शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

प्रशासनही हतबल : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा १९७ कोटींचा निधी पडून

By सुनील काकडे | Updated: October 9, 2022 18:59 IST

क्षेत्रीय संघटनांचे आडमुठे धोरण; शेतकऱ्यांना मदत वाटप करणार कोण?

वाशिम : जिल्ह्यात चालू वर्षीच्या पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे २ लाख २७२ शेतकऱ्यांच्या १ लाख ६४ हजार ११४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी आवश्यक असलेल्या २२३ कोटी ७५ लाखांच्या अनुदानापैकी १९७ कोटी २३ लाख ८४ हजार २२४ रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले; मात्र हा मदतनिधी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याच्या कामावर क्षेत्रीय संघटनांनी बहिष्कार टाकला. त्यांच्या या आडमुठ्या धोरणापुढे प्रशासनही हतबल झाले असून ऐन दिवाळीत शेतकरी आत्महत्या वाढण्यास ही बाब कारणीभूत ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात जुलै २०२२ मध्ये मालेगाव, कारंजा आणि मानोरा या तीन तालुक्यातील १२९७ हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. ऑगस्ट महिन्यात सहाही तालुके बाधित होत तब्बल १ लाख ४३ हजार ३३६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले; तर सप्टेंबर महिन्यात मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या तीन तालुक्यांमधील १९ हजार ४३९ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांचे जबर नुकसान झाले.

यादरम्यान महसूल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा सर्वे व पंचनामे केल्यानंतर १ लाख ६४ हजार ११४ बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी २२३ कोटी ७५ लाखांचा निधी आवश्यक असल्याचा अहवाल शासनाकडून पाठविण्यात आला. शासनस्तरावरूनही वेळीच दखल घेत १९७ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला पाठविण्यात आला. मात्र, हा निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याच्या कामावर तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांच्या क्षेत्रीय संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शासनाकडून पैसा येऊनही तो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी