शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डॉक्टर दारीही नाही अन् गावातही नाही ..

By admin | Updated: June 16, 2014 00:41 IST

मात्र, ग्रामीण भागातील बर्‍याच गावामध्येच डॉक्टर नाही तर घरी कधी येणार?

रिसोड : ग्रामीण भागात गोरगरिबांना खासगी वैयक्तिक सेवा परवडत नाही. त्यामुळे शासनाने गरिबांना वेळीच उपचार मिळावे या हेतूने ह्यडॉक्टर आपला घरीह्ण ही अभिनव योजना सुरू केली होती. मात्र, ग्रामीण भागातील बर्‍याच गावामध्येच डॉक्टर नाही तर घरी कधी येणार? हा प्रश्न जनतेला पडत आहे. शासनाच्या वतीने बर्‍याच गावात आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. छोट्या-छोट्या आजारांसाठी त्यांना खासगी डॉक्टरशिवाय पर्याय राहत नाही. तालुक्याचे ठिकाणी शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी तेवढा वेळ नसल्याने तसेच शासकीय रुग्णालयात रुग्णांची होत असलेली हेळसांड व निष्काळजीपणामुळेही बर्‍याच रुग्णांची तेथे जाण्याची मानसिकता होत नाही. शिवाय आवश्यक औषधीही येथे मिळत नाही. त्यामुळे शासकीय सुविधेवरचा लोकांचा विश्‍वास कमी होत चालला असून, गावामध्येही सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे खासगी डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. तसेच खासगी डॉक्टरांचे दर त्यांना परवडणारे नसले तरीही त्यांना काहीही करून वेळप्रसंगी घर, दागिने विकून डॉक्टरांची भरपाई करावी लागते. डॉक्टरांच्या खर्चात दाद मागण्याची काहीही मुभा नसल्याने त्यांना निमूटपणे हा खर्च सहन करावा लागतो; अन्यथा रुग्णाला मृत्यूची वाट मोकळी करून द्यावी लागते. परिसरातील बर्‍याच खेड्यांमध्ये सरकारी डॉक्टरचे दर्शनच होत नाही. महिलांना प्रसूती कामासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाहीत. परिणामी, प्रशासनाचा डॉक्टर आपल्या दारी या योजनेचे तीन-तेरा वाजले असून, संबंधित अधिकार्‍यांनी या बाबीकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्या; त्यांचा आर्थिक ताण कमी करावा अशी मागणी जनतेकडून होत आहे.