शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

दुभंगलेले तीन संसार लोकअदालतीत जुळले; लोकन्यायालयात ३ कोटींची तडजोड

By दिनेश पठाडे | Updated: September 9, 2023 20:25 IST

१५१५ प्रकरणे निकाली

वाशिम :   कौटुंबिक वादातून कायमचे वेगळे होण्याच्या मार्गावर असलेल्या तीन जोडप्यांचे संसार लोकअदालतीच्या निमित्ताने पुन्हा जुळले. पॅनलने यशस्वी तोडगा काढल्याने आपसी तडजोड झाली अन् पती-पत्नीने पुन्हा संसार फुलविण्याचा निर्णय घेतला. या जोडप्यांना कौटुंबिक न्यायालयाकडून प्रमाणपत्र देण्यात आले तसेच  उपस्थित न्यायाधीशांनी त्यांचा सन्मान केला. 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी दिलेलया निर्देशानुसार जिल्ह्यात ९ सप्टेंबर रोजी जिल्हा, सर्व तालुका न्यायालायामध्ये राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. जिल्हा न्यायालयातील पॅनलला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे प्रमुख तथा जिल्हा न्यायाधीश आर.पी.पांडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश यांनी भेट दिली.

वाशिम जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत प्रकारणाचा निपटारा करण्यात आला.  एकाच दिवसात १५१३ प्रकरणांचा निपटारा होऊन ३ कोटी १९ लाख ८७ हजार ८१४ रुपयांची तडजोडी झाली.  राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा, तालुका वकील संघ, जिल्हा  पोलिस दल, जिल्हा, तालुका विधी सेवा प्राधिकरणकडून प्रयत्न करण्यात आले.