शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

गटारे तुडवत हजारो प्रवाशांची बसमध्ये चढ-उतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

जिल्ह्यात मंगरूळपीर, कारंजा, वाशिम आणि रिसोड येथे चार मुख्य बसस्थानके, तर मानोरा आणि मालेगावातही प्रवाशांची चढ-उतर करण्यासाठी बसस्थानके उभारण्यात ...

जिल्ह्यात मंगरूळपीर, कारंजा, वाशिम आणि रिसोड येथे चार मुख्य बसस्थानके, तर मानोरा आणि मालेगावातही प्रवाशांची चढ-उतर करण्यासाठी बसस्थानके उभारण्यात आली आहेत. त्यापैकी केवळ मंगरूळपीर येथील बसस्थानक परिसरातील डांबरीकरण गेल्या ३५ वर्षांपासून अद्यापही बव्हंशी सुस्थितीत आहे, तर इतर सर्वच ठिकाणी डांबरीकरणाचा आता पत्ताच नसून, परिसरात ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून गटारे तयार होत असल्याने विविध ठिकाणी प्रवास करणारे हजारो प्रवासी गटारे तुडवतच बसमध्ये चढ-उतर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

----------------

जिल्ह्यातून धावणाऱ्या एकूण बसफेऱ्या- ३४९

जिल्ह्यातील एकूण आगार- ०४

जिल्ह्यातील एकूण बसस्थानके- ०६

जिल्ह्यातील एसटी बसची संख्या- १८६

-----------

आगारनिहाय एसटी बस

आगार- एकूण बस

मंगरूळपीर- ४३

वाशिम- ४९

कारंजा- ४८

रिसोड- ४५

----------------------

फलाटावरही पसरते घाण

बसस्थानक परिसरात डांबरीकरण नसल्याने बसगाड्यांभोवतालच्या जागेत गटारे साचतात. या गटारातूनच प्रवाशांना ये-जा करावी लागते. त्यामुळे चपला, जोड्यांना चिखल, घाण चिकटून ती बसस्थानकात फलाटापर्यंत पसरते. त्यामुळे फलाटांवरही सतत घाण साचत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

------

जंतूसंसर्गाला वाव, आरोग्याला धोका

बसस्थानक परिसरात साचणारी गटारे आणि त्यामुळे फलाटावर पसरणाऱ्या घाणीतून डास, माशांची उत्पत्ती वाढते आणि यातूनच जंतू, विषाणूचा प्रादुर्भावही वाढत असल्याने येथे बसगाड्यांची प्रतीक्षा करीत बसणाऱ्या हजारो प्रवाशांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होत आहे.

---------------

घाणीमुळे प्रवाशांना एसटी नकोशी

कोट :

वाशिम येथील बसस्थानक परिसरात फूटभर जागाही पाय ठेवण्यासारखी राहिली नाही. सर्वत्र पाणी साचून गटार तयार झाले आहे. या बसस्थानकावर बसमधून उतरताना आणि चढतानाही गटार तुडवत जावे लागते. त्यामुळे पावसाळ्यात एसटीचा प्रवास नकोसा वाटतो.

-विजय आसरे, प्रवासी

---------

कोट :

गेल्या १५ वर्षांपासून कारंजा बसस्थानक परिसरातील डांबरीकरण नाहीसे झाल्याने येथे पावसाळ्यात गटारे साचतात, तर उन्हाळ्यात धुळीचे लोळ उडतात त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतो. परिसराची डागडुजी मात्र केली जात नाही.

-राजेश मोखडकर, प्रवासी

----------------------

आगार व्यवस्थापकांचा पाठपुरावा

कोट :

वाशिम येथील बसस्थानक परिसरातील डांबरीकरण नाहीसे झाले आहे. या परिसरात डांबरीकरण करण्यासाठी विभाग स्तरावर नियमित पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू असतो; परंतु अद्याप त्या स्तरावरून कामाबाबतचा निर्णय झाला नाही.

-विनोद इलामे,

आगार व्यवस्थापक, वाशिम

-----------------

कोट : बसस्थानक परिसरात डांबरीकरण करून परिसर सुसज्ज करण्यासाठी आमचा वरिष्ठ स्तरावर नियमित पाठपुरावा सुरू असतो. प्रवाशांना त्रास होऊ नये, अशी आमचीही इच्छा आहे; परंतु याबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरूनच होतो.

-मुकुंद न्हावकर,

आगार व्यवस्थापक, कारंजा