शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पीक कर्ज वितरणात सहा हजार सभासदांची नव्याने भर!

By admin | Updated: July 7, 2016 02:14 IST

पालकमंत्र्यांच्या निर्देशांची अंमलबजावणी संथ गतीने : केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेने गाठले उद्दिष्ट!

वाशिम : खरीप पीक कर्ज वाटपात यावर्षी सहा हजार नव्या सभासदांची भर पडली आहे. दुसरीकडे पीक कर्ज वितरणात दिरंगाई करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दस्तुरखुद्द पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांनी दिलेले असतानाही, जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंंत काही राष्ट्रीयीकृत बँकांना उद्दिष्टपूर्ती करता आली नाही.२0१५ या वर्षात पावसाने दगा दिला. त्यानंतर परतीच्या पावसानेदेखील शेतकर्‍यांचा भ्रमनिरास केला. विविध कारणांमुळे खरीप व रब्बीचे समाधानकारक पीक हाती आले नाही. संकटांची ही मालिका कमी म्हणून की काय, यात शेतमालाच्या अत्यल्प भावाची भर घालण्यात आली. चोहोबाजूंनी आलेल्या चक्रीवादळात अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी कोलमडून गेला. आता पुन्हा नव्या उमेदीने बँकांच्या पीक कर्जरुपी कुबड्याच्या आधारावर उभे राहण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. या प्रयत्नांना अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेचा अपवाद वगळता उर्वरित बँका जुलै महिन्यातही फारसा प्रतिसाद देत नसल्याचा अनुभव शेतकर्‍यांना येत आहे. ३१ मे पूर्वी पीक कर्ज वितरणाचे ८0 टक्के उद्दिष्ट्य गाठण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले होते. या निर्देशाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बँक प्रशासनाची बैठक घेऊन पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट गाठण्याच्या सूचना दिल्या. तालुका व मंडळ स्तरावर बैठका घेण्यात आल्या. पीक कर्ज वितरणात दिरंगाई करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. कारवाईच्या भीतीने काही राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाला प्राधान्य दिले, तर काही बँकांनी प्रशासनाच्या निर्देशांना धाब्यावर बसविले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सात राष्ट्रीयीकृत बँकेचा अपवाद वगळता उर्वरित सर्व बँका ७0 टक्क्यांच्या आत आहेत.४ जुलैपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अपवाद वगळता एकाही बँकेला पीक कर्ज वाटपाचे १00 टक्के उद्दिष्ट गाठता आले नाही. ४ जुलैपर्यंत एकूण ९८ हजार ७२१ शेतकर्‍यांना, ७६७ कोटी ८१ लाखांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३४६ कोटी ३२ लाख, तर राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँक ४२१ कोटी ४९ लाख रुपये पीक कर्ज वाटप केले. २0१६ च्या खरीप हंगामात ५९१३ या नवीन सभासद शेतकर्‍यांना ४४ कोटी ३६ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.