शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शकक्तिशाली सॅटेलाईट
3
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
4
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
5
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
6
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
7
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
8
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
9
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
10
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
11
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
12
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
13
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
14
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
15
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
16
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
17
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
18
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
19
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
20
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 

प्रशासनही हतबल : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा १९७ कोटींचा निधी पडून

By सुनील काकडे | Updated: October 9, 2022 18:59 IST

क्षेत्रीय संघटनांचे आडमुठे धोरण; शेतकऱ्यांना मदत वाटप करणार कोण?

वाशिम : जिल्ह्यात चालू वर्षीच्या पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे २ लाख २७२ शेतकऱ्यांच्या १ लाख ६४ हजार ११४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी आवश्यक असलेल्या २२३ कोटी ७५ लाखांच्या अनुदानापैकी १९७ कोटी २३ लाख ८४ हजार २२४ रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले; मात्र हा मदतनिधी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याच्या कामावर क्षेत्रीय संघटनांनी बहिष्कार टाकला. त्यांच्या या आडमुठ्या धोरणापुढे प्रशासनही हतबल झाले असून ऐन दिवाळीत शेतकरी आत्महत्या वाढण्यास ही बाब कारणीभूत ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात जुलै २०२२ मध्ये मालेगाव, कारंजा आणि मानोरा या तीन तालुक्यातील १२९७ हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. ऑगस्ट महिन्यात सहाही तालुके बाधित होत तब्बल १ लाख ४३ हजार ३३६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले; तर सप्टेंबर महिन्यात मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या तीन तालुक्यांमधील १९ हजार ४३९ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांचे जबर नुकसान झाले.

यादरम्यान महसूल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा सर्वे व पंचनामे केल्यानंतर १ लाख ६४ हजार ११४ बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी २२३ कोटी ७५ लाखांचा निधी आवश्यक असल्याचा अहवाल शासनाकडून पाठविण्यात आला. शासनस्तरावरूनही वेळीच दखल घेत १९७ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला पाठविण्यात आला. मात्र, हा निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याच्या कामावर तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांच्या क्षेत्रीय संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शासनाकडून पैसा येऊनही तो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी