शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

पीक कर्ज वितरणात सहा हजार सभासदांची नव्याने भर!

By admin | Updated: July 7, 2016 02:14 IST

पालकमंत्र्यांच्या निर्देशांची अंमलबजावणी संथ गतीने : केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेने गाठले उद्दिष्ट!

वाशिम : खरीप पीक कर्ज वाटपात यावर्षी सहा हजार नव्या सभासदांची भर पडली आहे. दुसरीकडे पीक कर्ज वितरणात दिरंगाई करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दस्तुरखुद्द पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांनी दिलेले असतानाही, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंंत काही राष्ट्रीयीकृत बँकांना उद्दिष्टपूर्ती करता आली नाही.२0१५ या वर्षात पावसाने दगा दिला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकर्‍यांचा भ्रमनिरास केला. विविध कारणांमुळे खरीप व रब्बीचे समाधानकारक पीक हाती आले नाही. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अत्यल्प भावाची भर घालण्यात आली. चोहोबाजूंनी आलेल्या चक्रीवादळात अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी कोलमडून गेला. आता पुन्हा नव्या उमेदीने बँकांच्या पीक कर्जरुपी कुबड्याच्या आधारावर उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नांना अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेचा अपवाद वगळता उर्वरित बँका जुलै महिन्यातही फारसा प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव शेतकर्‍यांना येत आहे. ३१ मे पूर्वी पीक कर्ज वितरणाचे ८0 टक्के उद्दिष्ट्य गाठण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले होते. या निर्देशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बँक प्रशासनाची बैठक घेऊन पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट गाठण्याच्या सूचना दिल्या. तालुका व मंडळ स्तरावर बैठका घेण्यात आल्या. पीक कर्ज वितरणात दिरंगाई करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. कारवाईच्या भीतीने काही राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाला प्राधान्य दिले, तर काही बँकांनी प्रशासनाच्या निर्देशांना धाब्यावर बसविले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सात राष्ट्रीयीकृत बँकेचा अपवाद वगळता उर्वरित सर्व बँका ७0 टक्क्यांच्या आत आहेत.४ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळता एकाही बँकेला पीक कर्ज वाटपाचे १00 टक्के उद्दिष्ट गाठता आले नाही. ४ जुलैपर्यंत एकूण ९८ हजार ७२१ शेतकर्‍यांना, ७६७ कोटी ८१ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३४६ कोटी ३२ लाख, तर राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँक ४२१ कोटी ४९ लाख रुपये पीक कर्ज वाटप केले. २0१६ च्या खरीप हंगामात ५९१३ या नवीन सभासद शेतकर्‍यांना ४४ कोटी ३६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.