शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
7
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
8
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
9
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
10
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
11
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
12
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
13
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
14
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
15
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
16
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
17
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
18
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
19
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
20
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश

२९ ग्रामपंचायतींची होणार राज्यस्तरीय तपासणी!

By admin | Updated: August 10, 2016 01:26 IST

वाशिम जिल्ह्यातील हगणदरीमुक्त गावांबाबत विभागीय चमूचा अहवाल; २९ ग्रामपंचायती तिस-या टप्प्यातील राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरल्या आहेत.

दादाराव गायकवाड वाशिम, दि. 0९: जिल्ह्यातील हागणदारीमुक्त ३२ गावांची विभागीय स्तरावरील दुसर्‍या टप्प्यातील तपासणी २७ ते ३0 जुलैदरम्यान करण्यात आली. या तपासणीत जिल्ह्यातील २९ ग्रामपंचायती तिसर्‍या टप्प्यातील राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरल्या आहेत. जिल्हा परिषद स्वच्छता मिशन कक्षाकडून ९ ऑगस्ट रोजी ही माहिती प्राप्त झाली.राज्यात २0१४ पासून स्वच्छ भारत मिशन अभियान (ग्रामीण) राबविण्यात येत आहे. याअंतर्गत उघड्यावर शौचास जाणार्‍या कुटुंबांची माहिती घेऊन त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासह शौचालय ंबांधण्यासाठी प्रेरित केले जात आहे. या अभियानांतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्यावतीने ह्यबेसलाईनह्ण तपासणी करून गावांतील शौचालयधारकांची माहिती घेऊन शौचालय नसलेल्या कुटुंबाना शौचालय बांधण्याचे आवाहन केले जात आहे. या अभियानांतर्गत २0१५-१६ या आर्थिक वर्षात निर्धारित उद्दिष्ट पूर्ण केलेल्या ३२ ग्रामंपचायती जिल्हास्तरावरावरील तपासणीत हगणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या. त्यानंतर हगणदरीमुक्त गावांची माहिती दुसर्‍या टप्प्यातील तपासणीसाठी विभागीय स्तरावर देण्यात आली. अमरावती येथील विभागीय चमूने २७ ते ३१ जुलैदरम्यान संबंधित गावांची तपासणी केली. या चमूने आपला अहवाल वाशिम जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडे सादर केला. त्यानुसार, ३२ पैकी २९ ग्रामपंचायती तिसर्‍या टप्प्यातील राज्यस्तरीय तपासणीसाठी पात्र ठरल्या. विभागीय पथकाने यासंदर्भातील अहवाल राज्याच्या स्वच्छता आणि पाणीपुरवठा विभागाकडे सादर केला असून, आता राज्यस्तरीय चमूकडूून लवकरच या गावांची तपासणी होणार आहे. याबाबतच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या आहेत.