शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आला उन्हाळा; आरोग्य सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:37 IST

उन्हाळा सुरू झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्माघाताचा समावेश आहे. उन्हाळ्यात आरोग्य ...

उन्हाळा सुरू झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्माघाताचा समावेश आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायांबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये साधारणत: सर्वत्र जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात. यामध्ये शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यताही अधिक असते. जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उन्हामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू पाणी, ताक आदींचा वापर नियमित करावा. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीतजास्त पाणी प्यावे. उन्हापासून बचाव म्हणून नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

बॉक्स

अशी घ्यावी काळजी

हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, बुट व चपलांचा वापर करावा.

उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.

अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाहेर कामकाज करीत असताना मध्ये-मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा.

गरोदर महिला व आजारी व्यक्तींची अधिक काळजी घेण्यात यावी.

बॉक्स

काय करू नये

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा.

दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.

गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.

शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे.

बॉक्स

अतिनील किरणांचे त्वचेवर होणारे परिणाम

उन्हातील अतिनील म्हणजे अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेचे सर्वांत जास्त नुकसान होते. उन्हामुळे प्रमाणाबाहेर घाम आल्यास, घामातील खारट द्रवामुळे धर्मग्रंथींची नलिका सुजते व त्यातून होणारा घामाचा प्रवाह बंद होतो. त्यामुळे साठून राहणाऱ्या घामाचा दबाव वाढून ग्रंथी फुटतात व त्यातून घामोळे तयार होते. प्रखर उन्हामुळे त्वचा काळवंडणे, त्वचेवर चट्टे, व्रण उठणे आदी दुष्परिणाम जाणवतात.

००००

कोट बॉक्स

ऊन कडक तापत असल्यामुळे अशा उन्हात फिरल्यास उष्माघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हाचा धोका लक्षात घेऊन दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे. अशक्तपणा, डोकेदुखी, ताप येणे, चक्कर येत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. अनिल कावरखे

वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम

००००

कोट बॉक्स

उन्हामुळे त्वचेवर परिणाम होतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतोवर उन्हात जाणे टाळावे. जास्त प्रमाणात घाम आल्यास घामोळ्या होण्याची दाट शक्यता असते. उन्हातील अतिनील किरणांचा त्वचेवर परिणाम होऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळून येताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. विठ्ठल गोटे,

त्वचारोग तज्ज्ञ, वाशिम