शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पुरेसा पाऊस, बीज प्रक्रियेनंतरच पेरणी करावी -एस. एम. तोटावार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 11:32 IST

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सध्या खरीप हंगामाला सुरुवात झालेली आहे. शेतकरी पेरणीच्या कामाला लागले आहेत. या हंगामाबाबत कृषी विभागाचे नियोजन आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाºया उपाययोजनांबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एम. तोटावार यांच्याशी शनिवारी साधलेला हा संवाद...

यंदाच्या हंगामात पेरणीचे नियोजन किती क्षेत्रावर आहे. ?जिल्ह्यातील खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र ४ लाख ७०९ हेक्टर आहे, तर गतवर्षी जिल्ह्यात ४ लाख २ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा त्यात वाढ करून ४ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन केले आहे.

खरीप पेरणीबाबत शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी ?सद्यस्थितीत जिल्ह्यात पडत असलेला पाऊस हा अवकाळी पाऊस आहे. जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पावसाची अद्याप सुरूवात झाली नाही. प्रथम मान्सून हा गोवामार्गे मुंबई व महाराष्ट्रात पोहचतो शुक्रवारच्या हवामान अंदाजानुसार येत्या २-३ दिवसात मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. समाधानकारक पाऊस पडल्यानंतर अथवा ७५ ते १०० मि.मी. पाऊस पडल्यानंतर शेतकºयांनी पेरणीस सुरवात करावी.

यांत्रिक पेरणीबाबत काय सांगाल?गेल्या तीन दिवसांपासून काही भागांत खरीप पेरणी शेतकरी करीत आहेत. यात पेरणी यंत्राच्याबियाण्याच्या बॉक्सपासून निघालेल्या नळया रासायनीक खताच्या खाच्यात व रासायनिक खताच्या बॉक्सपासून निघालेल्या नळया बियाण्याच्या खाच्यात जोडल्या जाताहेत. त्यामुळे पेरणीच्यावेळी बियाणे खाली व खत वर पेरले जात असल्याचे दिसत आहे. अशा प्रकारची पेरणी चुकीची असून, सोयाबीनचे बियाणे ५ सेमी पेक्षा जास्त खोलीवर पडते व खत ३ ते ५ सेमी खोलीवर पडते. वास्तविक पाहता पेरणी करीत असताना बियाणे ३ ते ५ सेमी खोलीवर व खते ५ सेमीपेक्षा जास्त खोलीवर पडणे आवश्यक असते. शेतकºयांनी पेरणी करण्यापूवी बियाणे व खताच्या नळया योग्य खाच्यात लावल्याची खात्री करुनच पेरणी करावी.

कृषी विद्यापिठाचा सल्ला महत्त्वाचा?कृषि विद्यापिठाच्या संदेशानुसार जमिनीत ७५ ते १०० मिमी पाऊस पडून जमिनीतील ओलावा संतृप्त झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा संदेश असला तरी काही शेतकºयांनी कापूस व इतर पिकाच्या पेरणीस सुरूवात केली आहे. बियाणे उगवणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा आवश्यक आहे, त्यासाठी सरासरी ७५ मिमी पाऊस पडणे आवश्यक आहे. ७५ मिमी पेक्षा कमी पावसावर पेरणी केल्यास जमिनीत ओलावा नसल्यामुळे जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेल्या बियाण्याचे कमी प्रमाणात अंकुरण होते.

 

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रinterviewमुलाखत