शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ते कच-यात शोधतात 'भाकरी’ !

By admin | Updated: August 17, 2016 15:05 IST

प्रत्येक कुटूंब आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी घरातील टाकाऊ कचरा उकिरड्यावर फेकतात, परंतु समाजातील एक घटक असाही आहे, की तो याच कच-यात आपली ‘भाकर’ शोधत असतो.

शिखरचंद बागरेचा
वाशिम, दि. १७ -  प्रत्येक कुटूंब आपले घर स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने घरात जमा झालेला टाकाऊ कचरा आणि घाण उकिरडयावर  फेकतात. त्यांच्या ठायी या कच-याची काहीच किंमत नसते; परंतु समाजातील एक घटक असाही आहे, की तो याच कच-यात आपली ‘भाकर’ शोधत असतो. ही गमतीची किंवा आश्चर्याची बाब नव्हे, तर समाजातील अतिशय विदारक आणि विषमतेची प्रचिती देणारे वास्तव आहे. या विदारकतेचा प्रत्यय वाशिम शहरात येत आहे. 
नगर परिषदेच्या घंटागाड्या शहरातील विविध ठिकाणचा कचरा गोळा करून पुसद मार्गानजिक असलेल्या खुल्या जागेत टाकतात.  या कचºयाकडे सुज्ञ किंवा समजदार माणूस पाहणार सुद्धा नाही; परंतु हा अगदी चुकीचा समज आहे. नगर परिषदेच्या घंटागाड्या येथे कचरा टाकण्यासाठी येतात. त्यावेळी समाजाच्या उपेक्षीत आणि अत्यंत दारिद्रयात जीवन कंठणा-या कुटुंबातील मोठी माणसे नव्हे, तर अल्पवयीन बालके या घंटागाड्याच्या मागे धावत जातात. जवळपास ८ ते १० मुले, मुलींचा हा घोळका या कच-याच्या गाडीवर अक्षरश: तुटून पडतो. कचरा गाडीतून खाली पडायच्या आधीच त्या कचºयातून आपल्यासाठी उपयुक्त असे काही शोधण्यास सुरुवात करतात. आता ही मुले कच-यात शोधतात तरी, काय हा प्रश्न सर्वांना पडणे साहजिक आहे, कारण कच-यातून जिवजंतूमुळे संसर्ग होऊन आजार होण्याची आणि शरीरावर घाणच साचू शकते. मग हे माहित असतानाही ही मुले त्याची पर्वा न करता कच-यातील विविध वस्तू उचलतात. यामध्ये प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, इतर भंगार ते शोधून आणि त्याची विक्री करून दिवसाच्या जेवणाची सोय लावण्याचा हा त्यांचा प्रयत्न. दूरून हे दृष्य पाहणा-यांना कदाचित किळस येत असेल; परंतु हे त्यांचे जीवन बनले आहे. एकिकडे स्वत:च्या अय्याशीसाठी भ्रष्टाचार करणारे अधिकारी, कर्मचारी आणि चोरी, दरोडे टाकून निष्पापांची मालमत्ता बळकावणारे लोक जगात उजळ माथ्याने जगतात. कुठलाही समाज चोरी किंवा भ्रष्टाचाराला मान्यता देत नसतानाही आपल्या कूकृत्यांचे समर्थन करून उजळ माथ्याने जगतात. विचार करायचा झाला, तर आईवडिलांची दयनीय परिस्थिती लक्षात घेत स्वाभिमान जीवंत ठेवून आणि कुठलेही गैरकृत्य न करता घाणीतून आपली भाकर शोधणाºया या चिमुकल्यांची सर्वांनाच दया यायला हवी; परंतु समाज मात्र भ्रष्टाचार आणि चोºया करून बंगल्यात राहणा-यांना सन्मान देतो आणि अतिशय निरूपद्रवी असलेल्या आणि घाणीतच जगणा-या समाजाकडे मात्र तुच्छ नजरेने पाहतो. हे कटू सत्य अनाकलनीय आहे.