शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

दुकाने बंदमुळे लघुव्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:39 IST

.............. वाहनांअभावी प्रवाशांची गैरसोय वाशिम : जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून रविवारी दिवसभर जिल्ह्यात कडेकोट बंद पाळण्यात आला. यामुळे ग्रामीण भागातील ...

..............

वाहनांअभावी प्रवाशांची गैरसोय

वाशिम : जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरून रविवारी दिवसभर जिल्ह्यात कडेकोट बंद पाळण्यात आला. यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक घराबाहेरच पडले नाहीत. परिणामी, वाहनेही उपलब्ध नव्हती. यामुळे महत्त्वाच्या कामानिमित्त शहरात यावे लागलेल्या प्रवाशांची गैरसोय झाली.

.................

रेती वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

वाशिम : चोरट्या मार्गाने शहरात येणाऱ्या रेतीची राजरोस वाहतूक सुरू असताना प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे महसूल बुडत असून तहसीलदारांनी धडक कारवाईची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी अनिकेत गाठे यांनी शुक्रवारी निवेदनाव्दारे केली.

...............

स्वतंत्र कार्यालय नसल्याने गैरसोय

वाशिम : कृषी विभागातील महत्त्वाचे पद असलेल्या तालुका अधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यालय नाही. जिल्ह्यातील बहुतांश तालुका कृषी अधिकारी कार्यालयांचा कारभार हा भाड्याच्या इमारतीत सुरू असून आवश्यक सुविधा नसल्याने कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.

.............

खाद्यान्न सुरक्षा जनजागृतीस ‘खो’

जऊळका रेल्वे : नागरिकांच्या आरोग्याशी निगडित खाद्यान्न सुरक्षेचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. प्रशासकीय पातळीवरून यासंबधी कुठलीच जनजागृती होताना दिसत नाही. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठकदेखील दरमहा होत नसल्याचे दिसत आहे.

......................

अतिक्रमणाने गायरान जमीन धोक्यात

मेडशी : परिसरातील बहुतांश गावांमध्ये शेकडो हेक्टर गायरान वनजमीन होती; मात्र वाढते अतिक्रमण व जंगलतोडीमुळे वनजमिनीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष पुरविण्याची मागणी शे. रऊफ यांनी शुक्रवारी केली.

...............

मालेगाव बसस्थानकात सुविधांचा अभाव

मालेगाव : येथील तहसील कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या बसस्थानकात विविध समस्या उद्भवल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसस्थानक परिसरात सुविधा उपलब्ध करण्याची मागणी सुरेश कोकाटे यांनी आगारप्रमुखांकडे निवेदनाव्दारे केली.

.......................

एटीएम बंदमुळे नागरिक त्रस्त

वाशिम : शहर परिसरातील एटीएम अधिकांश वेळा बंद राहणे, त्यात पैसे नसणे, आदी समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवारीदेखील असाच अनुभव अनेक नागरिकांना आला. या गंभीर बाबीकडे बँकांनी लक्ष पुरवून ग्राहकांच्या अडचणी दूर कराव्या, अशी मागणी होत आहे.

......................

गतिरोधकांचा अभाव

वाशिम : शहरातून जाणाऱ्या नांदेड-अकोला राष्ट्रीय महामार्गावर अकोला नाका आणि शहर पोलिस स्टेशननजीक आयआरसीच्या (इंडियन रोड काँग्रेस) निकषानुसार गतिरोधक उभारणे आवश्यक आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी माधव डोंगरदिवे यांनी महामार्ग प्राधिकरणाकडे केली.

.......................

वाहनांतून प्रदूषण; कारवाईची मागणी

किन्हीराजा : बहुतांश जीप, ऑटो, दुचाकी वाहने जुनी झाली असून प्रदूषण होत आहे. संबंधित यंत्रणेने त्यावर निर्बंध लादून प्रदूषणाची समस्या दुर करावी, अशी मागणी प्रवीण गोटे यांनी शुक्रवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केली.

.................

आययूडीपीमधील नाल्यांची सफाई करा

वाशिम : शहरातील जुनी आययूडीपी कॉलनी परिसरात घाण पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची दैनंदिन सफाई होत नसल्याने त्यातून दुर्गंधी पसरत आहे. याकडे नगर परिषदेने लक्ष पुरवून नाल्यांची सफाई करण्याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी विशाल राऊत यांनी नगर परिषदेकडे निवेदनाव्दारे केली.

.................

ग्रामीण भागात ग्रामसेवकांचे अपडाऊन

वाशिम : ग्रामीण भागात कार्यरत असलेले बहुतांश ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने गावपातळीवरील कामांचा खोळंबा होत आहे. ग्रामसेवकांना मुख्यालयी थांबण्याबाबत निर्देशित करण्याची मागणी गौतम गायकवाड यांनी जिल्हा परिषदेकडे केली.

...................

कोंडवाड्याची दुरुस्ती करण्याची मागणी

शिरपूर जैन : येथील बसस्थानकाला लागून असलेल्या गुरांच्या कोंडवाड्याची दुरवस्था झाली असून त्यात गुरे कोंडली जात नाहीत. तथापि, गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या कोंडवाड्याची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ५ मार्च रोजी ग्रामपंचायतकडे केली.