शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

कृषीचे तिन्ही विभाग ‘प्रभारी’

By admin | Updated: September 24, 2015 01:21 IST

कृषी विकास अधिकारी रूजूच झाले नाही; 'आत्मा'ला प्रतीक्षा.

वाशिम : शेतकर्‍यांशी निगडीत असलेल्या कृषी यंत्रणेच्या तीनही विभागाची जबाबदारी वाशिम जिल्ह्यात प्रभारींच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे. कृषी विकास अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि आत्मा कार्यालयाचे प्रकल्प संचालक या तीनही विभाग प्रमुखांच्या बदल्या झाल्याने आणि नवीन विभागप्रमुख आले नसल्याने तीनही विभाग ह्यप्रभारीह्ण झाले आहेत. कृषीविषयक योजना पात्र शेतकर्‍यांपर्यंंंत पोहचविणे, हेक्टरनिहाय पीक नियोजन, आपतकालिन परिस्थितीत शेतकर्‍यांना मार्गदर्शन यासह विविध कामांची जबाबदारी कृषी विभागावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची जबाबदारी कृषी विकास अधिकारी, राज्याच्या कृषी विभागाची जबाबदारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि शासनाच्या आत्मा या संस्थेची जबाबदारी प्रकल्प संचालक दर्जाच्या अधिकार्‍यांवर सोपविण्यात आली आहे. कृषी विकास अधिकारी म्हणून चंद्रकांत सुर्यवंशी यांनी डिसेंबर २0११ पासून पदभार स्वीकारला होता. जिल्हा परिषदेचे ते १८ वे कृषी विकास अधिकारी होते. सव्वा तीन वर्षाच्या कालावधीत त्यांनी विशेष घटक योजना, कृषीपंप जोडणी, सिंचन विहिर, सौरऊर्जा यासह कृषी विभागाच्या योजनांचा निधी वाढवून आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. जून महिन्यात त्यांची बदली कोल्हापूर जिल्हा परिषदेत समकक्ष पदावर झाली. सुर्यवंशी यांच्या जागेवर परभणी येथून पी.जी.कुळकर्णी यांची बदली जून महिन्यातच झाली होती. मात्र, कुळकर्णी अद्यापही रूजू झाले नसल्याने तुर्तास या पदाचा प्रभार जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) अभिजित देवगिरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. देवगिरकर यांनी शेतकर्‍यांना मोबाईलवर संदेश देणारी व्यवस्था कार्यान्वित केली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांची एक महिन्यापूर्वी बदली झाली. तेव्हापासून सदर पद रिक्त आहे. चव्हाण यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. मात्र, या कामांमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा तक्रारी जिल्हाधिकार्‍यांकडे अनेकांनी केल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियानातील कामांच्या तक्रारीमुळे चव्हाण यांचा कार्यकाळ विशेष गाजला आहे. आता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा प्रभार उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आत्मा संस्थेचे प्रकल्प संचालक विजय चव्हाळे यांची जून महिन्यात बदली झाली. तेव्हापासून सदर पद रिक्त आहे. चव्हाळे यांनी शेतकरी बचत गटांची मोट बांधून शासनाच्या अनेक योजना जिल्ह्यात खेचून आणल्या आहेत. चव्हाळे यांच्या बदलीनंतर येथे अद्याप कुणीही रूजू झाले नाही. तुर्तास या पदाचा प्रभार आत्माचे उपसंचालक वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.