शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

मजीप्राच्या वाहिनीतून हजारो लीटर पाण्याचा अपव्यय!

By admin | Updated: March 14, 2016 02:04 IST

एअर व्हॉल्व्हही नादुरुस्त; अधिका-यांचे दुर्लक्ष!

तळप बु. (जि. वाशिम): मानोरा तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण २८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यरत असून, योजनेची जलवाहिनी पसिरात अनेक ठिकाणी फुटली असल्यामुळे वारंवार पाइपलाइन फुटून त्यामधून हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्याशिवाय एअर व्हॉल्व्हही नादुरुस्त असल्यामुळे बर्‍याच ठिकाणी पाणी वाया जात आहे. याबाबत संबंधित विभागांना माहिती असूनही त्यांच्याकडून त्याची दखल घेतली जात नाही. परिणामी या योजनेत समाविष्ट गावांतील जनतेला कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.मानोरा तालुक्यातील २८ गावातील पाणीपुरवठा कायमचा निकाली काढण्याच्या उद्देशाने सन २00७ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण २८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा अस्तित्वात आली. २८ गावासाठी ही योजना अस्तित्वात आली असली तरी आज रोजी तळप, कार्ली, रामतीर्थ, सेवादासनगर, पाळोदी आणि आसोला खुर्द या १५ गावामध्येच पाणीपुरवठा सुरू आहे आणि या १५ गावांना ही योजना आज वरदान ठरत आहे. कारण या १५ गावांमध्ये अस्तित्वात असलेल्या अन्य पाणीपुरवठा योजना सक्षम नसल्यामुळे सदरहून योजनाच या गावांची तहान भागवित आहे; परंतु या योजनेची पाइपलाइन नदी-नाल्यामध्ये आणि अन्य ठिकाणी भागववित आहे. परंतु या योजनेची पाइपलाइन नदी-नाल्यामध्ये आणि अन्य ठिकाणी उघडी असल्यामुळे वारंवार पाइपलाइन फुटून या गावांचा पाणी पुरवठा खंडित होतो. तळप बु. ग्रा.पं. पाणीपुरवठा पाण्याअभावी बंद असून, याच योजनेवर हे गाव अवलंबून आहे; परंतु गावालगत एका नाल्यामध्ये पाइपलाइन उघडी असल्यामुळे त्या ठिकाणी पाइपलाइन फुटून वारंवार पाणीपुरवठा खंडित होतो. तेथे सिमेंट काँक्रिटीकरण करणे आवश्यक असतानाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभाग कारंजा यांच्याकडून त्याकडे साफ दुर्लक्ष हाते आहे तसेच दिग्रस शहरानजीक एका नाल्यामध्ये पाइपलाइन उघडी पडली आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर येऊन अनेक वेळा पाइपलाइन वाहून गेलेली आहे.