शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

डॉक्टर दारीही नाही अन् गावातही नाही ..

By admin | Updated: June 16, 2014 00:41 IST

मात्र, ग्रामीण भागातील बर्‍याच गावामध्येच डॉक्टर नाही तर घरी कधी येणार?

रिसोड : ग्रामीण भागात गोरगरिबांना खासगी वैयक्तिक सेवा परवडत नाही. त्यामुळे शासनाने गरिबांना वेळीच उपचार मिळावे या हेतूने ह्यडॉक्टर आपला घरीह्ण ही अभिनव योजना सुरू केली होती. मात्र, ग्रामीण भागातील बर्‍याच गावामध्येच डॉक्टर नाही तर घरी कधी येणार? हा प्रश्न जनतेला पडत आहे. शासनाच्या वतीने बर्‍याच गावात आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. छोट्या-छोट्या आजारांसाठी त्यांना खासगी डॉक्टरशिवाय पर्याय राहत नाही. तालुक्याचे ठिकाणी शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी तेवढा वेळ नसल्याने तसेच शासकीय रुग्णालयात रुग्णांची होत असलेली हेळसांड व निष्काळजीपणामुळेही बर्‍याच रुग्णांची तेथे जाण्याची मानसिकता होत नाही. शिवाय आवश्यक औषधीही येथे मिळत नाही. त्यामुळे शासकीय सुविधेवरचा लोकांचा विश्‍वास कमी होत चालला असून, गावामध्येही सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे खासगी डॉक्टरकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. तसेच खासगी डॉक्टरांचे दर त्यांना परवडणारे नसले तरीही त्यांना काहीही करून वेळप्रसंगी घर, दागिने विकून डॉक्टरांची भरपाई करावी लागते. डॉक्टरांच्या खर्चात दाद मागण्याची काहीही मुभा नसल्याने त्यांना निमूटपणे हा खर्च सहन करावा लागतो; अन्यथा रुग्णाला मृत्यूची वाट मोकळी करून द्यावी लागते. परिसरातील बर्‍याच खेड्यांमध्ये सरकारी डॉक्टरचे दर्शनच होत नाही. महिलांना प्रसूती कामासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाहीत. परिणामी, प्रशासनाचा डॉक्टर आपल्या दारी या योजनेचे तीन-तेरा वाजले असून, संबंधित अधिकार्‍यांनी या बाबीकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्या; त्यांचा आर्थिक ताण कमी करावा अशी मागणी जनतेकडून होत आहे.