शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST

वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच अर्थात ३६३ ...

वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच अर्थात ३६३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, आता पुढील प्रवेशाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावीची परीक्षादेखील रद्द केली. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा रद्द झाली. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा एकूण ३६३ आहेत. यामध्ये एकूण १९,७१५ विद्यार्थी आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने जिल्ह्यातील सरसकट १९,७१५ विद्यार्थी पास झाले आहेत. शिक्षण विभागाने मूल्यमापनाचे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के अंतर्गत मूल्यमापनानुसार, तर ५० टक्के गुण नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणानुसार देण्यात येतील.

००००००००००००

बॉक्स

असे असेल नवे सूत्र

नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के वापरून दहावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. दहावीतील अंतर्गत मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला ३० गुण, तर गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे २० गुण दिले जाणार आहेत.

०००००

विद्यार्थी खूश !

कोरोनामुळे यंदा दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी खूश असल्याचे दिसून येते, तर काही विद्यार्थी मात्र या निर्णयावर नाखूश असल्याचे दिसून येते. पुढील प्रवेश नेमके कोणत्या आधारावर होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. कोरोनाकाळात दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याचा आनंद आहेच; पण पुढील प्रवेशाचे काय? हा प्रश्नही कायम असल्याचे विद्यार्थिनी संतोषी चव्हाण, शुभम कुचेकर यांनी सांगितले.

००००००

पुढील प्रवेश प्रक्रियेची चिंता

कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली आहे. मात्र, दहावीनंतर आयटीआय, पॉलिटेक्निक यासह अन्य शाखेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया नेमकी कशी राहील, याबाबत थोडाफार संभ्रम आहे.

- माणिकराव इंगळे, पालक

००००

कोरोनाकाळात परीक्षा घेणे, हा प्रकार धोकादायकही ठरला असता. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता पुढील प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी राहणार? याकडे लक्ष आहे.

- बाबुराव वानखडे, पालक

००००००

बॉक्स

पुढील प्रवेशाचे काय होणार?

दहावीच्या मूल्यांकनाचा तिढा सुटल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात एकच सीईटी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान, ही सीईटी पूर्णपणे ऐच्छिक असून, दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. याप्रमाणेच आयटीआय, पॉलिटेक्निक यासह अन्य शाखेत प्रवेश घेण्यासाठी सीईटी राहील, असा अंदाज आहे. याचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तसेच १०० गुणांचे राहू शकते.

००००

बॉक्स

सीईटीनुसार प्रवेश मिळण्याचा अंदाज

कोट

कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाला घ्यावा लागला. गुणांकनाचे सूत्रही शिक्षण विभागाने जाहीर केले. दहावीनंतरचे पुढील प्रवेश हे सीईटीनुसारच होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

- गजानन डाबेराव, शिक्षणतज्ज्ञ.

........

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय चांगलाच म्हणावा लागेल. पुढील प्रवेश हे सीईटी आधारे झाल्यास दहावीतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. सीईटी नेमकी कोणत्या स्वरुपाची असेल, हे लवकर निश्चित झाले तर विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सुलभ होईल.

- दीपक अवचार, शिक्षणतज्ज्ञ

....

अखेर दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करून मूल्यमापनाचे सूत्र शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. मूल्यमापनानुसार गुणांकन होईल. गुणांकन आणि सीईटीद्वारे पुढील प्रवेश होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात खंड पडू न देता सातत्य ठेवणे केव्हीही चांगलेच राहील.

- विलास खोरणे, शिक्षणतज्ज्ञ

००००

जिल्ह्यातील दहावीचे एकूण विद्यार्थी - १९,७१५

मुलगे १०,८४३

मुली ८,८७२

००००००