शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:36 IST

गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनला मोठी हाणी पोहोचवली आहे. बहुतांश शेतकर्‍यांचे सोयाबीन भिजल्याने प्रतवारीत दज्रेदारपणा राहिला नाही. परिणामी, भिजलेल्या सोयाबीनला कवडीमोल भावात विकण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय राहिला नाही. 

ठळक मुद्दे बाजारभावात घसरण  शेतकर्‍यांचे बजेट कोलमडतेय

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनला मोठी हाणी पोहोचवली आहे. बहुतांश शेतकर्‍यांचे सोयाबीन भिजल्याने प्रतवारीत दज्रेदारपणा राहिला नाही. परिणामी, भिजलेल्या सोयाबीनला कवडीमोल भावात विकण्याशिवाय शेतकर्‍यांसमोर पर्याय राहिला नाही. सन २0१६ चा अपवाद वगळता मागील तीन-चार वर्षांपासून निसर्गाची साथ मिळाली नसल्याने शेतकर्‍यांवर नानाविध संकटे ओढवली होती. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने अपेक्षित उत्पादन झाले; मात्र शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशा पडली होती. गतवर्षीचे चांगले-वाईट अनुभव पचवित यावर्षीदेखील खरीप हंगामात शेतकर्‍यांनी मोठय़ा आनंदात पेरणी केली. यावर्षी चार लाख नऊ हजार हेक्टरपैकी सव्वा दोन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. पेरणीनंतर पावसात सातत्य नसल्याने तसेच ऐन शेंगा धरण्याच्या कालावधीत पाऊस गायब झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अशातच परतीच्या पावसाने सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांची दाणादाण उडविली. गत आठवड्यात चार ते पाच दिवस परतीचा दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतात सोंगून करून ठेवलेले सोयाबीन मोठय़ा प्रमाणात भिजले. तीन ते चार दिवसात फारसा खंड न दिल्याने शेतकर्‍यांना सोंगून ठेवलेले सोयाबीन वाळवितादेखील आले नाही. त्यामुळे आता भिजलेल्या सोयाबीनची प्रतवारी फारच खालावल्याचे दिसून येत आहे. सव्वा दोन लाख हेक्टरपैकी जवळपास ७0 ते ८0 हजार हेक्टरवरील सोयाबीनला परतीच्या पावसाने जबर हाणी पोहोचविल्याची भीती कृषी विभागानेदेखील वर्तविली आहे. गत तीन दिवसांपासून परतीचा पाऊस नसल्याने मोठय़ा प्रमाणात सोयाबीनची काढणी सुरू झाली आहे. तथापि, भिजलेल्या सोयाबीनची प्रतवारी घसरल्याने १२00 ते १५00 च्या दरम्यान या सोयाबीनला भाव मिळत असल्याचा दावा शेतकर्‍यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. बाजार समित्यांमध्ये भिजलेले सोयाबीन कवडीमोल भावाने घेतले जात असल्याने शेतकर्‍यांचे बजेट पुरते कोलमडून जात आहे. ऐन दिवाळीदरम्यान अशी परिस्थिती ओढवल्याने अल्प भूधारक शेतकर्‍यांवर आर्थिक संकट ओढवले. अगोदरच उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट; त्यातही परतीच्या पावसाने लावलेला ‘डाग’, यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे दिसून येते. परतीच्या पावसामुळे सोयाबीन भिजल्याने एक हजार ते १५00 रुपयादरम्यान या सोयाबीनला भाव मिळत असल्याचे किनखेडा येथील शेतकरी गजानन अवचार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

 

टॅग्स :agricultureशेती