शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
3
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
4
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
5
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
6
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
7
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
8
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
9
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
10
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
11
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
12
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
13
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
14
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
15
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
16
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
17
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
18
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
19
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
20
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश

२९ ग्रामपंचायतींची होणार राज्यस्तरीय तपासणी!

By admin | Updated: August 10, 2016 01:26 IST

वाशिम जिल्ह्यातील हगणदरीमुक्त गावांबाबत विभागीय चमूचा अहवाल; २९ ग्रामपंचायती तिस-या टप्प्यातील राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरल्या आहेत.

दादाराव गायकवाड वाशिम, दि. 0९: जिल्ह्यातील हागणदारीमुक्त ३२ गावांची विभागीय स्तरावरील दुसर्‍या टप्प्यातील तपासणी २७ ते ३0 जुलैदरम्यान करण्यात आली. या तपासणीत जिल्ह्यातील २९ ग्रामपंचायती तिसर्‍या टप्प्यातील राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरल्या आहेत. जिल्हा परिषद स्वच्छता मिशन कक्षाकडून ९ ऑगस्ट रोजी ही माहिती प्राप्त झाली.राज्यात २0१४ पासून स्वच्छ भारत मिशन अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. याअंतर्गत उघड्यावर शौचास जाणार्‍या कुटुंबांची माहिती घेऊन त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासह शौचालय ंबांधण्यासाठी प्रेरित केले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्यावतीने ह्यबेसलाईनह्ण तपासणी करून गावांतील शौचालयधारकांची माहिती घेऊन शौचालय नसलेल्या कुटुंबाना शौचालय बांधण्याचे आवाहन केले जात आहे. या अभियानांतर्गत २0१५-१६ या आर्थिक वर्षात निर्धारित उद्दिष्ट पूर्ण केलेल्या ३२ ग्रामंपचायती जिल्हास्तरावरावरील तपासणीत हगणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या. त्यानंतर हगणदरीमुक्त गावांची माहिती दुसर्‍या टप्प्यातील तपासणीसाठी विभागीय स्तरावर देण्यात आली. अमरावती येथील विभागीय चमूने २७ ते ३१ जुलैदरम्यान संबंधित गावांची तपासणी केली. या चमूने आपला अहवाल वाशिम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडे सादर केला. त्यानुसार, ३२ पैकी २९ ग्रामपंचायती तिसर्‍या टप्प्यातील राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरल्या. विभागीय पथकाने यासंदर्भातील अहवाल राज्याच्या स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाकडे सादर केला असून, आता राज्यस्तरीय चमूकडूून लवकरच या गावांची तपासणी होणार आहे. याबाबतच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत.