शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:40 IST

वाशिम : जिल्ह्यात २२ जुलै रोजी काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याने या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण ...

वाशिम : जिल्ह्यात २२ जुलै रोजी काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाल्याने या नुकसानाचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले. मंगरूळपीर, मानोरा तालुक्यातील पंचनाम्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांच्यासह संबंधित अधिकारी व विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मंगरूळपीर व मानोरा तालुक्यामधील जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त प्रत्येक क्षेत्रावरील पिकाचे अचूक पंचनामे होतील, तसेच एकही नुकसानग्रस्त शेतकरी यामधून सुटू नये, याची दक्षता घ्यावी. ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यांनी ऑनलाईन अथवा ऑफलाईन स्वरुपात नुकसानीची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. त्यानुसार तहसील कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे प्राप्त पूर्व सूचनांचे अर्ज विहित कालावधीमध्ये विमा कंपनीकडे सुपूर्द करावेत, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. पीक नुकसानाच्या अनुषंगाने मंगरूळपीर व मानोरा तालुक्यात सद्यस्थितीत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. तसेच पंचनाम्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना केल्या.

०००००

विमा कंपनीचे तालुकानिहाय प्रतिनिधी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विमा कंपनीने प्रत्येक तालुक्यासाठी प्रतिनिधी नेमले आहेत. या सर्व तालुकास्तरीय प्रतिनिधींनी कार्यालयीन वेळेत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहून कामकाज करावे. पीक विम्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या.

०००००००

७२ तासांत पूर्वकल्पना द्यावी

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार म्हणाले, ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यांनी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास ऑनलाईन स्वरुपात, टोल फ्री क्रमांकावर नुकसानाची पूर्वकल्पना ७२ तासांत विमा कंपनीला देण्याविषयी कळविण्यात आले आहे. तसेच यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयात सुद्धा ऑफलाईन स्वरुपात नुकसानाची पूर्वकल्पना देता येईल, असे कळविण्यात आले होते. त्यानुसार या कार्यालयांकडे प्राप्त झालेले शेतकऱ्यांचे अर्ज विमा कंपनीकडे सादर करावेत, असे त्यांनी सांगितले.