शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? १५ दिवसांपासून पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:25 IST

वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९. मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. त्यात वाशिम तालुक्यात ८९३.७, रिसोड तालुक्यात ८०८.१, ...

वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९. मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. त्यात वाशिम तालुक्यात ८९३.७, रिसोड तालुक्यात ८०८.१, मालेगाव तालुक्यात ७८४.०, मंगरुळपीर तालुक्यात ७३१.८, मानोरा तालुक्यात ७१३.९, कारंजा तालुक्यात ७२२.६, मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. गतवर्षी जिल्ह्यात १ जून ते ४ जुलैदरम्यानच्या कालावधीत २९३.८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. हे प्रमाण सरासरीच्या १४८.८ टक्के होते. यंदा याच कालावधीत २४१.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण १४८.५ टक्के आहे. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पिके डोलदार असणे अपेक्षित आहे; परंतु पावसाचे प्रमाण सार्वत्रिक आणि सारखे नसून, गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आता पिके संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

-----------------------

३) कपाशीचा पेरा वाढला

जिल्ह्यात खरीप पिकांच्या सरासरी क्षेत्रात ७५ टक्के प्रमाण सोयाबीनचे असल्याने यंदाही जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचाच आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. कडधान्यात तूर पिकाचे क्षेत्र वगळता उडीद, मूग या पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. शिवाय तृणधान्यात ज्वारी, बाजरी, मका या पिकांच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट होत आहे.

----------------------

४) ...तर दुबार पेरणी

गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा पत्ताच नसल्याने पिके संकटात सापडली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी तुषार किंवा ठिबक पद्धतीने सिंचन करून पिके वाचवित आहेत; परंतु जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र ७० टक्क्यांहून अधिक आहे. त्यातही हलक्या प्रतीच्या जमिनीचे प्रमाणही लक्षणीय असून, येत्या चार दिवसांत जोरदार पाऊस न पडल्यास १० हजारांवर क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

------------

५) देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो?

१) कोट: दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. कधी अतिवृष्टी, तर कधी अवर्षणामुळे पिकांचे नुकसान होते. कधी निकृष्ट बियाण्यांचाही फटका बसतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे आता शेती व्यवसायच नकोसा झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत.

- जगदीश आरेकर,

शेतकरी इंझोरी

--------------------

२) कोट: आमचा प्रमुख व्यवसाय शेतीच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत आहोत. यंदाही पावसाने आपल्या लहरीपणाचा प्रत्यय दिला असून, १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नसल्याने आता पिके सुकण्याच्या स्थितीत आहेत. त्यात सुरुवातीला पेरलेले सोयाबीन, तूर आणि कपाशीच्या पिकाची स्थिती खूपच वाईट आहे.

- दिगंबर पाटील उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर

---------------

६) कृषी अधिकाऱ्यांचा कोट

१) कोट: जिल्ह्यातील खरिपाची पेरणी ९८ टक्के आटोपली आहे. पावसाने खंड दिला असला तरी, पिकांची स्थिती सद्यस्थितीत समाधानकारक आहे. पुढे आणखी पावसाचा खंड कायम राहिल्यास मात्र हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिकांना धोका आहे.

७) दोन कॉलम फोटो (शेतात पिके कोमेजू लागल्याचा फोटो)

बॉक्स: जिल्ह्यातील सध्याची स्थिती

आतापर्यंत अपेक्षित पाऊस - १९७.८ मि.मी.

---------

प्रत्यक्ष झालेला पाऊस - २४१.० मि.मी.

-------------

आतापर्यंत झालेली पेरणी - ३,८०, २७२ हेक्टर

---------

बॉक्स: कोणत्या तालुक्यात किती पाऊस

तालुका - पाऊस (मि.मी.) - पेरणी

वाशिम -२१५.६ - ८०२८४

रिसोड - २४०.४ - ६१,९४५

मालेगाव - २३८.२ - ५८,२१०

मं.पीर -३०४.९ - ५४, १३०

मानोरा -३०८.३ - ६४, २८१

कारंजा -१६७.० ७८,४३२

---------------------------