शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

पुरेसा पाऊस, बीज प्रक्रियेनंतरच पेरणी करावी -एस. एम. तोटावार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 11:32 IST

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सध्या खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे. शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. या हंगामाबाबत कृषी विभागाचे नियोजन आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया उपाययोजनांबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

यंदाच्या हंगामात पेरणीचे नियोजन किती क्षेत्रावर आहे. ?जिल्ह्यातील खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र ४ लाख ७०९ हेक्टर आहे, तर गतवर्षी जिल्ह्यात ४ लाख २ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा त्यात वाढ करून ४ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे.

खरीप पेरणीबाबत शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी ?सद्यस्थितीत जिल्ह्यात पडत असलेला पाऊस हा अवकाळी पाऊस आहे. जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाची अद्याप सुरूवात झाली नाही. प्रथम मान्सून हा गोवामार्गे मुंबई व महाराष्ट्रात पोहचतो शुक्रवारच्या हवामान अंदाजानुसार येत्या २-३ दिवसात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. समाधानकारक पाऊस पडल्यानंतर अथवा ७५ ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतर शेतकºयांनी पेरणीस सुरवात करावी.

यांत्रिक पेरणीबाबत काय सांगाल?गेल्या तीन दिवसांपासून काही भागांत खरीप पेरणी शेतकरी करीत आहेत. यात पेरणी यंत्राच्याबियाण्याच्या बॉक्सपासून निघालेल्या नळया रासायनीक खताच्या खाच्यात व रासायनिक खताच्या बॉक्सपासून निघालेल्या नळया बियाण्याच्या खाच्यात जोडल्या जाताहेत. त्यामुळे पेरणीच्यावेळी बियाणे खाली व खत वर पेरले जात असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारची पेरणी चुकीची असून, सोयाबीनचे बियाणे ५ सेमी पेक्षा जास्त खोलीवर पडते व खत ३ ते ५ सेमी खोलीवर पडते. वास्तविक पाहता पेरणी करीत असताना बियाणे ३ ते ५ सेमी खोलीवर व खते ५ सेमीपेक्षा जास्त खोलीवर पडणे आवश्यक असते. शेतकºयांनी पेरणी करण्यापूवी बियाणे व खताच्या नळया योग्य खाच्यात लावल्याची खात्री करुनच पेरणी करावी.

कृषी विद्यापिठाचा सल्ला महत्त्वाचा?कृषि विद्यापिठाच्या संदेशानुसार जमिनीत ७५ ते १०० मिमी पाऊस पडून जमिनीतील ओलावा संतृप्त झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा संदेश असला तरी काही शेतकºयांनी कापूस व इतर पिकाच्या पेरणीस सुरूवात केली आहे. बियाणे उगवणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक आहे, त्यासाठी सरासरी ७५ मिमी पाऊस पडणे आवश्यक आहे. ७५ मिमी पेक्षा कमी पावसावर पेरणी केल्यास जमिनीत ओलावा नसल्यामुळे जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेल्या बियाण्याचे कमी प्रमाणात अंकुरण होते.

 

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रinterviewमुलाखत