शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

टँकरद्वारे भागविल्या जातेय ग्रामस्थांची तहान

By admin | Updated: May 15, 2015 00:43 IST

वाशिम जिल्हय़ातील ११ गावांचा समावेश; १४ खासगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा.

वाशिम : जिल्हय़ात जाणवत असलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने उपाय योजना करण्यात येत आहेत. जिल्हय़ात १३ मे पर्यंत टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या गावांची संख्या १४ असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रशासनाच्यावतीने ४१ खासगी विहिरींचे अधिग्रहण करून या विहिरींवरुन ३६ गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केल्या जात आहे तर ११ गावे व १ वाडीकरिता १४ टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. जिल्हय़ात उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्यासाठी पाणीटंचाई आराखड्यानुसार जानेवारी २0१५ ते जून २0१५ या सहा महिन्यांमध्ये जिल्हय़ातील ४३९ गावांमध्ये ६0१ विविध उपाययोजना राबविण्याबाबत कृती आराखडा तयार करण्यात आला होता; तसेच मंजूर आराखड्यातील प्रस्तावित १0८ गावातील १0९ विहीर खोलीकरणापैकी सर्व गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, योग्य असलेल्या ९४ गावातील ९५ अंदाजपत्रकीय प्रस्ताव मंजुरीस सादर करण्यात आले. यापैकी ५१ गावातील ५१ प्रस्ताव मंजुरीस फेरसादर करण्यात आले आहेत. जिल्हय़ातील १४ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या गावांमध्ये वाशिम तालुक्यातील माळेगाव, वाळकी जहागीर, रिसोड तालुक्यातील करंजी, मानोरा तालुक्यातील उज्ज्वल नगर, जामदरा, पारधी तांडा, खंडाळा, पाळोदी, हिवरा खु. व एक वाडीचा समावेश आहे. कारंजा तालुक्यातील यावर्डी, मालेगाव तालुक्यातील वाकद, मालेगाव जहा. या ११ गावे व १ वाडीमध्ये १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.