शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनही हतबल : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा १९७ कोटींचा निधी पडून

By सुनील काकडे | Updated: October 9, 2022 18:59 IST

क्षेत्रीय संघटनांचे आडमुठे धोरण; शेतकऱ्यांना मदत वाटप करणार कोण?

वाशिम : जिल्ह्यात चालू वर्षीच्या पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे २ लाख २७२ शेतकऱ्यांच्या १ लाख ६४ हजार ११४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना मदतीसाठी आवश्यक असलेल्या २२३ कोटी ७५ लाखांच्या अनुदानापैकी १९७ कोटी २३ लाख ८४ हजार २२४ रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले; मात्र हा मदतनिधी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याच्या कामावर क्षेत्रीय संघटनांनी बहिष्कार टाकला. त्यांच्या या आडमुठ्या धोरणापुढे प्रशासनही हतबल झाले असून ऐन दिवाळीत शेतकरी आत्महत्या वाढण्यास ही बाब कारणीभूत ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

जिल्ह्यात जुलै २०२२ मध्ये मालेगाव, कारंजा आणि मानोरा या तीन तालुक्यातील १२९७ हेक्टरवरील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. ऑगस्ट महिन्यात सहाही तालुके बाधित होत तब्बल १ लाख ४३ हजार ३३६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले; तर सप्टेंबर महिन्यात मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या तीन तालुक्यांमधील १९ हजार ४३९ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कपाशीसह अन्य पिकांचे जबर नुकसान झाले.

यादरम्यान महसूल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांचा सर्वे व पंचनामे केल्यानंतर १ लाख ६४ हजार ११४ बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी २२३ कोटी ७५ लाखांचा निधी आवश्यक असल्याचा अहवाल शासनाकडून पाठविण्यात आला. शासनस्तरावरूनही वेळीच दखल घेत १९७ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला पाठविण्यात आला. मात्र, हा निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याच्या कामावर तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांच्या क्षेत्रीय संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या या आडमुठ्या धोरणामुळे शासनाकडून पैसा येऊनही तो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणे अशक्य झाले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी