शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

नुकसानग्रस्त शेतीचे सर्व्हेक्षण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:25 IST

वाशिम जिल्ह्यात यावर्षी सर्वात कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. प्रदिर्घ विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे सोयाबिन पिकांवर अळींचा प्रादूर्भाव, पिक करपल्याच्या घटना; तर काहीठिकाणी सोयाबिन पिकाला शेंगाच लागल्या नसल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट ओढवले आहे. यासाठी संबंधित यंत्रणेला सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली. 

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट सोयाबिन पिकांवर अळींचा प्रादूर्भाव, शेतक-यांवर मोठे संकट सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: वाशिम जिल्ह्यात यावर्षी सर्वात कमी पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत वाईट आहे. प्रदिर्घ विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे सोयाबिन पिकांवर अळींचा प्रादूर्भाव, पिक करपल्याच्या घटना; तर काहीठिकाणी सोयाबिन पिकाला शेंगाच लागल्या नसल्यामुळे शेतकºयांवर मोठे संकट ओढवले आहे. यासाठी संबंधित यंत्रणेला सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली. यासंदर्भातील निवेदनात पाटणी यांनी पुढे नमूद केले आहे की, कारंजा तालुक्यासोबतच जिल्हयातील इतर भागांचा पिक पाहणी दौरा केला असता अनेक शेतकºयांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. तिन महिन्यात येणाºया पिकांच्या पेरणीस यावर्षी जिल्ह्यातील शेतकºयांनी सर्वाधिक पसंती दिली. मात्र, तब्बल महिना ते १५-२० दिवसानंतर असलेल्या अल्प पावसामुळे सोयाबीन, उडीद व मुगासारखी पिके रोगराईला बळी पडली. अनेक भागात सोयाबिन पिकाला शेंगाच आल्या नसल्याच्या घटनात वाढ झाली. हजारो हेक्टरवरील खरिपाचे पिक पुर्णत: करपुन गेले असुन अशातच अर्धवट करपलेली पिके तरली असली तरी वातावरणातील बदलामुळे पिकांवर रोगराई पसरली आहे.     संपुर्ण तालुक्यात प्रारंभी बरसलेल्या पावसावर खरीपाची पेरणी केली. मात्र, त्यानंतर महिनाभर पावसाने दडी मारल्याने खरीपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे उंट अळीचा प्रादूर्भाव झाल्याने तालुक्यातील अनेक  गावात सोयाबिन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाअभावी संपुर्ण खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असुन या पिकांच्या नुकसानीचे शासनामार्फत तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. पाहणीसाठी शेतकºयांच्या बांधावर स्वत: गेलो असता अनेक शेतकºयांनी आपल्याकडे त्यांच्या व्यथा मांडल्या. शेतकºयांच्या मते सप्टेंबर महिन्यापासुन रब्बीच्या पेरणीस सुरूवात होणार असुन खरिप पिकांत झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आपण स्वत: जातीने लक्ष घालुन शासनाच्या ही बाब निर्दशनास आणुन देण्याची मागणी केली. तसेच त्वरित पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली. कारंजा-मानोरा मतदार संघातील तसेच जिल्ह्यातील इतरही तालुक्याची भयावह परिस्थिती पाहता संबंधित यंत्रणेला सर्व्हे करण्याचे आदेश देऊन तत्काळ अहवाल सादर करण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी मागणी पाटणी यांनी कृषिमंत्री फुंडकर यांच्याकडे केली आहे.