शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

सोयाबीन सडले; पण शासकीय खरेदीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 14:40 IST

शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत सोयाबीन घरीच ठेवले होते; परंतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

- राजरत्न सिरसाट  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: मूग, उडिदाचे पीक हातचे गेले असताना सर्व भिस्त सोयाबीन पिकावर होती. पावसामुळे सोयाबीनचेही प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला आहे; परंतु अद्यापही शासकीय खरेदी केंद्र उघडण्यात आले नसल्याने जे काही अगोदर काढलेले सोयाबीन होते ते कवडीमोल दरात विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे.ज्या शेतकºयांनी जून महिन्यात सुरुवातीला पेरणी केली होती, त्यांनी सोयाबीन काढले आहे. अशा शेतकºयांचे प्रमाण अल्प असले तरी त्या शेतकºयांनी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याच्या प्रतीक्षेत सोयाबीन घरीच ठेवले होते; परंतु खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. केवळ सोयाबीन खरेदीसाठीची आॅनलाइन नोंदणीची मुदत वाढवली असून, शेतकºयांना आता १५ नोव्हेंबरपर्यंत सोयाबीन व उडीद पिकांची नोंदणी करता येणार असल्याचे पणन व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे सोयाबीनचा काढणी हंगाम सप्टेंबरमध्ये सुरू झाला. उडीद पिकाची तर त्यापूर्वीच काढणी झाली आहे; परंतु उडीद खरेदी केंद्रही सुरू झाले नाही. राज्यात यावर्षी ४० लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. दोन महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात भिजले आहे. शेतात उभ्या असलेल्या सोयाबीनलाही कोंब फुटले असून, शेतात कोणतेच वाहन नेता येत नसल्याने काढून ठेवलेले सोयाबीन जागेवरच सडले आहे.दरम्यान, शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने उडीद व सुरुवातीला काढलेले सोयाबीन बाजारात विकण्यात येत आहेत. तेथेही कवडीमोेल दरात खरेदी सुुरू आहे. शासनाने तातडीने खरेदी केंद्र सुरू करू न यावर्षी निकषात बदल करू न १२ टक्केऐवजी जास्त आर्द्रता असलेल्या शेमतालाची खरेदी करण्याची शेतकºयांची मागणी आहे.

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी