शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

आधार नोंदणीचे काम दोन महिन्यांपासून बंद

By admin | Updated: July 4, 2017 02:20 IST

जिल्ह्यातील वास्तव: जिल्ह्यातील सर्व अधिकृत केंद्रांकडील आधार किट परत करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात आधार नोंदणीसाठी सुरू करण्यात आलेली ५३ केंद्र महिनाभरापासून बंद आहेत. सदर पोर्टल बंद करण्यात आल्याने हजारो नागरिकांची आधार नोंदणी रखडली आहे. परिणामी, शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.केंद्र शासनाने प्रत्येक नागरिकांची एक ओळख असावी, या उद्देशाने आधार नोंदणी बंधनकारक केली. यासाठी केंद्र शासनाने सीएमएस कॉम्प्युटर लिमिटेड मुंबई या कंपनीला आधार नोंदणीचे काम दिले होते. यासाठी जिल्ह्यातील ५३ अधिकृत महा ईसेवा केंद्रांना आधार किट देण्यात आल्या होत्या. दरम्यान, शासनाने दोन महिन्यांपूर्वी सीएमएस कंपनीचा सदर करार रद्द केला. या कंपनीबाबतच्या काही अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला. यामुळे पॅन नंबरला लिंक करण्यासाठी आधार कार्ड दुरुस्ती करणे, नवी नोंदणी करणे, ही कामे थांबली. त्याशिवाय निराधारांना बायोमेट्रिक पद्धतीने अनुदान वितरित करण्यासाठी त्यांच्या बोटांचे ठसे अपडेट करणेही आवश्यक असून, हे कामही थांबले आहे. शासकीय योजना, शाळा प्रवेश असो वा इतर कोणत्याही शासकीय योजनेसाठी आधारकार्डची मागणी केल्या जाते. ज्या नागरिकांकडे आधारकार्ड नसेल त्याला शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते, यासाठीच जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ५३ आधार केंद्र सुरू करण्यात आली होती. या केंद्राच्या माध्यमातून २०११ च्या जनगणनेनुसार आधार नोंदणीचे उद्दिष्ट १०० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद आहे; परंतु २०११ नंतरच्या लोकसंख्येचा विचार करता हजारो नागरिक आधार नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. शासनाच्या आवाहनानंतर अनेकांनी लहान बाळांचीदेखील आधार नोंदणी केली; परंतु माहितीचा अभाव व वेळोवेळी उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना नोंदणी करता आली नाही. त्यातच जिल्ह्यातील आधार किटधारकांचे मानधन व अनामत रक्कम खोळंबली असून, शासनाने सीएमएस कंपनीचा करार रद्द केल्यानंतर सदर पोर्टल बंद असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची रखडलेली आधार नोंदणी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केल्या जात आहे. याची दखल घेण्याची मागणी आधारकार्डपासून वंचित असलेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे. शासनाने सीएमएस कंपनीकडून आधार नोंदणीचे काम काढून घेतले असून, हे काम महाआॅनलाइनमार्फत करण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली, तरी सीएमएसचे काम बंद केले आहे. आता जिल्ह्यात आधारअभावी निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी ईआयटीबाबत बोलणे केले असून, येत्या आठवडाभरात ही समस्या निकाली लागणार आहे. -शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी वाशिम