शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी सरसावल्या सामाजिक, स्वयंसेवी संस्था! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:10 IST

वाशिम: देशाचा ७१ वा स्वातंत्र्य दिन उद्या, मंगळवार १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उत्साहाच्या भरात राष्ट्रध्वजाचा अनावधानाने अपमान होऊ नये म्हणून विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी विविध उपक्रम आणि प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनजागृती करून राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासह प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.  या स्वयंसेवी संस्थांमध्ये मारवाडी युवामंच, राजरत्न बहुद्देशीय संस्था, राष्ट्रीय हरित सेना, युवती आणि युवक मित्रांसह सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.  

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिन विशेषउपक्रमांतून जनजागृतीप्लास्टिक राष्ट्रध्वज न वापरण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: देशाचा ७१ वा स्वातंत्र्य दिन उद्या, मंगळवार १५ ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उत्साहाच्या भरात राष्ट्रध्वजाचा अनावधानाने अपमान होऊ नये म्हणून विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी विविध उपक्रम आणि प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनजागृती करून राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासह प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. या स्वयंसेवी संस्थांमध्ये मारवाडी युवामंच, राजरत्न बहुद्देशीय संस्था, राष्ट्रीय हरित सेना, युवती आणि युवक मित्रांसह सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे.  राजरत्न संस्थेकडूनही पत्रक काढून जनतेला राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचे आवाहन केले आहे.  स्वातंत्र्यदिनानिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नये, राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याकरिता काळजी घेण्याचे आवाहन  सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहु.संस्था वाशिमच्यावतीने करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी लहान मुले प्लास्टिकपासून बनलेले राष्ट्रध्वज खरेदी करतात हे ध्वज लवकर नष्ट होत नसल्यामुळे बरेच दिवस तेथेच पडून राहतात, त्यामुळे आपल्या हातून नकळत राष्ट्रवजाचा अवमान होतो, हा अवमान टाळण्यासाठी प्लास्टिकपासून बनलेले राष्ट्रध्वज घेऊ नये, राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान व्हावा, याकरिता संस्थेच्यावतीने राष्ट्रध्वज सन्मान पथक तयार केले असून, वापरास उपयुक्त नसलेले, खराब झालेले, रस्त्यावर किंवा मैदानावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करुन ते संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. सन्मान पथकात पंधरा युवक, युवती सहभागी होणार असून, ते शहरातील मुख्य रहदारीच्या भागात, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मैदानावर फिरुन पडलेले राष्ट्रध्वज संकलीत करुन तहसील कार्यालयात जमा करतील. भारतीय संहितेमध्ये दिलेल्या नियमाप्रमाणे राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, यासाठी काटेकोर पालन करण्याचे आवाहन राजरत्न संस्थेचे विनोद पट्टेबहादूर, अरविंद उचित, सत्येंद्र भगत, महादेव क्षीरसागर, संतोष हिवराळे, नंदिन हिवराळे, हंसिनी उचित, सोनल तायडे, सुमेध तायडे, नितीन अढाव, विकास पट्टेबहादूर, भगवान ढोले, समाधान करडीले, अविनाश नाईक, प्रशांत राठोड, आदीच्यावतीने करण्यात आले आहे.वाशिम येथील युवतीमित्र स्नेहल तायडे यांनी जनतेला राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी प्लास्टिक  राष्ट्रध्वजाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.  ग्रामीण तसेच शहरी  भागात स्वातंत्र्यदिनी प्लास्टिकपासून बनविलेले राष्ट्रध्वज घेतल्या जातात. मुलांच्या हट्टाकरिता पालक असे राष्ट्रध्वज  घेऊन देतात. कालांतराने ते इतस्त: पडतात. यामुळे  नकळत आपल्या हातून राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. त्यामुळे  राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे  आवाहन स्नेहल तायडे यांनी केले आहे.