शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उन्हाळी भुईमुगाची आवक वाढली, भाव घसरले

By admin | Updated: May 27, 2017 19:37 IST

उन्हाळी भुईमुगाची काढणी अंतिम टप्प्यात; शेतकरी निराश

वाशिम: उन्हाळी भुईमुगाची काढणी अंतिम टप्प्यात असून, यंदा या पिकाचे उत्पादन ब-यापैकी झाल्याने बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याचे दिसत आहे. तथापि, गतवर्षीच्या तुलनेत यंदा या वाणालाही खुप कमी भाव मिळत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत. यंदा जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत उन्हाळी भुईमुगाचा पेरा दुप्पट झाला होता. गतवर्षी ३ हजार ३७४ हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली होती. ते प्रमाण यंदा ६ हजार हेक्टरच्यावर गेले होते. त्यातच पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांना या पिकाचे एकराला सरासरी पाच क्विंटल उत्पादन झाले. त्यामुळे तूर आणि सोयाबीनमध्ये फटका खाणारे शेतकरी उत्साही होते; परंतु त्या उत्साहावरही बाजार व्यवस्थेने विरजन घातले आहे. मागील वर्षी प्रति क्विंटल ५ हजार ८०० रुपयांपर्यंत विकला जाणारा भुईमूग यंदा कमाल ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी ३ हजार ९०० रुपये क्विंटलने घेतला जात आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे निराश झाले आहेत. दरम्यान, खरीपाचा हंगाम तोंडावर आला असल्याने या हंगामासाठी हाती पैसा असावा म्हणून शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने घरात साठवलेले धान्य विकण्याची तयारी केली असून, नुकत्याच काढलेल्या भुईमुगाची विक्रीही करण्याची घाई त्यांना झाली आहे. त्यामुळे बाजारात भुईमुगाची आवक वाढली आहे. एकट्या कारंजा येथील बाजार समितीमध्ये २६ मे रोजी तब्बल पाच हजार क्विंटल भुईमुगाची आवक झाली होती.