शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

सोयाबीन क्षेत्रात गंधक, सुक्ष्मअन्नद्रव्य वाढीवर भर

By admin | Updated: October 10, 2014 00:27 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे विदर्भात शेती शाळा.

अकोला : विदर्भात सोयाबीनचे क्षेत्र वाढत असून, या क्षेत्रातील गंधक, सुक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण घटत आहे. ही एक धोक्यांची घंटा असल्याने, या घटकांचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे विदर्भात शेती शाळा कार्यक्रम राबवून, शेतकर्‍यांना माहिती देण्यात येत आहे. शेतीतील गंधक व दुय्यम सुक्ष्म अन्नद्रव्ये घटत असल्याने कृषी विद्यापीठाने याचा गांर्भियाने विचार सुरू केला असून, विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायन विभागातंर्गत अखिल भारतीय समन्वयीत सुक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये प्रकल्पाच्यावतीने विदर्भात शेती शाळांचे आयोजन करू न शेतकर्‍यांना या धोक्यापासून अवगत करण्यात येत आहे. गंधक व सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पीके, प्राणी आणि मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. या घटकांची जमिनीतील घसरण थांबवणे आणि जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रीय खतासोबतच, संतुलीत खताचा वापर यापुढे करावा लागणार आहे. कृषी विद्यापीठाने आदिवासी भागासह, विदर्भातील प्रत्येक जिल्हयात शेती शाळा कार्यक्रम सुरू केले आहेत. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून यासाठी जनजागृती सुरू आहे. असे असले तरी शेतीतील गंधक, दुय्यम अन्नद्रव्याचे संतुलन राखणे कठीणच होत चालले आहे. यासाठीचे मार्गदर्शन या शेती शाळांमधून करण्यात येत असले तरी, भरघोस पण कमी खर्चात उत्पादन काढण्याच्या मागे लागलेल्या शेतकर्‍यांना समजावून सांगण्यात विद्यापीठ किती यशस्वी होते, हे येणारा काळच सांगणार आहे. यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, सामाजिक संघटनांना सामुहिक चळवळ राबवावी लागणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कृषी विद्यापीठातील रसायनशास्त्रज्ञ डॉ. नितीन कोंडे यांनी शेतातील गंधक व सुक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पीक उत्पादनात घट होत असून शेतीतील या घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी शेती शाळा व इतर माध्यमातून शेतकर्‍यांची जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.