शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? १५ दिवसांपासून पावसाची दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:25 IST

वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९. मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. त्यात वाशिम तालुक्यात ८९३.७, रिसोड तालुक्यात ८०८.१, ...

वाशिम जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९. मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. त्यात वाशिम तालुक्यात ८९३.७, रिसोड तालुक्यात ८०८.१, मालेगाव तालुक्यात ७८४.०, मंगरुळपीर तालुक्यात ७३१.८, मानोरा तालुक्यात ७१३.९, कारंजा तालुक्यात ७२२.६, मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. गतवर्षी जिल्ह्यात १ जून ते ४ जुलैदरम्यानच्या कालावधीत २९३.८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. हे प्रमाण सरासरीच्या १४८.८ टक्के होते. यंदा याच कालावधीत २४१.८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण १४८.५ टक्के आहे. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पिके डोलदार असणे अपेक्षित आहे; परंतु पावसाचे प्रमाण सार्वत्रिक आणि सारखे नसून, गत १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आता पिके संकटात सापडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

-----------------------

३) कपाशीचा पेरा वाढला

जिल्ह्यात खरीप पिकांच्या सरासरी क्षेत्रात ७५ टक्के प्रमाण सोयाबीनचे असल्याने यंदाही जिल्ह्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचाच आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मात्र कपाशीचे क्षेत्र वाढले आहे. कडधान्यात तूर पिकाचे क्षेत्र वगळता उडीद, मूग या पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. शिवाय तृणधान्यात ज्वारी, बाजरी, मका या पिकांच्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे कृषी विभागाच्या पेरणी अहवालावरून स्पष्ट होत आहे.

----------------------

४) ...तर दुबार पेरणी

गत १५ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा पत्ताच नसल्याने पिके संकटात सापडली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी तुषार किंवा ठिबक पद्धतीने सिंचन करून पिके वाचवित आहेत; परंतु जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र ७० टक्क्यांहून अधिक आहे. त्यातही हलक्या प्रतीच्या जमिनीचे प्रमाणही लक्षणीय असून, येत्या चार दिवसांत जोरदार पाऊस न पडल्यास १० हजारांवर क्षेत्रात दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

------------

५) देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो?

१) कोट: दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. कधी अतिवृष्टी, तर कधी अवर्षणामुळे पिकांचे नुकसान होते. कधी निकृष्ट बियाण्यांचाही फटका बसतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे आता शेती व्यवसायच नकोसा झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली आहेत.

- जगदीश आरेकर,

शेतकरी इंझोरी

--------------------

२) कोट: आमचा प्रमुख व्यवसाय शेतीच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करीत आहोत. यंदाही पावसाने आपल्या लहरीपणाचा प्रत्यय दिला असून, १५ दिवसांपासून पावसाचा पत्ताच नसल्याने आता पिके सुकण्याच्या स्थितीत आहेत. त्यात सुरुवातीला पेरलेले सोयाबीन, तूर आणि कपाशीच्या पिकाची स्थिती खूपच वाईट आहे.

- दिगंबर पाटील उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर

---------------

६) कृषी अधिकाऱ्यांचा कोट

१) कोट: जिल्ह्यातील खरिपाची पेरणी ९८ टक्के आटोपली आहे. पावसाने खंड दिला असला तरी, पिकांची स्थिती सद्यस्थितीत समाधानकारक आहे. पुढे आणखी पावसाचा खंड कायम राहिल्यास मात्र हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिकांना धोका आहे.

७) दोन कॉलम फोटो (शेतात पिके कोमेजू लागल्याचा फोटो)

बॉक्स: जिल्ह्यातील सध्याची स्थिती

आतापर्यंत अपेक्षित पाऊस - १९७.८ मि.मी.

---------

प्रत्यक्ष झालेला पाऊस - २४१.० मि.मी.

-------------

आतापर्यंत झालेली पेरणी - ३,८०, २७२ हेक्टर

---------

बॉक्स: कोणत्या तालुक्यात किती पाऊस

तालुका - पाऊस (मि.मी.) - पेरणी

वाशिम -२१५.६ - ८०२८४

रिसोड - २४०.४ - ६१,९४५

मालेगाव - २३८.२ - ५८,२१०

मं.पीर -३०४.९ - ५४, १३०

मानोरा -३०८.३ - ६४, २८१

कारंजा -१६७.० ७८,४३२

---------------------------