शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

वाशिम जिल्ह्यातील ‘त्या’ पाणी पुरवठा योजनांना मिळणार ‘सौर ऊर्जा’ - राजेंद्र पाटणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 19:37 IST

वाशिम जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी दिली

ठळक मुद्देआमदार पाटणी यांच्या प्रयत्नांना यश ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड - जिल्ह्यातील अतिशय महत्वाच्या असलेल्या भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेंद्र पाटणी यांनी शनिवारी दिली.ग्रामीण भागात ग्राम पंचायतींकडे वीज देयकाची थकबाकी असल्यामुळे व वीजेच्या प्रश्नातून सोडवणूक करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर बसविण्यात याव्या अशी मागणी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांनी उर्जा मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचेकडे केली होती. त्या अनुषंगाने विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा अमरावती यांनी सौर उर्जा पंपाकरिता वाशिम जिल्हा परिषद तसेच भुजल सर्वेक्षण विभागामार्फत सदर योजनेकरिता जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश दिले असुन संबंधित ग्रामपंचायत मार्फत आलेला प्रस्ताव तातडीने पाठविण्यासाठी आदेशीत केले आहे. यासाठी शासनाने निधी उपलब्ध केला असुन निवड झालेल्या  ग्रामपंचायतींचे काम तातडीने सुरू होणार आहे. उन्हाळ्यापुर्वी निवड झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना याचा लाभ मिळणार असल्याचे पाटणी यांनी सांगितले. भामदेवी, जऊळका रेल्वे, चांडस, दुबळवेल, वनोजा, करडा, चिचांबाभर या ९ पाणी पुरवठा योजनांचा समावेश सौर ऊर्जेवर करण्यासंदर्भात ऊर्जामंत्र्यांशी चर्चा केली होती. सौर ऊर्जा योजना मंजुर झाल्यास सलग १२ तास ग्रामीण भागात पाणी पुरवठा होणार आहे.  अपारंपरिक ऊर्जा संवर्धनासाठी राज्यात सौर ऊर्जा धोरण तयार करण्यात येत असून येत्या पाच वर्षात १४ हजार ४०० मेगॉव्हॅट वीज निर्मितीसह ४० लाख कृषीपंप सौर ऊर्जेवर आणण्यात येणार असल्याचे ऊर्जा व नवीकरणीय ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले असे पाटणी यांना प्रसिद्धी पत्रकात म्हटले.  सौर ऊर्जच्या माध्यमातून वीज देयकामध्ये ५० टक्के बचत होत असल्यामुळे सौर ऊर्जेसह अपारंपारिक ऊर्जेचा वापरासाठी शासनाने नवीन धोरण ठरविले आहे. शेतकºयांच्या शेतात पाणी असूनही वीज नसल्यामुळे पीक वाचवू शकत नाहीत. या नैराश्यातून शेतकºयांच्या बहुतांश आत्महत्या झाल्या आहेत. अशा शेतकºयांच्या कुटुंबियांना अत्यंत अल्पदरात सौर कृषी पंप देण्यात यावा तसेच विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी पाटणी यांनी ना.बावनकुळे यांचेकडे केली होती. 

टॅग्स :Rajendra Patniराजेंद्र पाटणीWaterपाणी