शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

पीक कर्ज वितरणात सहा हजार सभासदांची नव्याने भर!

By admin | Updated: July 7, 2016 02:14 IST

पालकमंत्र्यांच्या निर्देशांची अंमलबजावणी संथ गतीने : केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेने गाठले उद्दिष्ट!

वाशिम : खरीप पीक कर्ज वाटपात यावर्षी सहा हजार नव्या सभासदांची भर पडली आहे. दुसरीकडे पीक कर्ज वितरणात दिरंगाई करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दस्तुरखुद्द पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांनी दिलेले असतानाही, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंंत काही राष्ट्रीयीकृत बँकांना उद्दिष्टपूर्ती करता आली नाही.२0१५ या वर्षात पावसाने दगा दिला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकर्‍यांचा भ्रमनिरास केला. विविध कारणांमुळे खरीप व रब्बीचे समाधानकारक पीक हाती आले नाही. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अत्यल्प भावाची भर घालण्यात आली. चोहोबाजूंनी आलेल्या चक्रीवादळात अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी कोलमडून गेला. आता पुन्हा नव्या उमेदीने बँकांच्या पीक कर्जरुपी कुबड्याच्या आधारावर उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नांना अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेचा अपवाद वगळता उर्वरित बँका जुलै महिन्यातही फारसा प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव शेतकर्‍यांना येत आहे. ३१ मे पूर्वी पीक कर्ज वितरणाचे ८0 टक्के उद्दिष्ट्य गाठण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले होते. या निर्देशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बँक प्रशासनाची बैठक घेऊन पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट गाठण्याच्या सूचना दिल्या. तालुका व मंडळ स्तरावर बैठका घेण्यात आल्या. पीक कर्ज वितरणात दिरंगाई करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. कारवाईच्या भीतीने काही राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाला प्राधान्य दिले, तर काही बँकांनी प्रशासनाच्या निर्देशांना धाब्यावर बसविले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सात राष्ट्रीयीकृत बँकेचा अपवाद वगळता उर्वरित सर्व बँका ७0 टक्क्यांच्या आत आहेत.४ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळता एकाही बँकेला पीक कर्ज वाटपाचे १00 टक्के उद्दिष्ट गाठता आले नाही. ४ जुलैपर्यंत एकूण ९८ हजार ७२१ शेतकर्‍यांना, ७६७ कोटी ८१ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३४६ कोटी ३२ लाख, तर राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँक ४२१ कोटी ४९ लाख रुपये पीक कर्ज वाटप केले. २0१६ च्या खरीप हंगामात ५९१३ या नवीन सभासद शेतकर्‍यांना ४४ कोटी ३६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.