शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

पुरेसा पाऊस, बीज प्रक्रियेनंतरच पेरणी करावी -एस. एम. तोटावार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 11:32 IST

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सध्या खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे. शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. या हंगामाबाबत कृषी विभागाचे नियोजन आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया उपाययोजनांबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

यंदाच्या हंगामात पेरणीचे नियोजन किती क्षेत्रावर आहे. ?जिल्ह्यातील खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र ४ लाख ७०९ हेक्टर आहे, तर गतवर्षी जिल्ह्यात ४ लाख २ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा त्यात वाढ करून ४ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे.

खरीप पेरणीबाबत शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी ?सद्यस्थितीत जिल्ह्यात पडत असलेला पाऊस हा अवकाळी पाऊस आहे. जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाची अद्याप सुरूवात झाली नाही. प्रथम मान्सून हा गोवामार्गे मुंबई व महाराष्ट्रात पोहचतो शुक्रवारच्या हवामान अंदाजानुसार येत्या २-३ दिवसात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. समाधानकारक पाऊस पडल्यानंतर अथवा ७५ ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतर शेतकºयांनी पेरणीस सुरवात करावी.

यांत्रिक पेरणीबाबत काय सांगाल?गेल्या तीन दिवसांपासून काही भागांत खरीप पेरणी शेतकरी करीत आहेत. यात पेरणी यंत्राच्याबियाण्याच्या बॉक्सपासून निघालेल्या नळया रासायनीक खताच्या खाच्यात व रासायनिक खताच्या बॉक्सपासून निघालेल्या नळया बियाण्याच्या खाच्यात जोडल्या जाताहेत. त्यामुळे पेरणीच्यावेळी बियाणे खाली व खत वर पेरले जात असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारची पेरणी चुकीची असून, सोयाबीनचे बियाणे ५ सेमी पेक्षा जास्त खोलीवर पडते व खत ३ ते ५ सेमी खोलीवर पडते. वास्तविक पाहता पेरणी करीत असताना बियाणे ३ ते ५ सेमी खोलीवर व खते ५ सेमीपेक्षा जास्त खोलीवर पडणे आवश्यक असते. शेतकºयांनी पेरणी करण्यापूवी बियाणे व खताच्या नळया योग्य खाच्यात लावल्याची खात्री करुनच पेरणी करावी.

कृषी विद्यापिठाचा सल्ला महत्त्वाचा?कृषि विद्यापिठाच्या संदेशानुसार जमिनीत ७५ ते १०० मिमी पाऊस पडून जमिनीतील ओलावा संतृप्त झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा संदेश असला तरी काही शेतकºयांनी कापूस व इतर पिकाच्या पेरणीस सुरूवात केली आहे. बियाणे उगवणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक आहे, त्यासाठी सरासरी ७५ मिमी पाऊस पडणे आवश्यक आहे. ७५ मिमी पेक्षा कमी पावसावर पेरणी केल्यास जमिनीत ओलावा नसल्यामुळे जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेल्या बियाण्याचे कमी प्रमाणात अंकुरण होते.

 

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रinterviewमुलाखत