शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

खरीप पीक विम्याला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:26 IST

शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळी, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचं नुकसान होऊन शेतकऱ्यांना अतोनात आर्थिक हानी ...

शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळी, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचं नुकसान होऊन शेतकऱ्यांना अतोनात आर्थिक हानी सहन करावी लागते. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा योजना आधार ठरू शकते. त्यामुळे गत काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने पीक विमा योजनेत सहभागी होत आहेत. त्यासाठी हजारो रुपयांचा भरणाही ते करतात, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे प्रत्यक्ष नुकसान होऊन आणि शेतकऱ्यांनी रीतसर तक्रार करूनही पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचे प्रमाण कमी असते. अनेक शेतकऱ्यांना तर केवळ ४ ते १० रुपये पीक विमा नुकसानापोटी मंजूर केल्याची उदाहरणेसुद्धा आहेत. यामुळेच शेतकरी पीक विमा योजनेत सहभाग नाेंदविण्यास उदासीन असून, आता या योजनेत सहभाग घेण्यासाठी अवघे चार दिवस उरले असतानाही भर जहाँगीर परिसरातील ४० टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही.

--------------------

कोट : नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना सुरक्षा कवच देण्यासाठी सावकाराचे कर्ज काढून पीक विम्याची रक्कम आम्ही भरतो. त्यासाठी वारंवार सावकाराचे उंबरठे झिजवतो, परंतु नैसर्गिक आपत्तीने पिकाचे नुकसान होऊनही प्रत्यक्ष विमा भरपाई मिळत नाही. त्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी अकारण खर्च का करावा आणि कंपनीला मोठे होण्यास मदत का करावी, असा प्रश्न पडतो. त्यामुळेच यंदा आम्ही पीक विमा काढलेला नाही.

-भानुदास गीते,

शेतकरी, भर जहाँगीर