शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

नुकसानग्रस्त शेतीचे सर्व्हेक्षण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:25 IST

वाशिम जिल्ह्यात यावर्षी सर्वात कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. प्रदिर्घ विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे सोयाबिन पिकांवर अळींचा प्रादूर्भाव, पिक करपल्याच्या घटना; तर काहीठिकाणी सोयाबिन पिकाला शेंगाच लागल्या नसल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट ओढवले आहे. यासाठी संबंधित यंत्रणेला सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली. 

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट सोयाबिन पिकांवर अळींचा प्रादूर्भाव, शेतक-यांवर मोठे संकट सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: वाशिम जिल्ह्यात यावर्षी सर्वात कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. प्रदिर्घ विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे सोयाबिन पिकांवर अळींचा प्रादूर्भाव, पिक करपल्याच्या घटना; तर काहीठिकाणी सोयाबिन पिकाला शेंगाच लागल्या नसल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट ओढवले आहे. यासाठी संबंधित यंत्रणेला सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली. यासंदर्भातील निवेदनात पाटणी यांनी पुढे नमूद केले आहे की, कारंजा तालुक्यासोबतच जिल्हयातील इतर भागांचा पिक पाहणी दौरा केला असता अनेक शेतकºयांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. तिन महिन्यात येणाºया पिकांच्या पेरणीस यावर्षी जिल्ह्यातील शेतकºयांनी सर्वाधिक पसंती दिली. मात्र, तब्बल महिना ते १५-२० दिवसानंतर असलेल्या अल्प पावसामुळे सोयाबीन, उडीद व मुगासारखी पिके रोगराईला बळी पडली. अनेक भागात सोयाबिन पिकाला शेंगाच आल्या नसल्याच्या घटनात वाढ झाली. हजारो हेक्टरवरील खरिपाचे पिक पुर्णत: करपुन गेले असुन अशातच अर्धवट करपलेली पिके तरली असली तरी वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगराई पसरली आहे.     संपुर्ण तालुक्यात प्रारंभी बरसलेल्या पावसावर खरीपाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर महिनाभर पावसाने दडी मारल्याने खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे उंट अळीचा प्रादूर्भाव झाल्याने तालुक्यातील अनेक  गावात सोयाबिन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाअभावी संपुर्ण खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असुन या पिकांच्या नुकसानीचे शासनामार्फत तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. पाहणीसाठी शेतकºयांच्या बांधावर स्वत: गेलो असता अनेक शेतकºयांनी आपल्याकडे त्यांच्या व्यथा मांडल्या. शेतकºयांच्या मते सप्टेंबर महिन्यापासुन रब्बीच्या पेरणीस सुरूवात होणार असुन खरिप पिकांत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आपण स्वत: जातीने लक्ष घालुन शासनाच्या ही बाब निर्दशनास आणुन देण्याची मागणी केली. तसेच त्वरित पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली. कारंजा-मानोरा मतदार संघातील तसेच जिल्ह्यातील इतरही तालुक्याची भयावह परिस्थिती पाहता संबंधित यंत्रणेला सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी पाटणी यांनी कृषिमंत्री फुंडकर यांच्याकडे केली आहे.