शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:40 IST

वाशिम : जिल्ह्यात २२ जुलै रोजी काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याने या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण ...

वाशिम : जिल्ह्यात २२ जुलै रोजी काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याने या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले. मंगरूळपीर, मानोरा तालुक्यातील पंचनाम्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांच्यासह संबंधित अधिकारी व विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मंगरूळपीर व मानोरा तालुक्यामधील जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त प्रत्येक क्षेत्रावरील पिकाचे अचूक पंचनामे होतील, तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी यामधून सुटू नये, याची दक्षता घ्यावी. ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यांनी ऑनलाईन अथवा ऑफलाईन स्वरुपात नुकसानीची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. त्यानुसार तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे प्राप्त पूर्व सूचनांचे अर्ज विहित कालावधीमध्ये विमा कंपनीकडे सुपूर्द करावेत, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. पीक नुकसानाच्या अनुषंगाने मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात सद्यस्थितीत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच पंचनाम्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना केल्या.

०००००

विमा कंपनीचे तालुकानिहाय प्रतिनिधी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपनीने प्रत्येक तालुक्यासाठी प्रतिनिधी नेमले आहेत. या सर्व तालुकास्तरीय प्रतिनिधींनी कार्यालयीन वेळेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहून कामकाज करावे. पीक विम्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या.

०००००००

७२ तासांत पूर्वकल्पना द्यावी

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास ऑनलाईन स्वरुपात, टोल फ्री क्रमांकावर नुकसानाची पूर्वकल्पना ७२ तासांत विमा कंपनीला देण्याविषयी कळविण्यात आले आहे. तसेच यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयात सुद्धा ऑफलाईन स्वरुपात नुकसानाची पूर्वकल्पना देता येईल, असे कळविण्यात आले होते. त्यानुसार या कार्यालयांकडे प्राप्त झालेले शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनीकडे सादर करावेत, असे त्यांनी सांगितले.