शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तालुका कोरड्या दुष्काळाच्या छायेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:54 IST

मंगरुळपीर :  तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे  पाण्याचे दुर्भीक्ष आतापासूनच जाणवायला लागले आहेत.  शहरालगतच्या नदीला एकही अपेक्षित पूर आला नाही. त्यामुळे  नदीचे पात्र कोरड्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील काही  तलाव कोरडे तर बहुतांश तलावाची पाण्याची मोठय़ा प्रमाणात  पातळी खालावल्याने यावर्षी शासनाला  ऐन हिवाळयातच पाणी  टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे,  असे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनदी पात्र पडले कोरडे मंगरुळपीर तालुक्यात ६६ टक्केच पाऊस

नाना देवळे । लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर :  तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे  पाण्याचे दुर्भीक्ष आतापासूनच जाणवायला लागले आहेत.  शहरालगतच्या नदीला एकही अपेक्षित पूर आला नाही. त्यामुळे  नदीचे पात्र कोरड्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील काही  तलाव कोरडे तर बहुतांश तलावाची पाण्याची मोठय़ा प्रमाणात  पातळी खालावल्याने यावर्षी शासनाला  ऐन हिवाळयातच पाणी  टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे,  असे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे ६६.७ टक्के पाऊस   पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील कवठळ, सार्सी, १ सार्सी १,  चांधई, दस्तापुर, हिवरा व मोहरी या तलावाची एलएसएल च्या  खाली  गेली आहे तर मोतसावंगा  ७.५२, पिंप्री 0३४, सावरगाव  ४ टक्के,  कोळंबी ५.८८,  सिंगडोह ४.४३,  नांदखेडा २४.९५,   चोरद ४0 टक्के,  झोडगा ३२.५0, उंद्री ३२.७0 , जोगलदरी  २७.११, कासोळा ११.४२ या तलावाची पाणी पातळी चिं ताजनक आहे. त्यामुळे   यावर्षी  हिवाळ्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची  चिन्हे आहे.  यावर्षी खरीप हंगाम पाण्याअभावी हातचा गेला तर  रब्बी हंगाम पाण्याअभावी घेणे शक्य नाही यासह गुरांचा,  चार्‍याचा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे. नदी,  नाले, पूर्णत: कोरडे पडल्याने आताच पशुपालकांना उपलब्ध  विहिरीतील पाणी काढून आपल्या पशुची तहान भागवावी लागत  आहे. मोतसावंगा प्रकल्पातून मंगरुळपीर शहरासह २१ गावांना पाणी  पुरवठा केला जातो  मात्र यावर्षी  शहरासह २१ गावांना तीव्र  पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे. अशा विपरीत परिस्थितीतमुळे पाणी टंचाईवर मात करणे अश क्यप्राय असुन यावर लोकप्रतिनिधी व शासनाने उपाय योजना  करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे ,मात्र यावर शासन  व लोकप्रतिनिधी गांभीर होत नसल्याचे दिसून येते.

उपाययोजना करणे गरजेचेयावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे पाणी टंचाईची शक्यता  नाकारता येत नाही. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती  करण्याची वेळ येणार असल्याचे संकेत दिसून येत असल्याने  पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना आतापासूनच करणे गरजेचे  आहे. यासाठी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार  घेऊन उपाय योजना करावी, अशी मागणी नागरिकांतून केल्या  जात आहे.