शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

सुभाष चौक जपतोय नेताजींच्या स्मृती

By admin | Updated: January 23, 2017 11:59 IST

स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंदसेना स्थापन केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये या सेनेला उद्देशून केलेले भाषण वाशिम शहरातील राष्ट्रप्रेमींनी चौकात ऐकले होते.

ऑनलाइन लोकमत
वासिम दि. २३ -  स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंदसेना स्थापन केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये या सेनेला उद्देशून केलेले भाषण वाशिम शहरातील राष्ट्रप्रेमी व क्रांतिकारक विचारांनी भारलेल्या तरुणांनी त्या काळात शहरातील एका चौकात रेडिओ लावून जाहीरपणे  ऐकले होते. तेव्हा या चौकाचे नाव सुभाष चौक देण्यात आले होते.  हाच चौक आताही नेताजींच्या स्मृती जपतो आहे.  आज, २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असून या चौकात त्यांना युवकांच्यावतीने अभिवादन केले जाते. 
वाशिम जिल्ह्याचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अतिशय जाज्वल्य आहे. जिल्ह्यात सशस्त्र क्रांतीकारक गंगाधर सदाशिव कल्याणकर, रामचंद्र आनंदराव फाळके व अन्य क्रांतिकारकांनी १९२७ साली जहालांची गट बनवून इंग्रजांविरुद्ध अनेक षडयंत्रे रचली. स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंदसेना स्थापन केल्यानंतर शहरातील सुभाष चौकात रेडिओ लावून जाहीरपणे हे भाषण ऐकले होते. वाशिममधील तो चौक सुभाष चौक या नावाने नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यांची आझाद हिंद सेना व त्या काळी त्यांच्या विचारांनी भारावलेल्या युवकांच्या मनात चेतलेल्या राष्ट्रप्रेमाच्या स्फुलिंगांची आठवण अद्यापही जपत आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी लढा लढण्यासाठी बहाद्दर अशा शुरवीर तरुणांची आझाद हिंदसेना स्थापन केली होती. त्यांनी त्या काळी देशातील तरुणांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागवीत त्यांना ब्रिटीशाविरुद्ध सशस्त्र लढा देण्यासाठी सज्ज केले होते.त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी भरलेल्या भाषणांनी त्यावेळी देशातील तरुणांचे रक्त सळसळत असे. ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ अशी घोषणा देणा-या नेताजींच्या नेतृत्वाखाली अनेक तरूण आझाद हिंद सेनेत दाखल झाले होेते. जे प्रत्यक्ष आझाद हिंद सेनेमध्ये दाखल झाले नाहीत,  परंतु, नेताजींच्या सशस्त्र लढ्याला ज्यांचा पाठिंबा होता. मनापासून त्यांच्यासोबत होते अशा तरुणांचीही संख्या देशात मोठी होती. त्यावेळी वाशिम शहरातदेखील त्यांच्या विचारांनी भारलेले अनेक तरुण होते. या तरुणांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमधून आझाद हिंद सेनेला उद्देशून दिलेल्या भाषणाचे रेडिओ आॅफ जपानवरुन केले जाणारे प्रसारण जाहीरपणे चौकात रेडिओ लावून ऐकायचे असे ठरवले. त्यानुसार ब्रिटिश सैनिकांची भिती न बाळगता ठरलेल्या वेळी शहरातील काटीवेसच्या दक्षिणेस असलेल्या चौकात रेडिओ लावून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भाषण स्वत: ऐकलेच पण, सर्वांना ऐकवले. या घटनेची स्मृती म्हणून स्वातंत्र्यानंतर या चौकाचे नेताजी सुभाषचंद्र बोस चौक असे रीतसर नामकरण करण्यात आले. 
आता तो सुभाष चौक नावाने ओळखला जातो. स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऐकलेल्या भाषणाची व त्या आठवणीची स्मृती ताजी ठेवून जपत आहे.