शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

तालुका कोरड्या दुष्काळाच्या छायेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:54 IST

मंगरुळपीर :  तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे  पाण्याचे दुर्भीक्ष आतापासूनच जाणवायला लागले आहेत.  शहरालगतच्या नदीला एकही अपेक्षित पूर आला नाही. त्यामुळे  नदीचे पात्र कोरड्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील काही  तलाव कोरडे तर बहुतांश तलावाची पाण्याची मोठय़ा प्रमाणात  पातळी खालावल्याने यावर्षी शासनाला  ऐन हिवाळयातच पाणी  टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे,  असे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देनदी पात्र पडले कोरडे मंगरुळपीर तालुक्यात ६६ टक्केच पाऊस

नाना देवळे । लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर :  तालुक्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे  पाण्याचे दुर्भीक्ष आतापासूनच जाणवायला लागले आहेत.  शहरालगतच्या नदीला एकही अपेक्षित पूर आला नाही. त्यामुळे  नदीचे पात्र कोरड्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील काही  तलाव कोरडे तर बहुतांश तलावाची पाण्याची मोठय़ा प्रमाणात  पातळी खालावल्याने यावर्षी शासनाला  ऐन हिवाळयातच पाणी  टंचाईवर मात करण्यासाठी उपाय योजना करणे गरजेचे आहे,  असे विदारक स्थिती निर्माण झाली आहे.यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा कमी म्हणजे ६६.७ टक्के पाऊस   पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील कवठळ, सार्सी, १ सार्सी १,  चांधई, दस्तापुर, हिवरा व मोहरी या तलावाची एलएसएल च्या  खाली  गेली आहे तर मोतसावंगा  ७.५२, पिंप्री 0३४, सावरगाव  ४ टक्के,  कोळंबी ५.८८,  सिंगडोह ४.४३,  नांदखेडा २४.९५,   चोरद ४0 टक्के,  झोडगा ३२.५0, उंद्री ३२.७0 , जोगलदरी  २७.११, कासोळा ११.४२ या तलावाची पाणी पातळी चिं ताजनक आहे. त्यामुळे   यावर्षी  हिवाळ्यातच तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची  चिन्हे आहे.  यावर्षी खरीप हंगाम पाण्याअभावी हातचा गेला तर  रब्बी हंगाम पाण्याअभावी घेणे शक्य नाही यासह गुरांचा,  चार्‍याचा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे. नदी,  नाले, पूर्णत: कोरडे पडल्याने आताच पशुपालकांना उपलब्ध  विहिरीतील पाणी काढून आपल्या पशुची तहान भागवावी लागत  आहे. मोतसावंगा प्रकल्पातून मंगरुळपीर शहरासह २१ गावांना पाणी  पुरवठा केला जातो  मात्र यावर्षी  शहरासह २१ गावांना तीव्र  पाणी टंचाईची झळ सोसावी लागणार आहे. अशा विपरीत परिस्थितीतमुळे पाणी टंचाईवर मात करणे अश क्यप्राय असुन यावर लोकप्रतिनिधी व शासनाने उपाय योजना  करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे ,मात्र यावर शासन  व लोकप्रतिनिधी गांभीर होत नसल्याचे दिसून येते.

उपाययोजना करणे गरजेचेयावर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे पाणी टंचाईची शक्यता  नाकारता येत नाही. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती  करण्याची वेळ येणार असल्याचे संकेत दिसून येत असल्याने  पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना आतापासूनच करणे गरजेचे  आहे. यासाठी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार  घेऊन उपाय योजना करावी, अशी मागणी नागरिकांतून केल्या  जात आहे.