शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वाशिम शहरातील अरुंद रस्त्यांवर जडवाहनांचे अतिक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 22:36 IST

वाशिम शहरातील अंतर्गत वाहतूकीचा पुरता बट्टयाबोळ उडाला असून, रहदारीच्या अरूंद रस्त्यांवर जडवाहनांकडून एकप्रकारे अतिक्रमण करणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. रविवार या बाजारच्या दिवशी तर हा प्रश्न अधिकच बिकट होतो. जडवाहनांना शहरात प्रवेशबंदीसाठी करण्याची मागणी जोर धरत आहे. 

ठळक मुद्देकुठलेचा निर्बंध नसल्याने समस्या अधिक बिकटजडवाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या वाशिम शहरातील दैनंदिन वाहतूकीचा पुरता बट्टयाबोळ उडत असून रहदारीच्या अरूंद रस्त्यांवर जडवाहनांकडून एकप्रकारे अतिक्रमण करणे सुरू असल्याचे दिसून येत आहे. रविवार या बाजारच्या दिवशी तर हा प्रश्न अधिकच बिकट होतो. तथापि, शहर वाहतूक विभाग आणि नगर परिषद प्रशासनाने संयुक्तरित्या मोहिम राबवून गर्दीच्या वेळा लक्षात घेता, जडवाहनांना शहरात प्रवेशबंदीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. वाशिम शहरात रविवार हा बाजारचा दिवस आहे. वास्तविक पाहता आठवडी बाजाराकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात जागा देण्यात आलेली आहे. मात्र, बहुतांश भाजीविक्रेते गेल्या अनेक वर्षांपासून शहराचा आत्मा समजल्या जाणा-या पाटणी चौक ते शिवाजी चौकादरम्यानच्या रस्त्यावरच बाजार भरवितात. या रस्त्यावरील दुभाजकही भाजीविक्रेत्यांनी मोकळा सोडलेला नाही. विशेष गंभीर बाब म्हणजे फळविक्रेत्यांच्या हातगाड्या रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने वाहतूक वारंवार विस्कळित होत आहे. एवढी गंभीर स्थिती असताना जडवाहनांवरही कुठलेच निर्बंध नसल्याने समस्येत अधिकच भर पडली आहे. ट्रक, ट्रॅक्टर अथवा यासारखेच एखादे मोठे वाहन गर्दीतून वाट काढत असताना तासन्तास छोटी वाहने अडकून राहतात. एकूणच या सर्व समस्यांवर प्रभावी तोडगा काढण्याकरिता शहरांतर्गत रस्त्यांवर जडवाहनांना प्रवेश नाकारणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.  

टॅग्स :Marketबाजार