शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कृषीचे तिन्ही विभाग ‘प्रभारी’

By admin | Updated: September 24, 2015 01:21 IST

कृषी विकास अधिकारी रूजूच झाले नाही; 'आत्मा'ला प्रतीक्षा.

वाशिम : शेतकर्‍यांशी निगडीत असलेल्या कृषी यंत्रणेच्या तीनही विभागाची जबाबदारी वाशिम जिल्ह्यात प्रभारींच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. कृषी विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि आत्मा कार्यालयाचे प्रकल्प संचालक या तीनही विभाग प्रमुखांच्या बदल्या झाल्याने आणि नवीन विभागप्रमुख आले नसल्याने तीनही विभाग ह्यप्रभारीह्ण झाले आहेत. कृषीविषयक योजना पात्र शेतकर्‍यांपर्यंंंत पोहचविणे, हेक्टरनिहाय पीक नियोजन, आपतकालिन परिस्थितीत शेतकर्‍यांना मार्गदर्शन यासह विविध कामांची जबाबदारी कृषी विभागावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची जबाबदारी कृषी विकास अधिकारी, राज्याच्या कृषी विभागाची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि शासनाच्या आत्मा या संस्थेची जबाबदारी प्रकल्प संचालक दर्जाच्या अधिकार्‍यांवर सोपविण्यात आली आहे. कृषी विकास अधिकारी म्हणून चंद्रकांत सुर्यवंशी यांनी डिसेंबर २0११ पासून पदभार स्वीकारला होता. जिल्हा परिषदेचे ते १८ वे कृषी विकास अधिकारी होते. सव्वा तीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी विशेष घटक योजना, कृषीपंप जोडणी, सिंचन विहिर, सौरऊर्जा यासह कृषी विभागाच्या योजनांचा निधी वाढवून आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. जून महिन्यात त्यांची बदली कोल्हापूर जिल्हा परिषदेत समकक्ष पदावर झाली. सुर्यवंशी यांच्या जागेवर परभणी येथून पी.जी.कुळकर्णी यांची बदली जून महिन्यातच झाली होती. मात्र, कुळकर्णी अद्यापही रूजू झाले नसल्याने तुर्तास या पदाचा प्रभार जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) अभिजित देवगिरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. देवगिरकर यांनी शेतकर्‍यांना मोबाईलवर संदेश देणारी व्यवस्था कार्यान्वित केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांची एक महिन्यापूर्वी बदली झाली. तेव्हापासून सदर पद रिक्त आहे. चव्हाण यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र, या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा तक्रारी जिल्हाधिकार्‍यांकडे अनेकांनी केल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या तक्रारीमुळे चव्हाण यांचा कार्यकाळ विशेष गाजला आहे. आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा प्रभार उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक विजय चव्हाळे यांची जून महिन्यात बदली झाली. तेव्हापासून सदर पद रिक्त आहे. चव्हाळे यांनी शेतकरी बचत गटांची मोट बांधून शासनाच्या अनेक योजना जिल्ह्यात खेचून आणल्या आहेत. चव्हाळे यांच्या बदलीनंतर येथे अद्याप कुणीही रूजू झाले नाही. तुर्तास या पदाचा प्रभार आत्माचे उपसंचालक वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.