शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

दोघांची ‘तात्पुरती’ कार्यमुक्ती ; आशा वर्कर्स प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:43 IST

धनंजय कपाले वाशिम : जिल्हाभरातील आशा स्वयंसेविकांकडून छापील रजिस्टर देताना आर्थिक देवाण घेवाण केल्याबाबत जिल्हा समूह संघटक अनिल ...

धनंजय कपाले

वाशिम : जिल्हाभरातील आशा स्वयंसेविकांकडून छापील रजिस्टर देताना आर्थिक देवाण घेवाण केल्याबाबत जिल्हा समूह संघटक अनिल उंदरे व तालुका समूह संघटक राहुल धमेरीया यांना त्यांच्या पदावरून ‘तात्पुरते’ कार्यमुक्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रजिस्टरच्या देवाण घेवाण प्रकरणाची पुन्हा एक वेळा सखोल चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर दोषींना कायमस्वरूपी कार्यमुक्त करावयाचे किंवा नाही यावर निर्णय होणार आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हाभरात शेकडोवर आशा स्वयंसेविका आहेत. या आशा स्वयंसेविकांकडून आंदोलन असो वा इतर कोणतेही कारण समोर करून काही लोक पैसे उकळण्याचा गोरखधंदा बऱ्याच वर्षांपासून करीत आहेत. यामधीलच एक भाग म्हणून रजिस्टरच्या नावाखाली १२०० ते १७०० रुपयापर्यंत वसुली केल्याचे वृत्त लोकमतने पुराव्यानिशी प्रकाशित केले. लोकमतच्या या दणक्याने प्रशासन चांगलेच हादरून गेले. अखेर प्रशासनाने लोकमतच्या वृत्ताची दखल घेत जिल्हा समूह संघटक उंदरे व तालुका समूह संघटक धमेरीया यांना तात्पुरते कार्यमुक्त केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह महिला अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. ही त्रिसदस्यीय समिती जिल्हाभरातील आशा व गट प्रवर्तकांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून रजिस्टरच्या नावाखाली रक्कम घेतली आहे का ? याची माहिती संकलित करणार आहेत. या चौकशीपूर्वी जिल्ह्यातील आशा वर्कर्स आणि गट प्रवर्तकांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

................

आशांचे भविष्य त्यांच्याच हाती !

गेल्या अनेक वर्षांपासून आशा स्वयंसेविकांवर दडपण आणून त्यांच्याकडून रक्कम वसुलीचा गोरखधंदा काही लोक करीत आहेत. हे सर्वश्रुत आहे. विविध प्रकारे या वर्कर्सना ‘ब्लॅकमेलिंग’ केले जात आहे. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या मानधनावर असल्यामुळे आशा वर्कर्स निमूटपणे मागितलेली रक्कम वरिष्ठांना देतात. ही सर्व सत्यता आशा स्वयंसेविकांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीसमोर मांडली तर त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि भविष्यात या जाचापासून त्यांची कायमस्वरूपी मुक्तता होईल. असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.