शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:36 IST

गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनला मोठी हाणी पोहोचवली आहे. बहुतांश शेतकर्‍यांचे सोयाबीन भिजल्याने प्रतवारीत दज्रेदारपणा राहिला नाही. परिणामी, भिजलेल्या सोयाबीनला कवडीमोल भावात विकण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय राहिला नाही. 

ठळक मुद्दे बाजारभावात घसरण  शेतकर्‍यांचे बजेट कोलमडतेय

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनला मोठी हाणी पोहोचवली आहे. बहुतांश शेतकर्‍यांचे सोयाबीन भिजल्याने प्रतवारीत दज्रेदारपणा राहिला नाही. परिणामी, भिजलेल्या सोयाबीनला कवडीमोल भावात विकण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय राहिला नाही. सन २0१६ चा अपवाद वगळता मागील तीन-चार वर्षांपासून निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतकर्‍यांवर नानाविध संकटे ओढवली होती. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने अपेक्षित उत्पादन झाले; मात्र शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशा पडली होती. गतवर्षीचे चांगले-वाईट अनुभव पचवित यावर्षीदेखील खरीप हंगामात शेतकर्‍यांनी मोठय़ा आनंदात पेरणी केली. यावर्षी चार लाख नऊ हजार हेक्टरपैकी सव्वा दोन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. पेरणीनंतर पावसात सातत्य नसल्याने तसेच ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत पाऊस गायब झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अशातच परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची दाणादाण उडविली. गत आठवड्यात चार ते पाच दिवस परतीचा दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतात सोंगून करून ठेवलेले सोयाबीन मोठय़ा प्रमाणात भिजले. तीन ते चार दिवसात फारसा खंड न दिल्याने शेतकर्‍यांना सोंगून ठेवलेले सोयाबीन वाळवितादेखील आले नाही. त्यामुळे आता भिजलेल्या सोयाबीनची प्रतवारी फारच खालावल्याचे दिसून येत आहे. सव्वा दोन लाख हेक्टरपैकी जवळपास ७0 ते ८0 हजार हेक्टरवरील सोयाबीनला परतीच्या पावसाने जबर हाणी पोहोचविल्याची भीती कृषी विभागानेदेखील वर्तविली आहे. गत तीन दिवसांपासून परतीचा पाऊस नसल्याने मोठय़ा प्रमाणात सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. तथापि, भिजलेल्या सोयाबीनची प्रतवारी घसरल्याने १२00 ते १५00 च्या दरम्यान या सोयाबीनला भाव मिळत असल्याचा दावा शेतकर्‍यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. बाजार समित्यांमध्ये भिजलेले सोयाबीन कवडीमोल भावाने घेतले जात असल्याने शेतकर्‍यांचे बजेट पुरते कोलमडून जात आहे. ऐन दिवाळीदरम्यान अशी परिस्थिती ओढवल्याने अल्प भूधारक शेतकर्‍यांवर आर्थिक संकट ओढवले. अगोदरच उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट; त्यातही परतीच्या पावसाने लावलेला ‘डाग’, यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे दिसून येते. परतीच्या पावसामुळे सोयाबीन भिजल्याने एक हजार ते १५00 रुपयादरम्यान या सोयाबीनला भाव मिळत असल्याचे किनखेडा येथील शेतकरी गजानन अवचार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

 

टॅग्स :agricultureशेती