शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

सुभाष ठाकरे यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 14:00 IST

मंगरुळपीर  : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक स्व.वसंतरावजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे  यांनी  १ लाख स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे. या अभियानाची माहिती  ९ जानेवारी रोजी त्यांनी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिल्ली येथे भेट घेऊन दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर  : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक स्व.वसंतरावजी नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे  यांनी  १ लाख स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे. या अभियानाची माहिती  ९ जानेवारी रोजी त्यांनी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिल्ली येथे भेट घेऊन दिली.महाराष्ट्राच्या विकासात स्व.वसंतराव नाईक यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी स्व. नाईक यांना भारतरत्न मिळावा म्हणून माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे यांनी स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे. या अभियानांतर्गत गावोगावी जाऊन स्वाक्षºया घेण्यात येत आहेत. यासंदर्भात ठाकरे यांनी  ९ जानेवारी रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन एक लाख स्वाक्षरी अभियानाची माहिती दिली. तसेच सदर अभियान २२ जानेवारीपर्यंत राबविण्यात येणार असून त्यानंतर एक लाख स्वाक्षरीचे निवेदन प्रशासनातर्फे आपणाकडे पाठविण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रपतींनी ३० मिनिटे वेळ देऊन स्वाक्षरी अभियानाबद्दल आनंद व्यक्त करून ठाकरे हे याबाबत सर्वोत्कृष्ट उपक्रम राबवीत असून हे नक्कीच यशस्वी होईल असे सांगत  या कार्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी खा.मधुकरराव कुकडे, जिल्हा परिषद सदस्य गजानन अमदाबादकर यांची उपस्थिती होती. तसेच ८ जानेवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री  राजनाथसिह यांची सुद्धा ठाकरे यांनी दिल्ली येथे भेट घेऊन याविषयी माहिती दिली.

टॅग्स :washimवाशिमPoliticsराजकारण