शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

आधार नोंदणीचे काम दोन महिन्यांपासून बंद

By admin | Updated: July 4, 2017 02:20 IST

जिल्ह्यातील वास्तव: जिल्ह्यातील सर्व अधिकृत केंद्रांकडील आधार किट परत करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात आधार नोंदणीसाठी सुरू करण्यात आलेली ५३ केंद्र महिनाभरापासून बंद आहेत. सदर पोर्टल बंद करण्यात आल्याने हजारो नागरिकांची आधार नोंदणी रखडली आहे. परिणामी, शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.केंद्र शासनाने प्रत्येक नागरिकांची एक ओळख असावी, या उद्देशाने आधार नोंदणी बंधनकारक केली. यासाठी केंद्र शासनाने सीएमएस कॉम्प्युटर लिमिटेड मुंबई या कंपनीला आधार नोंदणीचे काम दिले होते. यासाठी जिल्ह्यातील ५३ अधिकृत महा ईसेवा केंद्रांना आधार किट देण्यात आल्या होत्या. दरम्यान, शासनाने दोन महिन्यांपूर्वी सीएमएस कंपनीचा सदर करार रद्द केला. या कंपनीबाबतच्या काही अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आला. यामुळे पॅन नंबरला लिंक करण्यासाठी आधार कार्ड दुरुस्ती करणे, नवी नोंदणी करणे, ही कामे थांबली. त्याशिवाय निराधारांना बायोमेट्रिक पद्धतीने अनुदान वितरित करण्यासाठी त्यांच्या बोटांचे ठसे अपडेट करणेही आवश्यक असून, हे कामही थांबले आहे. शासकीय योजना, शाळा प्रवेश असो वा इतर कोणत्याही शासकीय योजनेसाठी आधारकार्डची मागणी केल्या जाते. ज्या नागरिकांकडे आधारकार्ड नसेल त्याला शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते, यासाठीच जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात ५३ आधार केंद्र सुरू करण्यात आली होती. या केंद्राच्या माध्यमातून २०११ च्या जनगणनेनुसार आधार नोंदणीचे उद्दिष्ट १०० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद आहे; परंतु २०११ नंतरच्या लोकसंख्येचा विचार करता हजारो नागरिक आधार नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. शासनाच्या आवाहनानंतर अनेकांनी लहान बाळांचीदेखील आधार नोंदणी केली; परंतु माहितीचा अभाव व वेळोवेळी उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना नोंदणी करता आली नाही. त्यातच जिल्ह्यातील आधार किटधारकांचे मानधन व अनामत रक्कम खोळंबली असून, शासनाने सीएमएस कंपनीचा करार रद्द केल्यानंतर सदर पोर्टल बंद असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची रखडलेली आधार नोंदणी पूर्ववत सुरू करण्याची मागणी केल्या जात आहे. याची दखल घेण्याची मागणी आधारकार्डपासून वंचित असलेल्या नागरिकांकडून करण्यात येत आहे. शासनाने सीएमएस कंपनीकडून आधार नोंदणीचे काम काढून घेतले असून, हे काम महाआॅनलाइनमार्फत करण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली, तरी सीएमएसचे काम बंद केले आहे. आता जिल्ह्यात आधारअभावी निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी ईआयटीबाबत बोलणे केले असून, येत्या आठवडाभरात ही समस्या निकाली लागणार आहे. -शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी वाशिम