शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच; शेतकरी म्हणतात आता काय करू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST

वाशिम : नवीन सोयाबीन बाजारामध्ये येताच बाजारभावात घसरण सुरूच असून, गत तीन दिवसात दीड हजाराने बाजारभाव कोसळले आहेत. बाजारभावातील ...

वाशिम : नवीन सोयाबीन बाजारामध्ये येताच बाजारभावात घसरण सुरूच असून, गत तीन दिवसात दीड हजाराने बाजारभाव कोसळले आहेत. बाजारभावातील घसरण पाहून शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

गतवर्षातील आर्थिक नुकसान विसरून यंदा नव्या उमेदीने शेतकरी शेतीच्या कामाला लागला. सोयाबीनला झळाळी मिळेल, या अपेक्षेने यंदा जिल्ह्यात सोयाबीनचा पेराही वाढला. दरवर्षी सरासरी तीन लाख ९० हजार हेक्टरच्या आसपास सोयाबीनचा पेरा असतो. यंदा चार लाखांचा टप्पा ओलांडला असून, बाजारभावही बऱ्यापैकी असल्याने ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. नवीन सोयाबीन बाजारामध्ये येण्यापूर्वी साधारणत: प्रतिक्विंटल ८,००० ते १०,००० रुपये दर होता. नवीन सोयाबीन बाजारामध्ये येण्याच्या पहिल्या दिवशी प्रतिक्विंटल ८,२५० रुपये दर मिळाला होता. त्यामुळे शेतकरीही सुखावला. मात्र, हा आनंद औटघटकेचा ठरला असून, त्यानंतर झपाट्याने बाजारभावात घसरण सुरू झाली. जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीमध्ये सोयाबीनसह अन्य शेतमालाला वेगवेगळे दर मिळतात. त्यामुळे सोयाबीनच्या दरातही तफावत दिसून येते. सोयाबीनच्या दरातील घसरण थांबली नसून, गत तीन दिवसात दीड हजाराने बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे यंत्रणेसमोर हतबल ठरलेल्या शेतकऱ्यांमधून ‘आता काय करावे?’ असा प्रश्न विचारला जात आहे.

.......

सोयाबीनच्या दरातील घसरण केव्हा थांबेल?

कोट

नवीन सोयाबीन बाजारामध्ये आले की दर कोसळतात, याचा अनुभव यावर्षीही शेतकऱ्यांना येत आहे. शेतमालाच्या किमती वगळता खते, बियाणे, कीटकनाशके, मजुरीच्या खर्चात प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे शेती कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

- बाळासाहेब खरात

प्रगतशील शेतकरी, पळसखेडा

..........

कधी नैसर्गिक तर कधी मानवी संकटापुढे शेतकरी हतबल ठरत आहे. यंदा सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळेल, अशी अपेक्षा असतानाच आता बाजारभाव कोसळत असल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग होत आहे. दरातील घसरण केव्हा थांबणार?

- रमेश अंभोरे, शेतकरी, चिखली

........

एकीकडे शेती लागवडीच्या खर्चात भरमसाठ वाढ होत आहे तर दुसरीकडे शेतमालाच्या किमतीत किंचितशी वाढ होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे. सोयाबीनच्या दरात घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.

- महादेव सोळंके, शेतकरी, नागठाणा