शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

तालुका कोरड्या दुष्काळाच्या छायेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:54 IST

मंगरुळपीर :  तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे  पाण्याचे दुर्भीक्ष आतापासूनच जाणवायला लागले आहेत.  शहरालगतच्या नदीला एकही अपेक्षित पूर आला नाही. त्यामुळे  नदीचे पात्र कोरड्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील काही  तलाव कोरडे तर बहुतांश तलावाची पाण्याची मोठय़ा प्रमाणात  पातळी खालावल्याने यावर्षी शासनाला  ऐन हिवाळयातच पाणी  टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे,  असे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनदी पात्र पडले कोरडे मंगरुळपीर तालुक्यात ६६ टक्केच पाऊस

नाना देवळे । लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर :  तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे  पाण्याचे दुर्भीक्ष आतापासूनच जाणवायला लागले आहेत.  शहरालगतच्या नदीला एकही अपेक्षित पूर आला नाही. त्यामुळे  नदीचे पात्र कोरड्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील काही  तलाव कोरडे तर बहुतांश तलावाची पाण्याची मोठय़ा प्रमाणात  पातळी खालावल्याने यावर्षी शासनाला  ऐन हिवाळयातच पाणी  टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे,  असे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे ६६.७ टक्के पाऊस   पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील कवठळ, सार्सी, १ सार्सी १,  चांधई, दस्तापुर, हिवरा व मोहरी या तलावाची एलएसएल च्या  खाली  गेली आहे तर मोतसावंगा  ७.५२, पिंप्री 0३४, सावरगाव  ४ टक्के,  कोळंबी ५.८८,  सिंगडोह ४.४३,  नांदखेडा २४.९५,   चोरद ४0 टक्के,  झोडगा ३२.५0, उंद्री ३२.७0 , जोगलदरी  २७.११, कासोळा ११.४२ या तलावाची पाणी पातळी चिं ताजनक आहे. त्यामुळे   यावर्षी  हिवाळ्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची  चिन्हे आहे.  यावर्षी खरीप हंगाम पाण्याअभावी हातचा गेला तर  रब्बी हंगाम पाण्याअभावी घेणे शक्य नाही यासह गुरांचा,  चार्‍याचा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे. नदी,  नाले, पूर्णत: कोरडे पडल्याने आताच पशुपालकांना उपलब्ध  विहिरीतील पाणी काढून आपल्या पशुची तहान भागवावी लागत  आहे. मोतसावंगा प्रकल्पातून मंगरुळपीर शहरासह २१ गावांना पाणी  पुरवठा केला जातो  मात्र यावर्षी  शहरासह २१ गावांना तीव्र  पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे. अशा विपरीत परिस्थितीतमुळे पाणी टंचाईवर मात करणे अश क्यप्राय असुन यावर लोकप्रतिनिधी व शासनाने उपाय योजना  करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे ,मात्र यावर शासन  व लोकप्रतिनिधी गांभीर होत नसल्याचे दिसून येते.

उपाययोजना करणे गरजेचेयावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे पाणी टंचाईची शक्यता  नाकारता येत नाही. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती  करण्याची वेळ येणार असल्याचे संकेत दिसून येत असल्याने  पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना आतापासूनच करणे गरजेचे  आहे. यासाठी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार  घेऊन उपाय योजना करावी, अशी मागणी नागरिकांतून केल्या  जात आहे.