शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...! जीवंत आजीबाईला तलाठ्याने मृत दाखविले!श्रावण बाळ योजनेची पेन्शन बंद, आता...

By संतोष वानखडे | Updated: June 18, 2023 14:57 IST

तलाठ्याच्या चुकीचा फटका आजीबाईला बसला असून, किमान पेन्शन तरी सुरू करावी, अशी आर्त हाक आजीबाईने दिली आहे.

वाशिम : मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील रत्नप्रभाबाई रामराव देशमुख (८५) या जीवंत आजीबाईचा मृत असल्याचा दाखला तलाठ्याने तहसिलदारांकडे दिल्याने जानेवारी २०२३ पासून त्यांची पेन्शन बंद झाली. तलाठ्याच्या चुकीचा फटका आजीबाईला बसला असून, किमान पेन्शन तरी सुरू करावी, अशी आर्त हाक आजीबाईने दिली आहे.

मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील रत्नप्रभाबाई रामराव देशमुख (८५) या आजीबाईला सन २००५ मध्ये मानोरा तहसील कार्यालयातून श्रावण बाळ योजने अंतर्गत पेन्शन लागू करण्यात आली. घरात एकटी महिला, कमविता कोणी नाही, वय जास्त झाल्याने मजुरीचे काम होत नसल्याने पेन्शन योजनेचा मोठा आधार मिळतो. रत्नप्रभाबाई देशमुख या जून महिन्यात बँकेत पेन्शनचे पैसे काढण्यासाठी गेल्या असता, बँकेकडून पेन्शन जमा झाली नाही असे उत्तर मिळाले. 

पेन्शनबाबत नेमकी काय अडचण आली, याची विचारणा करण्यासाठी त्या नातेवाईकासह तहसिल कार्यालयात गेल्या असता, तलाठी सागर चौधरी यांनी या महिलेचा मृत्यू झाला असा अहवाल २९ जुलै २०२२ रोजी कार्यालयास दिल्याने पेन्शन बंद झाल्याचे उत्तर एेकून रत्नप्रभाबाई व नातेवाईकांना धक्काच बसला. कोणतीही शहानिशा न करता चुकीचा अहवाल देणाऱ्यांवर कारवाइ व्हावी तसेच पेन्शन पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी होत आहे.

शासन आपल्या दारी; पण न्याय केव्हा?सध्या वाशिम जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रम राबविण्यात येत आहे. शासकीय योजनेचा लाभ घरपोच दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मग, कारखेडा येथील रत्नप्रभाबाई देशमुख या ८५ वर्षीय आजीबाईला म्हातारपणात आपण जीवंत असल्याचे दाखविण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत असतानाही, संबंधितांच्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही? असा संतप्त सवाल जनमाणसातून उपस्थित केला जात आहे.

तहसील कार्यालयकडून पेन्शन सुरु असलेल्या व्यक्तीने हयातीचे दाखले व इतर माहिती देणे आवश्यक आहे. एक महिना वाट पाहली. मला रत्नप्रभा रामराव देशमुख यांचेकडून हयातीचा दाखला मिळाला नाही. म्हणून मला वाटले सदर महिला ही जीवंत नसावीख म्हणून मी अहवाल दिला असेल.- सागर चौधरी, तलाठी, कारखेडा

टॅग्स :washimवाशिम