शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

सुभाष चौक जपतोय नेताजींच्या स्मृती

By admin | Updated: January 23, 2017 11:59 IST

स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंदसेना स्थापन केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये या सेनेला उद्देशून केलेले भाषण वाशिम शहरातील राष्ट्रप्रेमींनी चौकात ऐकले होते.

ऑनलाइन लोकमत
वासिम दि. २३ -  स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंदसेना स्थापन केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमध्ये या सेनेला उद्देशून केलेले भाषण वाशिम शहरातील राष्ट्रप्रेमी व क्रांतिकारक विचारांनी भारलेल्या तरुणांनी त्या काळात शहरातील एका चौकात रेडिओ लावून जाहीरपणे  ऐकले होते. तेव्हा या चौकाचे नाव सुभाष चौक देण्यात आले होते.  हाच चौक आताही नेताजींच्या स्मृती जपतो आहे.  आज, २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असून या चौकात त्यांना युवकांच्यावतीने अभिवादन केले जाते. 
वाशिम जिल्ह्याचा स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास अतिशय जाज्वल्य आहे. जिल्ह्यात सशस्त्र क्रांतीकारक गंगाधर सदाशिव कल्याणकर, रामचंद्र आनंदराव फाळके व अन्य क्रांतिकारकांनी १९२७ साली जहालांची गट बनवून इंग्रजांविरुद्ध अनेक षडयंत्रे रचली. स्वातंत्र्यलढ्यात आझाद हिंदसेना स्थापन केल्यानंतर शहरातील सुभाष चौकात रेडिओ लावून जाहीरपणे हे भाषण ऐकले होते. वाशिममधील तो चौक सुभाष चौक या नावाने नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यांची आझाद हिंद सेना व त्या काळी त्यांच्या विचारांनी भारावलेल्या युवकांच्या मनात चेतलेल्या राष्ट्रप्रेमाच्या स्फुलिंगांची आठवण अद्यापही जपत आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वातंत्र्यासाठी लढा लढण्यासाठी बहाद्दर अशा शुरवीर तरुणांची आझाद हिंदसेना स्थापन केली होती. त्यांनी त्या काळी देशातील तरुणांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना जागवीत त्यांना ब्रिटीशाविरुद्ध सशस्त्र लढा देण्यासाठी सज्ज केले होते.त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी भरलेल्या भाषणांनी त्यावेळी देशातील तरुणांचे रक्त सळसळत असे. ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ अशी घोषणा देणा-या नेताजींच्या नेतृत्वाखाली अनेक तरूण आझाद हिंद सेनेत दाखल झाले होेते. जे प्रत्यक्ष आझाद हिंद सेनेमध्ये दाखल झाले नाहीत,  परंतु, नेताजींच्या सशस्त्र लढ्याला ज्यांचा पाठिंबा होता. मनापासून त्यांच्यासोबत होते अशा तरुणांचीही संख्या देशात मोठी होती. त्यावेळी वाशिम शहरातदेखील त्यांच्या विचारांनी भारलेले अनेक तरुण होते. या तरुणांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानमधून आझाद हिंद सेनेला उद्देशून दिलेल्या भाषणाचे रेडिओ आॅफ जपानवरुन केले जाणारे प्रसारण जाहीरपणे चौकात रेडिओ लावून ऐकायचे असे ठरवले. त्यानुसार ब्रिटिश सैनिकांची भिती न बाळगता ठरलेल्या वेळी शहरातील काटीवेसच्या दक्षिणेस असलेल्या चौकात रेडिओ लावून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भाषण स्वत: ऐकलेच पण, सर्वांना ऐकवले. या घटनेची स्मृती म्हणून स्वातंत्र्यानंतर या चौकाचे नेताजी सुभाषचंद्र बोस चौक असे रीतसर नामकरण करण्यात आले. 
आता तो सुभाष चौक नावाने ओळखला जातो. स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऐकलेल्या भाषणाची व त्या आठवणीची स्मृती ताजी ठेवून जपत आहे.