शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष चौक जपतोय नेताजींच्या स्मृती

By admin | Updated: January 23, 2017 11:59 IST

स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंदसेना स्थापन केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये या सेनेला उद्देशून केलेले भाषण वाशिम शहरातील राष्ट्रप्रेमींनी चौकात ऐकले होते.

ऑनलाइन लोकमत
वासिम दि. २३ -  स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंदसेना स्थापन केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये या सेनेला उद्देशून केलेले भाषण वाशिम शहरातील राष्ट्रप्रेमी व क्रांतिकारक विचारांनी भारलेल्या तरुणांनी त्या काळात शहरातील एका चौकात रेडिओ लावून जाहीरपणे  ऐकले होते. तेव्हा या चौकाचे नाव सुभाष चौक देण्यात आले होते.  हाच चौक आताही नेताजींच्या स्मृती जपतो आहे.  आज, २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असून या चौकात त्यांना युवकांच्यावतीने अभिवादन केले जाते. 
वाशिम जिल्ह्याचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अतिशय जाज्वल्य आहे. जिल्ह्यात सशस्त्र क्रांतीकारक गंगाधर सदाशिव कल्याणकर, रामचंद्र आनंदराव फाळके व अन्य क्रांतिकारकांनी १९२७ साली जहालांची गट बनवून इंग्रजांविरुद्ध अनेक षडयंत्रे रचली. स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंदसेना स्थापन केल्यानंतर शहरातील सुभाष चौकात रेडिओ लावून जाहीरपणे हे भाषण ऐकले होते. वाशिममधील तो चौक सुभाष चौक या नावाने नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यांची आझाद हिंद सेना व त्या काळी त्यांच्या विचारांनी भारावलेल्या युवकांच्या मनात चेतलेल्या राष्ट्रप्रेमाच्या स्फुलिंगांची आठवण अद्यापही जपत आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी लढा लढण्यासाठी बहाद्दर अशा शुरवीर तरुणांची आझाद हिंदसेना स्थापन केली होती. त्यांनी त्या काळी देशातील तरुणांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागवीत त्यांना ब्रिटीशाविरुद्ध सशस्त्र लढा देण्यासाठी सज्ज केले होते.त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी भरलेल्या भाषणांनी त्यावेळी देशातील तरुणांचे रक्त सळसळत असे. ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ अशी घोषणा देणा-या नेताजींच्या नेतृत्वाखाली अनेक तरूण आझाद हिंद सेनेत दाखल झाले होेते. जे प्रत्यक्ष आझाद हिंद सेनेमध्ये दाखल झाले नाहीत,  परंतु, नेताजींच्या सशस्त्र लढ्याला ज्यांचा पाठिंबा होता. मनापासून त्यांच्यासोबत होते अशा तरुणांचीही संख्या देशात मोठी होती. त्यावेळी वाशिम शहरातदेखील त्यांच्या विचारांनी भारलेले अनेक तरुण होते. या तरुणांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमधून आझाद हिंद सेनेला उद्देशून दिलेल्या भाषणाचे रेडिओ आॅफ जपानवरुन केले जाणारे प्रसारण जाहीरपणे चौकात रेडिओ लावून ऐकायचे असे ठरवले. त्यानुसार ब्रिटिश सैनिकांची भिती न बाळगता ठरलेल्या वेळी शहरातील काटीवेसच्या दक्षिणेस असलेल्या चौकात रेडिओ लावून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भाषण स्वत: ऐकलेच पण, सर्वांना ऐकवले. या घटनेची स्मृती म्हणून स्वातंत्र्यानंतर या चौकाचे नेताजी सुभाषचंद्र बोस चौक असे रीतसर नामकरण करण्यात आले. 
आता तो सुभाष चौक नावाने ओळखला जातो. स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऐकलेल्या भाषणाची व त्या आठवणीची स्मृती ताजी ठेवून जपत आहे.