शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शिरपूर येथे गारपीट नुकसानीचे सर्वेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:37 IST

अगोदरच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले. १९ मार्च रोजी रात्री आठ वाजता शिरपूर, तिवळी, ...

अगोदरच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळले. १९ मार्च रोजी रात्री आठ वाजता शिरपूर, तिवळी, दुधाळा, घाटा, मिर्झापूर, किन्ही घोडमोड परिसरात गारपिटीसह वादळी पाऊस पडला. यामध्ये शेतकऱ्यांचे विशेषत: कांदा बिजवाई, फळबाग, कलिंगड, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांचे शेडनेटसुद्धा उद्ध्वस्त झाले. नुकसान झालेले शेतकरी हवालदिल झाले. याविषयी शनिवारी आ. अमित झनक यांनी तत्काळ जि. प. अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे व तहसीलदार रवी काळे यांना सोबत घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली. तहसीलदार व कृषी विभागाला नुकसानीचे पंचनामे करून सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर तहसीलदार काळे यांनी नुकसानग्रस्त भागातील तलाठ्यांना शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करून सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी शिरपूर येथील भाग नंबर १ चे तलाठी एन. व्ही. आंबुलकर व भाग नंबर ३ चे तलाठी जे. एन. साठे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तर भाग नंबर २ चे तलाठी पी.एस. अंभोरे यांनी मात्र रविवारी सुटी घेतली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी सचिन सारडा यांनी केली आहे. तसेच जुलै २०२० मध्ये शिरपूर येथील फरशी नाल्याला दोन वेळा पूर आल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे सर्वेक्षण करूनही अद्यापही मदत मिळाली नाही. त्या नुकसानीची मदतसुद्धा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. एरवीही मालेगाव, रिसोड तालुक्यात क्वचितच दौरा करणारे स्थानिक खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.