नाही. तुर्तास या पदाचा प्रभार आत्माचे उपसंचालक वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.