शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

मजीप्राच्या वाहिनीतून हजारो लीटर पाण्याचा अपव्यय!

By admin | Updated: March 14, 2016 02:04 IST

एअर व्हॉल्व्हही नादुरुस्त; अधिका-यांचे दुर्लक्ष!

तळप बु. (जि. वाशिम): मानोरा तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण २८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यरत असून, योजनेची जलवाहिनी पसिरात अनेक ठिकाणी फुटली असल्यामुळे वारंवार पाइपलाइन फुटून त्यामधून हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्याशिवाय एअर व्हॉल्व्हही नादुरुस्त असल्यामुळे बर्‍याच ठिकाणी पाणी वाया जात आहे. याबाबत संबंधित विभागांना माहिती असूनही त्यांच्याकडून त्याची दखल घेतली जात नाही. परिणामी या योजनेत समाविष्ट गावांतील जनतेला कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.मानोरा तालुक्यातील २८ गावातील पाणीपुरवठा कायमचा निकाली काढण्याच्या उद्देशाने सन २00७ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण २८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा अस्तित्वात आली. २८ गावासाठी ही योजना अस्तित्वात आली असली तरी आज रोजी तळप, कार्ली, रामतीर्थ, सेवादासनगर, पाळोदी आणि आसोला खुर्द या १५ गावामध्येच पाणीपुरवठा सुरू आहे आणि या १५ गावांना ही योजना आज वरदान ठरत आहे. कारण या १५ गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या अन्य पाणीपुरवठा योजना सक्षम नसल्यामुळे सदरहून योजनाच या गावांची तहान भागवित आहे; परंतु या योजनेची पाइपलाइन नदी-नाल्यामध्ये आणि अन्य ठिकाणी भागववित आहे. परंतु या योजनेची पाइपलाइन नदी-नाल्यामध्ये आणि अन्य ठिकाणी उघडी असल्यामुळे वारंवार पाइपलाइन फुटून या गावांचा पाणी पुरवठा खंडित होतो. तळप बु. ग्रा.पं. पाणीपुरवठा पाण्याअभावी बंद असून, याच योजनेवर हे गाव अवलंबून आहे; परंतु गावालगत एका नाल्यामध्ये पाइपलाइन उघडी असल्यामुळे त्या ठिकाणी पाइपलाइन फुटून वारंवार पाणीपुरवठा खंडित होतो. तेथे सिमेंट काँक्रिटीकरण करणे आवश्यक असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभाग कारंजा यांच्याकडून त्याकडे साफ दुर्लक्ष हाते आहे तसेच दिग्रस शहरानजीक एका नाल्यामध्ये पाइपलाइन उघडी पडली आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर येऊन अनेक वेळा पाइपलाइन वाहून गेलेली आहे.