शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

शिरपूर येथे गारपीट नुकसानीचे सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST

अगोदरच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले. १९ मार्च रोजी रात्री आठ वाजता शिरपूर, तिवळी, ...

अगोदरच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले. १९ मार्च रोजी रात्री आठ वाजता शिरपूर, तिवळी, दुधाळा, घाटा, मिर्झापूर, किन्ही घोडमोड परिसरात गारपिटीसह वादळी पाऊस पडला. यामध्ये शेतकऱ्यांचे विशेषत: कांदा बिजवाई, फळबाग, कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांचे शेडनेटसुद्धा उद्ध्वस्त झाले. नुकसान झालेले शेतकरी हवालदिल झाले. याविषयी शनिवारी आ. अमित झनक यांनी तत्काळ जि. प. अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे व तहसीलदार रवी काळे यांना सोबत घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. तहसीलदार व कृषी विभागाला नुकसानीचे पंचनामे करून सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर तहसीलदार काळे यांनी नुकसानग्रस्त भागातील तलाठ्यांना शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करून सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी शिरपूर येथील भाग नंबर १ चे तलाठी एन. व्ही. आंबुलकर व भाग नंबर ३ चे तलाठी जे. एन. साठे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तर भाग नंबर २ चे तलाठी पी.एस. अंभोरे यांनी मात्र रविवारी सुटी घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी सचिन सारडा यांनी केली आहे. तसेच जुलै २०२० मध्ये शिरपूर येथील फरशी नाल्याला दोन वेळा पूर आल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे सर्वेक्षण करूनही अद्यापही मदत मिळाली नाही. त्या नुकसानीची मदतसुद्धा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. एरवीही मालेगाव, रिसोड तालुक्यात क्वचितच दौरा करणारे स्थानिक खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.