शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

राजगाव येथील उपबाजार अनियमित

By admin | Updated: June 16, 2014 00:45 IST

उपबाजार कधी सुरू तर बहुतांश वेळा बंदच राहत असल्याने शेतकरीदेखील संभ्रमात असतात.

नराजगाव : शेतकर्‍यांची गैरसोय दूर करण्याचा डांगोरा पिटत वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने राजगाव येथे उपबाजाराची सुविधा सहा वर्षांपुर्वी उपलब्ध केली आहे. मात्र, हा उपबाजार कधी सुरू तर बहुतांश वेळा बंदच राहत असल्याने शेतकरीदेखील संभ्रमात असतात. राजगाव परिसरातील शेतकर्‍यांना आपला शेतमाल विक्रिला आणण्यासाठी वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे धाव घ्यावी लागत असे. मराठवाड्याच्या शेवटच्या टोकावरील तथा राजगाव परिसरातील शेतकर्‍यांची शेतमालाची विक्री करताना गैरसोय होऊ नये म्हणून वाशिम बाजार समितीने ४ एप्रिल २00७ रोजी राजगाव येथे उपबाजाराचा स्थापना केली. त्यानंतर हा उपबाजार काही महिने नियमित सुरू होता. सात-आठ महिन्याने उपबाजार ह्यकधी सुरू तर कधी बंदह्ण या फेर्‍यात अडकला. या फेर्‍यातून अजूनही उपबाजाराची सुटका होऊ शकली नाही. त्यामुळे मराठवाडा व राजगाव परिसरातील शेतकर्‍यांना वाशिमला शेतमाल आणावा लागत आहे. यामध्ये वेळ आणि पैशाच्या अपव्यय होत आहे. उपबाजार नियमितपणे सुरू राहत नसल्याने तसेच याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याने गैरसोय होत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. तर या उपबाजारात शेतकरीबांधवच जास्त प्रमाणात शेतमाल आणत नसल्याचा युक्तीवाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकार्‍यांनी केला आहे. शेतकर्‍यांनी नियमितपणे पुरेसा प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला तर उपबाजार नियमितपणे सुरू राहु शकतो. शेतमाल पुरेशा प्रमाणात येत नसल्याने उपबाजार नाईलाजाने अनियमित राहतो, असेही एका पदाधिकार्‍याने सांगितले.