शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड तालुक्यात ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणीच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 14:24 IST

रिसोड : ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या  ११ कलमी कार्यक्रमाची रिसोड तालुक्यात अंमलबजावणी नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रलंबित असल्याने पंचायत समिती सभापती-उपसभापतींसह सदस्यही आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात सन २०१४ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक कामे अपूर्ण आहेत.ही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक चालढकल करून विकास कामांना खीळ घालत असल्याचा आरोप पंचायत समिती सभापतींसह सदस्यांनी केला.जिल्ह्यातील सहा पंचायत समितीच्या जवळपास ३५ ते ४० सदस्यांनी गृह राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्याशी चर्चा केली. 

रिसोड : ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या  ११ कलमी कार्यक्रमाची रिसोड तालुक्यात अंमलबजावणी नाही तसेच रोजगार हमी योजनेंतर्गतची कामे प्रलंबित असल्याने पंचायत समिती सभापती-उपसभापतींसह सदस्यही आक्रमक झाले आहेत. यासंदर्भात पंचायत समितीच्या पदाधिकाºयांनी २६ डिसेंबरला गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

वाशिम जिल्ह्यात सन २०१४ पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक कामे अपूर्ण आहेत. यामध्ये नाला सरळीकरण, पाणंद रस्ते, सिंचन विहिरींसह इतर विकासात्मक कामांचा समावेश आहे. ही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक चालढकल करून विकास कामांना खीळ घालत असल्याचा आरोप पंचायत समिती सभापतींसह सदस्यांनी गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केला. डॉ. पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला अपूर्ण कामे त्वरित सुरू करून फडणवीस सरकारच्या ग्रामीण विकासाला मोठा हातभार लावणाºया महत्वाकांक्षी अशा ११ कलमी कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना फोनद्वारे दिले, अशी माहिती पंचायत समितीच्या सभापती छाया सुनील पाटील यांनी दिली. रिसोड पंचायत समितीच्या यशोदा भाग्यवंत, ज्योती मोरे, अंजली शिंदे, मंगला खरात, कमल करंगे, कावेरी अवचार, चंद्रकला बांगरे, श्रीकांत कोरडे, एकनाथ घुकसे, नंदुभाऊ घुगे या पंचायत समिती सदस्यांसह जिल्ह्यातील सहा पंचायत समितीच्या जवळपास ३५ ते ४० सदस्यांनी गृह राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्याशी चर्चा केली. 

लवकरच वाशिम जिल्यातील सर्व पंचायत समिती सभापतींसह दहा सदस्यांची विशेष बैठक मंत्रालयात घेण्यात येणार असून या बैठकीला मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, रोजगार हमी मंत्री ना.जयकुमार रावल आदींची उपस्थिती राहिल, अशी ग्वाही गृह राज्यमंत्री  डॉ.रणजित पाटील यांनी दिली, असेही सभापती छाया पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम