शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

शासकीय कनिष्ठ महाविद्यालयांत शिक्षकांची वाणवा

By admin | Updated: August 14, 2015 01:01 IST

१४ पदे रिक्त ; जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय.

दादाराव गायकवाड / कारंजा लाड (जि. वाशिम): वाशिम जिल्हय़ातील जिल्हा परिषदेच्या जवळपास सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत मिळून अधिव्याख्यात्यांची १४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असतानाही पदभरती बंद असल्याचे कारण समोर करून ही पदे भरण्याचे प्रयत्न जिल्हा परिषदेकडून करण्यात येत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधकारमय झाले आहे. शासनाच्यावतीने गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण मिळावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेची ११ आिण १२ वीपर्यंतची कनिष्ठ महाविद्यालये स्थापन केलीत. राज्यभरात ठिकठिकाणी असलेल्या या महाविद्यालयांतून लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात; परंतु या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी अधिव्याख्यातेच नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र वाशिम जिल्हय़ात दिसत आहे. वाशिम जिल्हय़ात वाशिम, मंगरुळपीर, कामरगाव, उंबर्डा बाजार आणि विठोली येथे जिल्हा परिषदेची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या पाचही महाविद्यालयात मिळून आजच्या घडीला हजाराच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत; परंतु या पाचही ठिकाणच्या महाविद्यालयातील अधिव्याख्यात्यांची अनेक पदे रिक्त आहेत. या महाविद्यालयांतून घेतलेल्या माहितीनुसार वाशिम येथील जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात जीवशास्त्र (बॉयलॉजी), भौतिकशास्त्र ( फिजिक्स) आणि रसायनशास्त्र (केमिस्ट्री) या तीन विषयांची मिळून तीन पदे ५ वर्षांपासून रिक्त आहेत. मंगरुळपीर येथील कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या चार विषयांची मिळून तीन पदे रिक्त आहेत. त्यापैकी भौतिकशास्त्राच्या शिक्षकाचे पद १0 वर्षांपासून, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राच्या शिक्षकांचे पद जवळपास सात वर्षांपासून, तर गणित या विषयाच्या अधिव्याख्यात्याचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे