शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

राजगाव येथील उपबाजार अनियमित

By admin | Updated: June 16, 2014 00:45 IST

उपबाजार कधी सुरू तर बहुतांश वेळा बंदच राहत असल्याने शेतकरीदेखील संभ्रमात असतात.

नराजगाव : शेतकर्‍यांची गैरसोय दूर करण्याचा डांगोरा पिटत वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने राजगाव येथे उपबाजाराची सुविधा सहा वर्षांपुर्वी उपलब्ध केली आहे. मात्र, हा उपबाजार कधी सुरू तर बहुतांश वेळा बंदच राहत असल्याने शेतकरीदेखील संभ्रमात असतात. राजगाव परिसरातील शेतकर्‍यांना आपला शेतमाल विक्रिला आणण्यासाठी वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे धाव घ्यावी लागत असे. मराठवाड्याच्या शेवटच्या टोकावरील तथा राजगाव परिसरातील शेतकर्‍यांची शेतमालाची विक्री करताना गैरसोय होऊ नये म्हणून वाशिम बाजार समितीने ४ एप्रिल २00७ रोजी राजगाव येथे उपबाजाराचा स्थापना केली. त्यानंतर हा उपबाजार काही महिने नियमित सुरू होता. सात-आठ महिन्याने उपबाजार ह्यकधी सुरू तर कधी बंदह्ण या फेर्‍यात अडकला. या फेर्‍यातून अजूनही उपबाजाराची सुटका होऊ शकली नाही. त्यामुळे मराठवाडा व राजगाव परिसरातील शेतकर्‍यांना वाशिमला शेतमाल आणावा लागत आहे. यामध्ये वेळ आणि पैशाच्या अपव्यय होत आहे. उपबाजार नियमितपणे सुरू राहत नसल्याने तसेच याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली जात नसल्याने गैरसोय होत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. तर या उपबाजारात शेतकरीबांधवच जास्त प्रमाणात शेतमाल आणत नसल्याचा युक्तीवाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकार्‍यांनी केला आहे. शेतकर्‍यांनी नियमितपणे पुरेसा प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला तर उपबाजार नियमितपणे सुरू राहु शकतो. शेतमाल पुरेशा प्रमाणात येत नसल्याने उपबाजार नाईलाजाने अनियमित राहतो, असेही एका पदाधिकार्‍याने सांगितले.