शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरील विकृती हा आजार!

By admin | Updated: June 12, 2014 23:09 IST

‘लोकमत’ने निमंत्रित करून ‘सोशल मीडिया आणि सामाजिक वितुष्ट’ या विषयावर घडवून आणलेली ही परिचर्चा.

सोशल मीडियाच्या वापराने सध्या प्रत्येक जण स्वयंभू वार्ताहर बनत आहे. अभिव्यक्तीचा हुंकार सहजपणे तो व्यक्त करतो. त्याला कोणताही आडपडदा नाही, की कुणी सेन्सॉर नाही. तो आपल्या मनात सुरू असलेली घालमेल, भावभावनांची आंदोलने क्षणार्धात जगाच्या कॅन्व्हॉसवर उमटवू शकतो. त्याच्या मनात सुरू असलेल्या द्वंद्वाला क्षणार्धात प्रत्युत्तर व प्रतिसादही मिळतो. मग तो कधी सकारात्मक तर कधी नकारात्मकही असतो. या तंत्रज्ञानामुळे संवादात क्रांती झाली. संवादाने समाज जोडला जातो तसा तो सहज तोडण्याची व विध्वंस घडविण्याची मोठी शक्ती या माध्यमात असल्याचे आपण क्षणोक्षणी पाहतो आहे. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा झालेला भलाबुरा वापर व त्याचे परिणाम सर्वांनी पाहिले आहेत. महापुरुषांच्या अवमानकारक पोस्टवरून गेल्या दोन आठवड्यांपासून देशात निर्माण झालेल्या अराजकसदृश परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ह्यलोकमतह्णने तंत्रज्ञान, कायदा, सामाजिक उपक्रम, व्यापारी व मानसोपचारतज्ज्ञ यांच्यासह पोलीस अधिकार्‍यांना निमंत्रित करून ह्यसोशल मीडिया आणि सामाजिक वितुष्टह्ण या विषयावर बहुअंगाने घडवून आणलेली ही परिचर्चा. ह्यइंटरनेट हे शाप की वरदानह्ण हा वादविवादाचा विषय ठरतो आहे. पूर्वी महापुरुषांच्या पुतळ्यांची थेट विटंबना केली जायची. त्यावर पर्याय म्हणून आम्ही आमचे महापुरुष जाळी लावून कुलूपबंद केले. आता इंटरनेटच्या मृगजळाने वेढलेल्या जगात वाढलेल्या सायबर क्राईमला कसे कुलूपबंद करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सायबर क्राईमला र्मयादा नाहीत. त्याची अंगेही वेगवेगळी आहेत. मोबाईल व संगणकाच्या माध्यमातून जग अगदी तुमच्या समोर आले आहे. तुम्हाला काय हवंय आणि काय नाही, हा चॉईस व अधिकारही तुमचाच आहे. सध्या साध्या-साध्या पोस्टवरून समाजात वातावरण तंग होत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. नव्या माध्यमाचा सदुपयोग होतो, तसा दुरुपयोगही होत आहे. नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घ्यायला माणसांना काही अवधी हवा असतो. तसा या माध्यमांशीही तो विवेकाने जुळवून घेईल; परंतु सध्याच्या या माध्यमाच्या अविवेकी वापरामुळे समाजात हिंसक घटना घडत आहेत. सोशल माध्यमाच्या माहितीचा व बदलाचा वेगही प्रचंड आहे. सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व आर्थिक आदी सर्वच क्षेत्रांशी सोशल माध्यमांचा संबंध येतो. त्यामुळे या सर्वच क्षेत्रांतील प्रश्न या माध्यमामुळे निर्माण झाले आहेत. या प्रश्नावर आयटीचे अभ्यासक आश्‍वस्त आहेत. नको असलेल्या समाजविघातक ठरू शकणार्‍या बाबीवर सहज प्रतिबंध घालणे शक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, तर माध्यम अभ्यासकांच्या मते या माध्यमावर आता तंत्रज्ञानाने बंधन घालणे अशक्य आहे. गुन्हेगारी ही वृत्ती असून ही वृत्ती घालविण्यासाठी समाजमनाचे प्रबोधन करावे लागणार आहे. मानसोपचारतज्ज्ञांना हा एक आजार वाटतो; परंतु कायद्याचे सातत्याने पुनर्विलोकन, कठोर अंमलबजावणी व शिक्षा होणे आवश्यक असल्याबद्दल सर्वांचेच एकमत होताना दिसते.