शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

गुरुवारपासून ४९१ ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम!

By संतोष वानखडे | Updated: September 13, 2022 14:12 IST

गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम राबविण्यात येणार आहे.

वाशिम :

गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम राबविण्यात येणार आहे. या दरम्यान सर्वांनी गावाच्या दृष्यमान स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी मंगळवारी (दि.१३) केले.१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत गावांमध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी एक राज्यव्यापी मोहीम राबविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना प्राप्त झालेल्या आहेत. यावर्षी ‘गावांची दृष्यमान स्वच्छता’ ही या मोहिमेची थीम ठरविण्यात आली आहे. गावांमध्ये ‘दृष्यमान स्वच्छता’ राखली जावी, यासाठी गावातील कचराकुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करावी लागणार आहे. या मोहिमेदरम्यान गावातील सुका व ओला कचरा विलगीकरणासाठी व्यापक प्रमाणात जनजागृतीवर भर राहणार आहे. प्लास्टिक सारखा अविघटनशील कचरा एकत्रित करून त्याचे स्वतंत्र नियोजन करावे, पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्याच्या सभोवताली वृक्षारोपण करणे, एकल  प्लास्टिक वापराच्या (सिंगल युज प्लॅस्टिक) दुष्परिणामाबद्दल सभा आयोजित करून यापूर्वी अशा प्लास्टिक वापरावर बंदीबाबत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे, हागणदारीमुक्त अधिक घटकांवर सरपंच संवाद आयोजित करणे आदी उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या.