शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

राजगाव येथील उपबाजार अनियमित

By admin | Updated: June 16, 2014 00:45 IST

उपबाजार कधी सुरू तर बहुतांश वेळा बंदच राहत असल्याने शेतकरीदेखील संभ्रमात असतात.

नराजगाव : शेतकर्‍यांची गैरसोय दूर करण्याचा डांगोरा पिटत वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने राजगाव येथे उपबाजाराची सुविधा सहा वर्षांपुर्वी उपलब्ध केली आहे. मात्र, हा उपबाजार कधी सुरू तर बहुतांश वेळा बंदच राहत असल्याने शेतकरीदेखील संभ्रमात असतात. राजगाव परिसरातील शेतकर्‍यांना आपला शेतमाल विक्रिला आणण्यासाठी वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे धाव घ्यावी लागत असे. मराठवाड्याच्या शेवटच्या टोकावरील तथा राजगाव परिसरातील शेतकर्‍यांची शेतमालाची विक्री करताना गैरसोय होऊ नये म्हणून वाशिम बाजार समितीने ४ एप्रिल २00७ रोजी राजगाव येथे उपबाजाराचा स्थापना केली. त्यानंतर हा उपबाजार काही महिने नियमित सुरू होता. सात-आठ महिन्याने उपबाजार ह्यकधी सुरू तर कधी बंदह्ण या फेर्‍यात अडकला. या फेर्‍यातून अजूनही उपबाजाराची सुटका होऊ शकली नाही. त्यामुळे मराठवाडा व राजगाव परिसरातील शेतकर्‍यांना वाशिमला शेतमाल आणावा लागत आहे. यामध्ये वेळ आणि पैशाच्या अपव्यय होत आहे. उपबाजार नियमितपणे सुरू राहत नसल्याने तसेच याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याने गैरसोय होत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. तर या उपबाजारात शेतकरीबांधवच जास्त प्रमाणात शेतमाल आणत नसल्याचा युक्तीवाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकार्‍यांनी केला आहे. शेतकर्‍यांनी नियमितपणे पुरेसा प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला तर उपबाजार नियमितपणे सुरू राहु शकतो. शेतमाल पुरेशा प्रमाणात येत नसल्याने उपबाजार नाईलाजाने अनियमित राहतो, असेही एका पदाधिकार्‍याने सांगितले.